एक्स्प्लोर
Farmers Protest: 'सरकारनं डाव टाकला', Manoj Jarange यांचा गंभीर आरोप, Kadu यांच्या आंदोलनात सहभाग
मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नागपुरातील शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) सहभाग घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'सरकारने काल आंदोलनावर डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलो आणि आंदोलनात सहभागी झालो,' असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी हे आंदोलन पुकारले आहे. आपल्याला षडयंत्र आणि डावाला प्रतिडावानेच उत्तर द्यावे लागेल, असेही जरांगे म्हणाले. दरम्यान, सरकारसोबत चर्चेसाठी बच्चू कडू मुंबईला जाणार असून, तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
















