एक्स्प्लोर

IND vs AUS 3rd Test 4th Day : टीम इंडिया विजयापासून दोन विकेट्स दूर

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारतीय आक्रमणासमोर लोटांगण घातलं. पण कमिन्स आणि लायन या जोडीनं नवव्या विकेटसाठी अभेद्य 43 धावांची भागीदारी करत भारताचा विजय लांबवला.

मेलबर्न : पॅट कमिन्स आणि नॅथन लायनच्या झुंजार भागिदारीमुळे मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर आठ बाद 258 धावांची मजल मारली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अजूनही जिंकण्यासाठी 141 धावांची गरज आहे. तर भारत विजयापासून दोन विकेट्स दूर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारतीय आक्रमणासमोर लोटांगण घातलं. पण कमिन्स आणि लायन या जोडीनं नवव्या विकेटसाठी अभेद्य 43 धावांची भागीदारी करत भारताचा विजय लांबवला. भारताकडून रविंद्र जाडेजानं तीन फलंदाजांना माघारी धाडल. जसप्रीत बुमरा आणि शमीने दोन तर ईशांत शर्माने एक विकेट घेतली. त्याआधी आजच्या पहिल्या सत्रात भारतानं दुसरा डाव आठ बाद 106 धावांवर घोषित केला. तिसरा दिवस टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची मोठी आघाडी घेतली खरी, पण दुसऱ्या डावात भारताची पाच बाद 54 अशी दाणादाण उडाली. अर्थात या परिस्थितीतही या कसोटीवर टीम इंडियाचा वरचष्मा दिसून येत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने एकूण 346 धावांची आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मयांक अगरवाल 28, तर रिषभ पंत सहा धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं दुसऱ्या डावात टीम इंडियाला एकापाठोपाठ एक दणके दिले. त्याने हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर जोश हेजलवूडनं रोहित शर्माला बाद करुन टीम इंडियाला पाचवा धक्का दिला. दुसरा दिवस ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या मेलबर्न कसोटीत दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिला डाव सात बाद 443 धावांवर घोषित केला. पुजाराने कसोटी कारकीर्दीतलं आपलं सतरावं शतक साजरं केलं. पुजाराने 10 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तर कर्णधार कोहलीनं नऊ चौकारांसह 82 धावांचं योगदान दिलं. पुजारा आणि विराटनं तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या रोहित शर्मानंही 63 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने तीन आणि मिचेल स्टार्कने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर नॅथन लायन आणि हेजलवूडनं प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद आठ धावांची मजल मारली होती. पहिला दिवस पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांच्या जोरावर दोन बाद 215 धावांची मजल मारली होती. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार कोहली 47 तर पुजारा 68 धावांवर खेळत होता. विराट आणि पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 92 धावांची अभेद्य भागीदारी आणि पदार्पणवीर मयांक अगरवालची अर्धशतकी खेळी हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं. मयांकनं आठ चौकार आणि एका षटकारासह 76 धावांची खेळी उभारली. भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्नाटकच्या मयांक अगरवालनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs RCB LIVE Score : धरमशाळेत आरसीबीची 'राॅयल' विजय; शशांकची झुंज व्यर्थ, पंजाबचा 23 धावांनी गेम ओव्हर
PBKS vs RCB LIVE Update : धरमशाळेत आरसीबीची 'राॅयल' विजय; शशांकची झुंज व्यर्थ, पंजाबचा 23 धावांनी गेम ओव्हर
DC vs RR LIVE Score IPL 2026 : हारला तर संपला! दिल्लीने जिंकला टॉस, राजस्थान रॉयल्सला दिले फलंदाजीचे आमंत्रण
DC vs RR LIVE Update : हारला तर संपला! दिल्लीने जिंकला टॉस, राजस्थान रॉयल्सला दिले फलंदाजीचे आमंत्रण
Ind vs Afg Test : साईचा पत्ता कट, सरफराजला मिळणार सुवर्णसंधी? अफगाणिस्तानविरुद्ध असा असणार 15 खेळाडूंचा टीम इंडियाचा Squad
साईचा पत्ता कट, सरफराजला मिळणार सुवर्णसंधी? अफगाणिस्तानविरुद्ध असा असणार 15 खेळाडूंचा टीम इंडियाचा Squad
IPLचं वेळापत्रक बदलणार, प्रेक्षकांना नो एन्ट्री, सरकार घेणार अंतिम निर्णय; मोठ्या संकटावेळी BCCI काय करणार?
IPLचं वेळापत्रक बदलणार, प्रेक्षकांना नो एन्ट्री, सरकार घेणार अंतिम निर्णय; मोठ्या संकटावेळी BCCI काय करणार?

व्हिडीओ

Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Devendra Fadnavis : जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
कर्जमाफी, पार्थ पवारांची भेट ते मनोज जरांगेंचं आंदोलन, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
Embed widget