एक्स्प्लोर

BLOG : जिंकलो..पण घामटा निघाला

आधी चार बाद 45 आणि नंतर सात बाद 74..स्कोरबोर्डची ही स्थिती पाहिल्यावर एखाद्या अननुभवी संघाची नौका अशी हेलकावे खाताना वाटते. पण, मीरपूरच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या नावासमोर हे आकडे लागले होते, तेव्हा धडधड वाढली होती. पण, अश्विन-श्रेयस अय्यर जोडीने  आरोग्य सुधारलं आणि आयसीयूतून आपण बाहेर आलो. नुसते बाहेर नाही आलो, तर बरे होऊन आनंदाने घरी परतलो. तो विजयाचा गुच्छ घेऊनच.

मीरपूरच्या पिचवर पहिल्या डावात तजिरुलच्या आणि दुसऱ्या डावात मेहदी हसनच्या फिरकीसमोर आपण कोसळलो. बरं कोसळणारे तरी कोण होते, तर राहुल, कोहली आणि पुजारा. 45 कसोटी, 104 कसोटी आणि 98 कसोटी खेळणारे हे बुरुज जमीनदोस्त झाले. तेही 40 कसोटी सामने खेळणारा तैजुल इस्लाम आणि 37 कसोटी खेळणाऱ्या मेहदी हसनसमोर.

फिरकीला खेळपट्टी पोषक असली तरीही फिरकीच्याच मातीत जन्म झालेल्या आपल्या दिग्गजांनी इथे ढेपाळावं, याची जास्त खंत वाटली. पहिल्या डावात चार बाद 94 वरुन पंत आणि अय्यरने आपल्याला सावरलं, नाहीतर परिस्थिती बिकट होती. चौथ्या डावात अशा खेळपटट्ट्यांवर फलंदाजी करणं, हे आव्हानात्मक असलं तरीही आपण चार बाद 45, सात बाद 74असं घसरणं हे आपल्या लौकिकाला साजेसं नाही.

क्रिकइन्फोच्या मुलाखतीत माजी कसोटीपटू वसिम जाफरने आपल्या दुसऱ्या डावातील अप्रोचवर बोट ठेवलं. तो म्हणाला, 145 चं टार्गेट गाठताना आपण बचावात्मक पवित्रा घेतला होता. राहुल, गिलसारखे फलंदाज आघाडीला असताना हे योग्य नव्हे. पॉझिटिव्ह अप्रोच किती महत्त्वाचा असतो, हे आपण याआधी पाहिलंय. बांगलादेशविरुद्ध जर आपण असा दबाव घेऊन खेळणार असू तर फेब्रुवारीत आपली गाठ ऑस्ट्रेलियन टीमशी पडणार आहे. आपण त्यांच्याच अंगणात त्यांचा वृक्ष कसोटी मालिकेत दोनदा उपटून आलोय. त्यामुळे ते चवताळलेले असणार यात शंका नाही. म्हणून आपण सकारात्मक किंबहुना आक्रमक दृष्टिकोन घेऊन खेळणं हीच काळाची गरज आहे.

इथे अश्विन आणि श्रेयस अय्यरची पाठ मात्र थोपटायला हवी. सात बाद 74 वरुन त्यांनी सामना फिरवला. अश्विनने ऑस्ट्रेलियात हनुमा विहारीसोबत केलेला पराक्रम आपण साऱ्यांनीच पाहिलाय. तिथे ऑसी तोफांचे व्रण अंगावर घेत त्याने गड राखला होता. इथे अश्विन पॉझिटिव्ह खेळला. त्याने 62 चेंडूंमध्ये 42 धावा या 67.74 च्या स्ट्राईक रेटने त्याने केल्या. चार चौकार, एक षटकारही ठोकला. अश्विनच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये 13 अर्धशतकं आणि 5 शतकं आहेत. ही कामगिरी त्याला फलंदाजाच्या व्याख्येत परिपूर्णपणे बसवते. त्याच्याकडून अशाच सातत्याची अपेक्षा आपण यापुढेही करु शकतो. पण, आघाडीच्या फळीकडून अशाच सातत्याने कोलमडण्याची अपेक्षा नको ठेवायला. कारण, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाचा पेपर आपल्याला सोडवायचाय. ऑसी मंडळी खिंडीत गाठलं की, चिरडून टाकतात. ती पुन्हा तुम्हाला बचावाचा दोर टाकायला देत नाहीत. त्यामुळे आघाडीच्या फळीने अधिक जबाबदारीने आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

 अक्षर पटेलचंही इकडे कौतुक होणं गरजेचं आहे. चौथ्या डावात चौथ्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर त्याने 88 मिनिटे खेळपट्टीवर तग धरला. इतकंच नव्हे तर रथीमहारथी धारातीर्थी पडत असताना त्याने 69 चेंडूंमध्ये 34 धावा केल्या. स्ट्राईक रेट जरी 50 च्या आसपास असला तरी तेव्हा तो नकारात्मक खेळला नाही. त्याने धावफलक हलता ठेवला. गेल्या काही वर्षामधला ट्रेंड पाहिला तर बहुतांशवेळा आपल्याला मधल्या फळीने किंवा लोअर मिडल ऑर्डरने पराभवाच्या खाईतून वाचवलंय. पंत, वॉशिंग्टन सुंदर, हनुमा विहारी, अश्विन आणि कंपनीमुळे आपली मधल्या फळीची ताकद वाढली असली तरीही आघाडीच्या ताकदीचं दर्शन अधूनमधून घडत असल्याने त्यांच्यावर जरा अतिच अवलंबून राहावं लागतंय. 

अलिकडच्या काळातील इंग्लंडचा अप्रोच पाहा. आपल्याविरुद्ध टी-ट्वेन्टी वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये म्हणजे नॉकआऊट मॅचमध्ये 168 च्या आव्हानात्मक लक्ष्याचा त्यांनी पालापाचोळा केला. तो याच सकारात्मक आणि आक्रमक खेळाने. अगदी स्टीव्ह वॉची टीम जेव्हा 2001 च्या मोसमात सलग 16 कसोटी जिंकली होती, तेव्हाही त्यांचा ‘अटॅक इज अ बेस्ट वे ऑफ डिफेन्स’चाच नारा असायचा. आपल्याकडे उत्तम दर्जाचे आणि आक्रमक बाणा असलेले खेळाडू असून आपण काही वेळा अकारण बचावात्मक पवित्रा घेतो. ते टाळलं तर भारताचा विजयरथ रोखणं सोपं असणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिका विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन करतानाच याही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या, सावध राहायला हवं आणि आक्रमकही. त्यांच्याच भूमीवरील दोन मालिकेतल्या पराभवाने जखमी ऑसी फेब्रुवारीत चाल करुन येतायत. त्यांच्या खेळाची चाल बिघडवण्यासाठी त्यांच्यावरच प्रतिहल्ल्याची चाल खेळायलाच हवी.

 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 24 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis on Kunal Kamra : प्रसिद्धीसाठी सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्या लोकांना धडा शिकवावाच लागेलंABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 24 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
हॉटेलच्या रुममध्ये 1 अल्पवयीन तरुण अन् तब्बल 22 तरुणी; सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली
हॉटेलच्या रुममध्ये 1 अल्पवयीन तरुण अन् तब्बल 22 तरुणी; सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली
Uddhav Thackeray on Eknath Shinde : गद्दार, मिंधे, मिंधे गटानंतर आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंना उद्देशून आता XXX नवीन शब्द वापरला! शिवसैनिकांचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?
Video : गद्दार, मिंधे, मिंधे गटानंतर आता उद्धव ठाकरेंनी शिंदेंना उद्देशून आता XXX नवीन शब्द वापरला! शिवसैनिकांचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?
Jitendra Awhad: बेशरमपणे पोलिसांच्या पाठबळ देणाऱ्या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट लागेल, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
पाशवी बहुमत मिळतं तेव्हा लोकशाहीवर पाशवी बलात्कार होतात, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले
Sanjay Raut & Ujjwal Nikam : संजय राऊत-उज्ज्वल निकम अचानक आमनेसामने, हात मिळवला, खळखळून हसले अन्...; नेमकं काय घडलं?
संजय राऊत-उज्ज्वल निकम अचानक आमनेसामने, हात मिळवला, खळखळून हसले अन्...; नेमकं काय घडलं?
Embed widget