एक्स्प्लोर

Mobile Phone: भारतातील मोबाईल फोन सेवेला 28 वर्षे...कोणी कोणाला केला पहिला कॉल

Mobile Phone: आजच्या दिवशी भारतात पहिला मोबाईल फोन करण्यात आला. भारतातील मोबाईल सेवेला आज 28 वर्षे झाली आहेत. जाणून घेऊयात त्याचा रंजक इतिहास...

India First Mobile Call:  कधीकाळी भारतात महागडी आणि उच्चमध्यमवर्गीयांसाठी समजली जाणारी मोबाईल फोन सेवेला आज 28 वर्षे झाली आहेत. आजच्या दिवशी भारतात पहिला मोबाईल फोन करण्यात ( First Mobile Phone Call) आला. आज मोबाईलवर येणारे काही अंशी कॉल फ्री असले तरी सुरुवातीच्या काळात इनकमिंग आणि आउटगोईंगसाठी पैसे भरावे लागत असे. आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मोबईलचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. भारतातील मोबाईल फोन सेवेच्या या 28 वर्षात मोबाईल फोन सेवा फक्त फोन कॉलसाठी राहिली नसून माहिती मिळवण्याचे साधन, सोशल मीडिया, मनोरंजनाचे साधन म्हणूनही पाहिले जात आहे.

मोबाईल क्रांतीची सुरुवात... 

भारतात मोबाइल क्रांतीचा पाया रचण्याचे काम तत्कालीन दूरसंचार मंत्री पंडित सुखराम यांनी केले होते. भारतात सध्या किमान प्रत्येक घरात एक तरी मोबाइलधारक दिसतो. याचे श्रेय पंडित सुखराम यांना जाते. भारतात पहिला मोबाइल कॉलदेखील त्यांनी केला होता. 

जपानमधून भारतात आला मोबाइल फोन

पंडित सुखराम यांनी भारतात मोबाइल सेवा सुरू करण्याचा किस्साही रंजक आहे. पंडित सुखराम हे दूरसंचार मंत्री असताना जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी कार चालकाच्या खिशात मोबाइल फोन पाहिला होता. जपानमध्ये असे तंत्रज्ञान असू शकतं मग, भारतात का नाही? असा विचार त्यांनी केला. त्यानंतर भारतात मोबाइल फोन सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एका जाहीर सभेतही त्यांनी येणाऱ्या काही वर्षात तुमच्या खिशात मोबाइल फोन असेल असे म्हटले. त्यावेळी लोकांनी या वक्तव्याला हसण्यावारी नेले होते. साधा लँडलाइन फोनसाठीदेखील त्यावेळी लोकांना काही महिने प्रतिक्षा करावी लागायची. त्यामुळे मोबाइल फोन कुठून येणार, अशी लोकांनी उपस्थित केलेली शंका योग्यच होती.

भारतातील पहिला मोबाइल कॉल

पंडित सुखराम हे 1993 ते 1996 या काळात दूरसंचार मंत्री होते.  भारतात 31 जुलै 1995 रोजी पहिल्यांदा मोबाइल फोनमधून कॉल करण्यात आला होता. हा पहिला मोबाइल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या दरम्यान झाला होता. यासाठी नोकिया कंपनीचा हँडसेट वापरण्यात आला होता. मोबाईल नेटवर्क मोदी टेलस्ट्राची मोबाईलनेट कंपनीचे होते. ही कंपनी भारताच्या बीके मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेलस्ट्रा यांच्यातील संयुक्त उपक्रम होती. कलकत्ता (आता कोलकाता) आणि नवी दिल्ली या दोन ठिकाणा दरम्यान हा पहिला मोबाईल कॉल करण्यात आला होता.


सुरुवातीचे मोबाईल सेवेचे दर

सुरुवातीला फोन करण्यासाठी 16 रुपये 40 पैसे प्रति मिनीट असे शुल्क आकारण्यात येत होते. इनकमिंग कॉललाी शुल्क लागू होते.  त्यासाठी 8 रुपये 40 पैसे असा दर होता. पहिल्या तीन वर्षांपर्यंत देशातील मोबाईलधारकांची संख्या 8 लाखांपर्यंत पोचली होती. 

‘विदेश संचार निगम लिमिटेड’ने 1995 मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीयांना इंटरनेट सेवेची भेट दिली. ‘व्हीएसएनएल’ने देशात गेटवे इंटरनेट ॲक्‍सेस सर्व्हिस सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. सुरुवातीच्या टप्प्याता इंटरनेट सेवा चार महानगरांपर्यंतच मर्यादित होती. इंटरनेटसाठी त्या वेळी 250  तासांसाठी पाच हजार रुपये शुल्क होते. खासगी कंपन्यांसाठी हा दर 15 हजार रुपये होता.  सुरुवातीच्या टप्प्यात नोकिया, सिमेन्स, मोटारोला आणि एरिक्सन यांसारख्या कंपन्या मोबाईल हॅण्डसेट तयार करत असे. त्यांचे दरही आजच्या तुलनेत महाग होते.  

श्रीकांत भोसले
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 
AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
Mobile Charger : सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Tigress Attack in Chandrapur: जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चंद्रपूरच्या चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Is Kangana Ranaut Married Secretly: गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा; कंगना रनौतनं खरंच गुपचूप उरकलं लग्न? VIDEO
Manoj Jarange Patil on Prasad Lad: जरांगेंच्या भेटीआधीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मराठा समाजाला...'
जरांगेंच्या भेटीआधीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मराठा समाजाला...'
Mumbai Metro Aqua Line: मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी
मुंबईतील अ‍ॅक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड; मेट्रो 40 मिनिटांपासून एकाच जागेवर, स्थानकावरही प्रवाशांची गर्दी
Deool Band 2 Box Office Collection Day 1: महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशी कमाई किती?
महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल
Vastu Tips : चिमणी, पोपट की कबूतर? कोणकोणते पशु-पक्षी घरात येणं शुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
चिमणी, पोपट की कबूतर? कोणकोणते पशु-पक्षी घरात येणं शुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
Sangli Crime News: सांगलीत चोरीचा अजब प्रकार! चोरट्यांनी चक्क मोबाईल टॉवरच केला लंपास, सांगाड्यापासून जनरेटरपर्यंत सगळंच गायब, PHOTO
सांगलीत चोरीचा अजब प्रकार! चोरट्यांनी चक्क मोबाईल टॉवरच केला लंपास, सांगाड्यापासून जनरेटरपर्यंत सगळंच गायब, PHOTO
Embed widget