एक्स्प्लोर

BLOG : जिंकलो..पण घामटा निघाला

आधी चार बाद 45 आणि नंतर सात बाद 74..स्कोरबोर्डची ही स्थिती पाहिल्यावर एखाद्या अननुभवी संघाची नौका अशी हेलकावे खाताना वाटते. पण, मीरपूरच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या नावासमोर हे आकडे लागले होते, तेव्हा धडधड वाढली होती. पण, अश्विन-श्रेयस अय्यर जोडीने  आरोग्य सुधारलं आणि आयसीयूतून आपण बाहेर आलो. नुसते बाहेर नाही आलो, तर बरे होऊन आनंदाने घरी परतलो. तो विजयाचा गुच्छ घेऊनच.

मीरपूरच्या पिचवर पहिल्या डावात तजिरुलच्या आणि दुसऱ्या डावात मेहदी हसनच्या फिरकीसमोर आपण कोसळलो. बरं कोसळणारे तरी कोण होते, तर राहुल, कोहली आणि पुजारा. 45 कसोटी, 104 कसोटी आणि 98 कसोटी खेळणारे हे बुरुज जमीनदोस्त झाले. तेही 40 कसोटी सामने खेळणारा तैजुल इस्लाम आणि 37 कसोटी खेळणाऱ्या मेहदी हसनसमोर.

फिरकीला खेळपट्टी पोषक असली तरीही फिरकीच्याच मातीत जन्म झालेल्या आपल्या दिग्गजांनी इथे ढेपाळावं, याची जास्त खंत वाटली. पहिल्या डावात चार बाद 94 वरुन पंत आणि अय्यरने आपल्याला सावरलं, नाहीतर परिस्थिती बिकट होती. चौथ्या डावात अशा खेळपटट्ट्यांवर फलंदाजी करणं, हे आव्हानात्मक असलं तरीही आपण चार बाद 45, सात बाद 74असं घसरणं हे आपल्या लौकिकाला साजेसं नाही.

क्रिकइन्फोच्या मुलाखतीत माजी कसोटीपटू वसिम जाफरने आपल्या दुसऱ्या डावातील अप्रोचवर बोट ठेवलं. तो म्हणाला, 145 चं टार्गेट गाठताना आपण बचावात्मक पवित्रा घेतला होता. राहुल, गिलसारखे फलंदाज आघाडीला असताना हे योग्य नव्हे. पॉझिटिव्ह अप्रोच किती महत्त्वाचा असतो, हे आपण याआधी पाहिलंय. बांगलादेशविरुद्ध जर आपण असा दबाव घेऊन खेळणार असू तर फेब्रुवारीत आपली गाठ ऑस्ट्रेलियन टीमशी पडणार आहे. आपण त्यांच्याच अंगणात त्यांचा वृक्ष कसोटी मालिकेत दोनदा उपटून आलोय. त्यामुळे ते चवताळलेले असणार यात शंका नाही. म्हणून आपण सकारात्मक किंबहुना आक्रमक दृष्टिकोन घेऊन खेळणं हीच काळाची गरज आहे.

इथे अश्विन आणि श्रेयस अय्यरची पाठ मात्र थोपटायला हवी. सात बाद 74 वरुन त्यांनी सामना फिरवला. अश्विनने ऑस्ट्रेलियात हनुमा विहारीसोबत केलेला पराक्रम आपण साऱ्यांनीच पाहिलाय. तिथे ऑसी तोफांचे व्रण अंगावर घेत त्याने गड राखला होता. इथे अश्विन पॉझिटिव्ह खेळला. त्याने 62 चेंडूंमध्ये 42 धावा या 67.74 च्या स्ट्राईक रेटने त्याने केल्या. चार चौकार, एक षटकारही ठोकला. अश्विनच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये 13 अर्धशतकं आणि 5 शतकं आहेत. ही कामगिरी त्याला फलंदाजाच्या व्याख्येत परिपूर्णपणे बसवते. त्याच्याकडून अशाच सातत्याची अपेक्षा आपण यापुढेही करु शकतो. पण, आघाडीच्या फळीकडून अशाच सातत्याने कोलमडण्याची अपेक्षा नको ठेवायला. कारण, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाचा पेपर आपल्याला सोडवायचाय. ऑसी मंडळी खिंडीत गाठलं की, चिरडून टाकतात. ती पुन्हा तुम्हाला बचावाचा दोर टाकायला देत नाहीत. त्यामुळे आघाडीच्या फळीने अधिक जबाबदारीने आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

 अक्षर पटेलचंही इकडे कौतुक होणं गरजेचं आहे. चौथ्या डावात चौथ्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर त्याने 88 मिनिटे खेळपट्टीवर तग धरला. इतकंच नव्हे तर रथीमहारथी धारातीर्थी पडत असताना त्याने 69 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. स्ट्राईक रेट जरी 50 च्या आसपास असला तरी तेव्हा तो नकारात्मक खेळला नाही. त्याने धावफलक हलता ठेवला. गेल्या काही वर्षामधला ट्रेंड पाहिला तर बहुतांशवेळा आपल्याला मधल्या फळीने किंवा लोअर मिडल ऑर्डरने पराभवाच्या खाईतून वाचवलंय. पंत, वॉशिंग्टन सुंदर, हनुमा विहारी, अश्विन आणि कंपनीमुळे आपली मधल्या फळीची ताकद वाढली असली तरीही आघाडीच्या ताकदीचं दर्शन अधूनमधून घडत असल्याने त्यांच्यावर जरा अतिच अवलंबून राहावं लागतंय. 

अलिकडच्या काळातील इंग्लंडचा अप्रोच पाहा. आपल्याविरुद्ध टी-ट्वेन्टी वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये म्हणजे नॉकआऊट मॅचमध्ये 168 च्या आव्हानात्मक लक्ष्याचा त्यांनी पालापाचोळा केला. तो याच सकारात्मक आणि आक्रमक खेळाने. अगदी स्टीव्ह वॉची टीम जेव्हा 2001 च्या मोसमात सलग 16 कसोटी जिंकली होती, तेव्हाही त्यांचा ‘अटॅक इज अ बेस्ट वे ऑफ डिफेन्स’चाच नारा असायचा. आपल्याकडे उत्तम दर्जाचे आणि आक्रमक बाणा असलेले खेळाडू असून आपण काही वेळा अकारण बचावात्मक पवित्रा घेतो. ते टाळलं तर भारताचा विजयरथ रोखणं सोपं असणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिका विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन करतानाच याही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या, सावध राहायला हवं आणि आक्रमकही. त्यांच्याच भूमीवरील दोन मालिकेतल्या पराभवाने जखमी ऑसी फेब्रुवारीत चाल करुन येतायत. त्यांच्या खेळाची चाल बिघडवण्यासाठी त्यांच्यावरच प्रतिहल्ल्याची चाल खेळायलाच हवी.

 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Nanded Crime: सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget