एक्स्प्लोर
Maharashtra Politics: बच्चू कडूंच्या आंदोलनाला आता मनोज जरांगेंची एन्ट्री, नागपूरकडे रवाना
नागपूरमध्ये (Nagpur) प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पाठिंबा जाहीर केला असून ते नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. 'अटीतटीची वेळ असते तेव्हा शेतकरी मायबापासाठी सगळ्यांनी सहकार्य केले पाहिजे', असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बच्चू कडू शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह (Farm Loan Waiver) विविध मागण्यांसाठी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत उच्च न्यायालयाने रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या प्रवेशामुळे या आंदोलनाला आता नवीन बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, सरकारवरील दबाव वाढला आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















