एक्स्प्लोर

BLOG | कपिल देव दा जवाब नही..

BLOG : महान माणसं त्यांच्या कार्यक्षेत्रातील योगदानाने तुम्हाला शिकवतातच. शिवाय त्यांच्या माणूसपणानेही ती तुमच्या डोळ्यात अंजन घालतात. 'ग्रेट कपिल देव' यांचा 'माझा कट्टा' पाहताना हाच अनुभव आला. '83' चित्रपटाच्या निमित्ताने कपिल देव कट्ट्यावर आले होते. त्या विश्वविजयाच्या कहाण्या आमच्या पिढीने ऐकल्यात. यू-ट्यूबवर पाहिल्यात. पण, त्या कहाणीचा नायकच कहाणी घडतानाचा प्रवास थेट मांडत होता. यातल्या काही वाक्यांनी कपिल यांच्याबद्दलचा आदर कमालीचा वाढला. खरं तर ज्या पद्धतीने, ज्या साधेपणाने ते कट्ट्यावर गप्पा मारत होते, तेही भावलं. विश्वविजेत्या कॅप्टनची झूल घालून ते बोलायला बसले नव्हते. तर, आपल्यातलेच एक होऊन गप्पा मारत होते. तरीही आपला आणि इतरांचा आब राखत. त्यांचं सर्वात आवडलेलं वाक्य म्हणजे सिनेमा बनताना मी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली, सिनेमा 83 टीमवर आहे, कपिलवर नाही. माझ्या रोलला थोडं जास्तच वेटेज दिलंय. असंही एक वाक्य ते बोलून गेले.. विचार करा, क्रिकेटचा महानायक सांगतोय, मी हीरो नाही! माझी टीम, त्यांचा परफॉर्मन्स खरे नायक आहेत. ते समोर येऊ द्या. त्याच वेळी ते असंही म्हणाले, टीम इज बिगर, कंट्री इज इव्हन बिगर. नो प्लेयर इज बिगर दॅन कंट्री.

मनात आणलं असतं तर ते सिनेमाचा फोकस आपल्याकडे वळवू शकले असते, तोही हिटच झाला असता. पण त्यांनी तसं केलं नाही. टीमची महती त्यांनी हायलाईट करायला सांगितली. वैयक्तिक कामगिरी नव्हे. आजच्या जमान्यात आपण न केलेल्या कामाचंही श्रेय लाटण्यासाठी काही वेळा लोकांमध्ये अहमहमिका लागलेली असते. काही जण यात यशस्वीही होतात. अशा सगळ्यांसाठी हा डोळे उघडणारा अनुभव ठरावा. याच कट्ट्यावर झिम्बाब्वेविरुद्धच्या ऐतिहासिक खेळीबद्दल त्यांना विचारलं असता, ते म्हणाले "स्टोरी बनवायची असेल तर काय मी ती बनवून बढा चढा के सांगू शकतो." असं म्हणत त्यांनी त्या इनिंगबद्दल आपल्याला आठवतंय ते मोकळेपणाने पण, अतिरंजितपणाचा लवलेशही न आणता सांगितलं.

एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मै कॅप्टन मैदान मे हूँ, बाहर नही.. ही बाब मी नेमकी लक्षात ठेवलेली. त्यामुळे संघात वयाने, अनुभवाने सीनीयर मंडळींचेही कान टोचायला आपण कमी करत नसू. संध्याकाळी मग मोकळेपणाने सॉरीही बोलायचो. शाम को सब मेरा मजाक उडाते थे..किती सहज ते बोलून गेले. आपल्यावर होणारे जोक्स, आपली होणारी थट्टामस्करी इतक्या विशाल मनाने एक्सेप्ट करणारं कपिल देव यांच्यासारखं व्यक्तिमत्व विरळच म्हणावं लागेल.

आपल्यावेळी क्रिकेटसाठी इतका सपोर्ट स्टाफ, अशा प्रगत जीम वगैरे सारख्या सोयीसुविधा नव्हत्या, असं सांगतानाच त्यांनी आपल्या फिटनेसवर उपलब्ध साधनांच्या आधारे आपण कशी मेहनत घेतली हेही सांगितलं.

याशिवाय ज्या एकमेव मॅचमध्ये त्यांना ड्रॉप करण्यात आलं, त्याबद्दलही खुल्या दिलाने मत मांडलं. ते म्हणाले, कोई बुरा शॉट खेलेगा तो क्या होगा.. असं म्हणत आपल्यावर झालेल्या कारवाईचं त्यांनी एक प्रकारे समर्थनच केलं. आपल्यावर झालेली कारवाई इतकी ग्रेसफुली रीसीव्ह करणं ही महानतेची साक्ष देणारी त्यांची आणखी एक क्वालिटी होती. 

माणसं आभाळाच्या उंचीएवढी मोठी होऊनही पाय जमिनीवर असणं म्हणजे काय, हे कपिल यांच्या बोलण्यातून ठायी ठायी जाणवत होतं. आपापल्या क्षेत्रात, मैदानात कपिल देव होण्याचा आपण साऱ्यांनीच प्रयत्न करायला हवा, ते किती जणांना साध्य होईल, माहीत नाही. पण, मैदानाबाहेरचे महान माणूस असलेले कपिल देव आपण नक्की होऊ शकतो. किमान तो प्रयत्न अधिक नेटाने करु शकतो. क्रिकेटची विजयगाथा उलगडतानाच माणूसपणाची त्यांनी उंचावलेली ट्रॉफी हे नवीन वर्षाच्या निमित्ताने आपलं लक्ष्य ठेवूया, काय वाटतं तुम्हाला? 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget