एक्स्प्लोर

IND vs PAK : फिरसे एक बार.... मौका मौका

आयसीसीने टी20 विश्वचषकाची गटवारी नुकतीच जाहीर केली. यात भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.

ICC T20 World Cup 2021 Groups : क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान संघातला सामना म्हटला की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच. दोन वर्षांपूर्वी आयसीसीच्या वन डे विश्वचषकात याच दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना रंगला होता. आणि आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. निमित्त आहे आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचे.

आयसीसीने टी20 विश्वचषकाची गटवारी नुकतीच जाहीर केली. यात भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. ब गटातल्या या संघांमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडसह पात्रता फेरीतल्या दोन संघांचा समावेश असणार आहे. तर अ गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पात्रता फेरीतून येणारे दोन संघ असतील. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे.

विश्वचषकात टीम इंडियाच सरस

ट्वेन्टी ट्वेन्टी असो किंवा वन डे विश्वचषक. क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावरच्या या महासंग्रात नेहमीच टीम इंडियानं वर्चस्व गाजवले आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आजवर भारत आणि पाकिस्तान संघात पाच लढती झाल्या आहेत. त्या पाचही लढतीत भारतीय संघ वरचढ ठरला आहे. 2007 च्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने पाकिस्तानचाच पराभव करत अजिंक्यपद पटकावले होते. 1992 पासून वन डे विश्वचषकतही भारताने विजयाची परंपरा 2019 च्या इंग्लंडमधल्या विश्वचषकापर्यंत कायम राखली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाकिस्तानवर वर्चस्व गाजवण्याचा 'मौका' टीम इंडियाला मिळणार आहे.

स्पर्धा परदेशात पण, यजमान भारतच!

खरंतर यंदाचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक भारतात होणार होता. पण भारतातल्या कोरोना परिस्थितीमुळे बीसीसीआयने स्पर्धा परदेशात खेळवण्याचा निर्णय घेतला.  संयुक्त अरब अमिरात आणि  ओमान या दोन देशातल्या चार शहरांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. पण स्पर्धा देशाबाहेर असली तरी यजमानपद मात्र भारताकडेच राहणार आहे.

संबंधित बातम्या :

ICC T20 World Cup 2021 Groups : आयसीसीकडून टी-20 वर्ल्डकपमधील ग्रुपची घोषणा; भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
KKR vs GT IPL 2026 : केकेआरच्या विजयाने गेम फिरवला! सगळं काही पणाला लावूनही गुजरातचे प्लेऑफचं तिकीट हुकलं, टॉप-4ची रेस झाली आणखी तगडी
केकेआरच्या विजयाने गेम फिरवला! सगळं काही पणाला लावूनही गुजरातचे प्लेऑफचं तिकीट हुकलं, टॉप-4ची रेस झाली आणखी तगडी
KKR vs GT LIVE score IPL 2026 : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
KKR vs GT LIVE Update : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
IPL 2026 RCB Playoffs Scenarios : टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल
टेबल टॉपवर असूनही RCB जाणार बाहेर? आयपीएलमध्ये समोर आलं धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावेल

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Embed widget