एक्स्प्लोर

चेन्नईचा नवा ‘सुपर किंग’

चेन्नई सुपर किंग्सचा अंबाती रायुडू यंदाच्या आयपीएल मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चेन्नईच्या आठ सामन्यांमध्ये त्यानं ३७० धावांचा रतीब घालून, ऑरेंज कॅपचा मान मिळवला आहे. अंबाती रायुडूचा हा फॉर्म पाहता तो पुन्हा भारतीय संघातल्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या शर्यतीत दाखल झाला आहे.

अंबाती रायुडू... हा आहे चेन्नई सुपर किंग्समधला एक नवा किंग... 2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर चेन्नई सुपर किंग्सनं यंदाच्या आयपीएल मोसमात मोठ्या धडाक्यात पुनरागमन केलं. सुपर किंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं आठपैकी सहा सामन्यांमध्ये विजय साजरा केला आहे. आणि चेन्नईच्या त्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो अंबाती रायुडू. अंबाती रायुडूनं यंदाच्या मोसमातल्या आठ सामन्यांमध्ये अनुक्रमे 22, 39, 49, 12, 79, 82, 46 आणि 41 असा मिळून 370 धावांचा रतीब घातला आहे. त्याचा 156.11 हा स्ट्राईक रेट भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावत आहे. आयपीएलच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेन्ज कॅप सध्या रायुडूच्या डोक्यावर आहे. त्यामुळं चेन्नईच्या ताफ्यातला यंदाच्या मोसमातला एक प्रमुख शिलेदार म्हणून अंबाती रायुडूचा उल्लेख होत आहे. भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकरनं अंबाती रायुडूच्या कामगिरीची तारीफ केली आहे. रायुडूच्या कामगिरीचं विश्लेषण करताना मांजरेकर म्हणतो की, रायुडूनं केवळ खराब चेंडूवरच नाही तर चांगल्या चेंडूंवरही षटकार ठोकले आहेत. अंबाती रायुडू हा आयपीएलच्या पहिल्या दोन मोसमांमध्ये खेळला नव्हता. आयपीएलच्या तिसऱ्या मोसमात म्हणजेच 2010 साली मुंबई इंडियन्सनं त्याला आपल्या ताफ्यात सामील केलं होतं. त्यानंतर सलग सात मोसम रायुडूनं मुंबई इंडियन्सकडून आयपीएल रणांगणात सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. त्यानं मुंबई इंडियन्सकडून खेळताना 114 सामन्यांत 2416 धावा फटकावल्या होत्या. त्यात 16 खणखणीत अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलच्या निर्देशानुसार, यंदा आठही फ्रँचाईझींनी नव्यानं संघबांधणी केली. त्यासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सचा हा हीरा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्य़ा हाती लागला. त्यामुळं मुंबई इंडियन्सचं नुकसान झालं, पण चेन्नईला सुपर जॅकपॉट लागला. अंबाती रायुडू हे नाव भारतीय क्रिकेटला तसं नवं नाही. 2004 सालच्या अंडर नाईन्टिन विश्वचषकानंतर रायुडूमधली गुणवत्ता खऱ्या अर्थानं समोर आली. त्यावेळी भारतानं रायुडूच्या नेतृत्वाखाली अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली होती. पण त्यानंतर तो बीसीसीआयची मान्यता नसलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाला. त्यामुळं रायुडूच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला विराम मिळाला. कारण बीसीसीआयनं आयसीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंवर बंदी घातली होती. बीसीसीआयनं 2010 साली ही बंदी मागं घेतली आणि रायुडूसाठी आयपीएलचे दरवाजे खुले झाले. अंबाती रायुडूनं आयपीएलमधल्या पदार्पणानंतर, 2013 साली रायुडूनं वन डे क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. तो 2013 ते 2015 या दोन वर्षांमध्ये भारताकडून 34 वन डे सामन्यांमध्ये खेळला. या कालावधीत त्याच्या नावावर 50.24 च्या सरासरीनं 1050 धावा जमा आहेत. त्याशिवाय रायुडूनं सहा ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या या शिलेदाराला यंदाच्या आयपीएल मोसमात गवसलेला सूर पाहता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीलाही पुन्हा चालना मिळू शकते. टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध आहे. सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांच्यामधली चुरस टीम इंडियाला एक चांगला पर्याय देऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs ZIM 1st T20 Team India Playing XI: प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget