एक्स्प्लोर

चेन्नईचा नवा ‘सुपर किंग’

चेन्नई सुपर किंग्सचा अंबाती रायुडू यंदाच्या आयपीएल मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चेन्नईच्या आठ सामन्यांमध्ये त्यानं ३७० धावांचा रतीब घालून, ऑरेंज कॅपचा मान मिळवला आहे. अंबाती रायुडूचा हा फॉर्म पाहता तो पुन्हा भारतीय संघातल्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या शर्यतीत दाखल झाला आहे.

अंबाती रायुडू... हा आहे चेन्नई सुपर किंग्समधला एक नवा किंग... 2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर चेन्नई सुपर किंग्सनं यंदाच्या आयपीएल मोसमात मोठ्या धडाक्यात पुनरागमन केलं. सुपर किंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं आठपैकी सहा सामन्यांमध्ये विजय साजरा केला आहे. आणि चेन्नईच्या त्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो अंबाती रायुडू. अंबाती रायुडूनं यंदाच्या मोसमातल्या आठ सामन्यांमध्ये अनुक्रमे 22, 39, 49, 12, 79, 82, 46 आणि 41 असा मिळून 370 धावांचा रतीब घातला आहे. त्याचा 156.11 हा स्ट्राईक रेट भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावत आहे. आयपीएलच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेन्ज कॅप सध्या रायुडूच्या डोक्यावर आहे. त्यामुळं चेन्नईच्या ताफ्यातला यंदाच्या मोसमातला एक प्रमुख शिलेदार म्हणून अंबाती रायुडूचा उल्लेख होत आहे. भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकरनं अंबाती रायुडूच्या कामगिरीची तारीफ केली आहे. रायुडूच्या कामगिरीचं विश्लेषण करताना मांजरेकर म्हणतो की, रायुडूनं केवळ खराब चेंडूवरच नाही तर चांगल्या चेंडूंवरही षटकार ठोकले आहेत. अंबाती रायुडू हा आयपीएलच्या पहिल्या दोन मोसमांमध्ये खेळला नव्हता. आयपीएलच्या तिसऱ्या मोसमात म्हणजेच 2010 साली मुंबई इंडियन्सनं त्याला आपल्या ताफ्यात सामील केलं होतं. त्यानंतर सलग सात मोसम रायुडूनं मुंबई इंडियन्सकडून आयपीएल रणांगणात सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. त्यानं मुंबई इंडियन्सकडून खेळताना 114 सामन्यांत 2416 धावा फटकावल्या होत्या. त्यात 16 खणखणीत अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलच्या निर्देशानुसार, यंदा आठही फ्रँचाईझींनी नव्यानं संघबांधणी केली. त्यासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सचा हा हीरा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्य़ा हाती लागला. त्यामुळं मुंबई इंडियन्सचं नुकसान झालं, पण चेन्नईला सुपर जॅकपॉट लागला. अंबाती रायुडू हे नाव भारतीय क्रिकेटला तसं नवं नाही. 2004 सालच्या अंडर नाईन्टिन विश्वचषकानंतर रायुडूमधली गुणवत्ता खऱ्या अर्थानं समोर आली. त्यावेळी भारतानं रायुडूच्या नेतृत्वाखाली अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली होती. पण त्यानंतर तो बीसीसीआयची मान्यता नसलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाला. त्यामुळं रायुडूच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला विराम मिळाला. कारण बीसीसीआयनं आयसीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंवर बंदी घातली होती. बीसीसीआयनं 2010 साली ही बंदी मागं घेतली आणि रायुडूसाठी आयपीएलचे दरवाजे खुले झाले. अंबाती रायुडूनं आयपीएलमधल्या पदार्पणानंतर, 2013 साली रायुडूनं वन डे क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. तो 2013 ते 2015 या दोन वर्षांमध्ये भारताकडून 34 वन डे सामन्यांमध्ये खेळला. या कालावधीत त्याच्या नावावर 50.24 च्या सरासरीनं 1050 धावा जमा आहेत. त्याशिवाय रायुडूनं सहा ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या या शिलेदाराला यंदाच्या आयपीएल मोसमात गवसलेला सूर पाहता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीलाही पुन्हा चालना मिळू शकते. टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध आहे. सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांच्यामधली चुरस टीम इंडियाला एक चांगला पर्याय देऊ शकते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harbhajan Singh On West Bengal Election Result 2026: भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?
भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?
Thalapathy Vijay TVK Win Jofra Archer Tweet Viral: थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
Raghu Sharma MI vs LSG IPL 2026: राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट...; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वाचत बसले!
राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट...; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वाचत बसले!
Rohit Sharma MI vs LSG IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget