एक्स्प्लोर

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात जूनमध्ये अपेक्षित पाऊस नाहीच, विदर्भात कमी पावसाची नोंद; शेतीला मोठा फटका

Maharashtra Monsoon : जून महिन्यात एकूण सरासरीच्या 50 टक्के कमी पाऊस झाला आहे.  विदर्भात तर हा आकडा यापेक्षाही कमी आहे.

Monsoon Update : राज्यात बहुतांश (Maharashtra Rain Update) ठिकाणी जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मागील आठवड्यापासून  पावसाचं आगमन झालं आहे. मात्र जून महिन्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित होतं, तेवढा पाऊस अजून पडलेला नाही.

जून महिन्यात एकूण सरासरीच्या 50 टक्के कमी पाऊस झाला आहे.  विदर्भात तर हा आकडा यापेक्षाही कमी आहे. कारण राज्यात सर्वात कमी पाऊस विदर्भात झाला आहे. राज्याच्या  परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यात पावसानं जूनची सरासरी ओलांडली आहे. या तिन जिल्ह्यात मिळून सरासरी 32 टक्के अधिक पाऊस पडला आहे.

संपूर्ण देशाचा विचार केला तर आतापर्यंत जूनच्या सरासरीच्या 10 टक्के कमी पाऊस झालेला आहे. विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सरासरीच्या अंदाजित 50  टक्के पाऊस झाले आहे. विदर्भात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्याने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. 

शेतकऱ्यांसाठी चिंतेचं वातावरण

मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसामध्ये सातत्य नाही. त्यामुळे पेरणीसाठी अपेक्षित पाऊसच झालेला नाही. खरीप हंगामाचा महत्त्वाचा असताना पावसाच्या या लहरीपणामुळे  पेरणी करावी की नाही या संभ्रमात राज्यातील शेतकरी आहे.   पावसाअभावी अनेक ठिकाणी शेती ओसाड पडल्या आहेत. तर धरणांमधील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर पोहचल्याने पिण्याच्या पाण्याचीही गंभीर टंचाई निर्माण झाली होती. अशातच महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडणार असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले होते.

हिंगोली जिल्ह्यात फक्त तीन टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण 

जून महिना ओलांडला तरी हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमधील पेरण्या शिल्लक आहेत.  पुरेसा पाऊस न झाल्याने बळीराजाने पेरणी करायचे टाळले आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये फक्त 14हजार180 हेक्टर शेत जमिनीवर पेरणी झाली आहे म्हणजेच फक्त तीन टक्के जमिनीवर पेरणी झाल्याची प्रशासकीय माहिती आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकांमध्ये ही बदल होण्याची शक्यता आहे.  या वर्षी हळद लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे तर सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.  कापसाला आणि सोयाबीनला यावर्षी चांगला भाव होता तोच भाव पुढील वर्षी राहिल यामुळे या पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. परंतु त्या अगोदर वरुणराजाने कृपा करावी आणि शेतकऱ्यांचा पेरण्या पूर्ण व्हाव्यात अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत
Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार, अधिवेशनात 10 विधेयके मांडणार, विरोधकांनी संवाद ठेवला तर चर्चेतून मार्ग काढू : मुख्यमंत्री
महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार, अधिवेशनात 10 विधेयके मांडणार, विरोधकांनी संवाद ठेवला तर चर्चेतून मार्ग काढू : मुख्यमंत्री
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
दिलासादायक! मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण, कधीपासून सुरु होणार पाऊस? महत्वाची अपडेट समोर 
दिलासादायक! मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण, कधीपासून सुरु होणार पाऊस? महत्वाची अपडेट समोर 

व्हिडीओ

Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde On Omraje Nimbalkar: वडिलांच्या मृत्यूबाबत विरोधात निकाल; लगेच एकनाथ शिंदेंनी ओमराजे निंबाळकरांना फोन फिरवला, एकच शब्द दिला!
वडिलांच्या मृत्यूबाबत विरोधात निकाल; लगेच एकनाथ शिंदेंनी ओमराजेंना फोन फिरवला, एकच शब्द दिला!
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Embed widget