एक्स्प्लोर

सरकारतर्फे प्रत्येक महिन्याला मिळणार 10000 रुपये, 'योजनादूत' उपक्रमासाठी लवकर करा अर्ज, प्रक्रियेला सुरुवात!

Mukhyamantri Yojana Doot Application : राज्य सरकारच्या या उपक्रमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या उपक्रमात निवड झालेल्या उमेदवाराला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची राज्यभर चर्चा आहे. राज्यातील दलित, महिला, आर्थिक दुर्बल, शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. याच योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारकडून मुख्यमंत्री योजनादूत (Mukhyamantri Yojanadoot) हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना प्रतिमहिना 10000 रुपये कमवण्याची संधी आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शेवटचे सहा दिवस शिल्लक आहेत. 

तरुणांना मिळणार 10000 रुपये 

राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडू काही तरुण-तरुणींची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या योजनादूतांना सरकारच्या योजना सामान्यांना समजावून सांगायच्या आहेत. या कामासाठी सरकारतर्फे त्यांना प्रतिमहिना 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. निवड झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी तरुणांना हे मानधन दिले जाणार आहे. सरकार राज्यभरातून अशा 50 हजार योजनादूतांची निवड करणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

अर्ज करण्यासाठी शेवटचे सहा दिवस

या उपक्रमात सहभागी होऊन प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये कमवण्याची तरुणांना उत्तम संधी आहे. त्यासाठी इच्छुकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज करण्याची संधी दिली जाणार नाही. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे. तसेच उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असण तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. या उपक्रमासाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे गरेजेचे आहे. त्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणेही आवश्यक आहे. 

निवडीसाठी कागदपत्रांची आवश्यकता काय?

इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजनादूत व्हायचे असेल तर त्याला विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही, शिक्क्यासह), वैयक्तिक बँख खात्याचा तपशील, असणे गरजेचे आहे. उमेदवारांना योजनादूतच्या https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.

हेही वाचा :

सोनं आणखी चकाकणार, एका वर्षात वाढणार तब्बल 'इतका' भाव, सोन्यात गुंतवणूक ठरणार फायदेशीर!

म्हाडाच्या मुंबईच्या घराबाबत मोठी अपडेट, 'या' दिवशी समजणार घर मिळालं की नाही?

म्हाडाच्या मुंबईच्या घराबाबत मोठी अपडेट, 'या' दिवशी समजणार घर मिळालं की नाही?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Equitas Bank : 100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' बँकेच्या शेअरमध्ये 'कप आणि हँडल' ब्रेकआउट; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!
100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' बँकेच्या शेअरमध्ये 'कप आणि हँडल' ब्रेकआउट; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Brigade Enterprises : 1:3 बोनस शेअर्स आणि अधिकृत भांडवल 400 कोटींवर नेण्याच्या निर्णयाला मंजुरी; रिअल इस्टेट कंपनीचा शेअर चर्चेत!
1:3 बोनस शेअर्स आणि अधिकृत भांडवल 400 कोटींवर नेण्याच्या निर्णयाला मंजुरी; रिअल इस्टेट कंपनीचा शेअर चर्चेत!
EPFO e Sign Process : पीएफ खातेधारकांनो सावधान! ई-साईन' केली नाही तर पैसे अडकणार; जाणून घ्या सोपी ऑनलाईन पद्धत
पीएफ खातेधारकांनो सावधान! ई-साईन' केली नाही तर पैसे अडकणार; जाणून घ्या सोपी ऑनलाईन पद्धत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget