एक्स्प्लोर

बीसीसीआयची घटनादुरुस्ती, राजकीय नेत्यांना क्रिकेट संघटनांचं मैदान पुन्हा मोकळं

BCCI : बीसीसीआयच्या घटनेमधल्या विविध सुधारणांसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मंजुरी ही भारतीय क्रिकेटवर दूरगामी परिणाम करणारी आहे.

BCCI's constitution amendments : बीसीसीआयच्या घटनेमधल्या विविध सुधारणांसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मंजुरी ही भारतीय क्रिकेटवर दूरगामी परिणाम करणारी आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना मिळालेली तीन वर्षांची आणखी एक टर्म भारतीय क्रिकेटमधल्या प्रशासकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरली आहे. त्याचवेळी बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या निवडणुका लढवण्यासाठी लोकप्रतिनिधींना मिळालेली मंजुरी राजकीय नेत्यांना क्रिकेट प्रशासनांचं मैदान पुन्हा मोकळं करणारी ठरणार का?  

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर सौरव गांगुली आणि सचिवपदावर जय शाह आणखी तीन वर्षे राहू शकतात, हे स्पष्ट झालं आणि भारतीय क्रिकेटच्या वर्तुळात आनंदाची लाट उसळली. भारतातल्या क्रिकेट संघटकांच्या चेहऱ्यांवर उमटलेला तो आनंद गांगुली आणि जय शाहांना मिळालेल्या तीन वर्षांच्या वाढीव टर्मसाठी नव्हता, तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानं सर्वांचाच राज्य संघटना आणि बीसीसीआयमध्ये मिळून सलग बारा वर्षे राहण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

लोढा समितीच्या शिफारशीनं सर्वोच्च न्यायालयानंच घातलेली तीन वर्षांच्या अनिवार्य विरामकाळाची अट क्रिकेट संघटकांसाठी जाचक ठरत होती. कारण या अटीमुळं बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनेतल्या प्रशासकांना सलग सहा वर्षांनी तीन वर्षांचा ब्रेक घ्यावाच लागत होता. अखेर सव्वा सहा वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला निवडणुकीसाठीच्या विविध अटी आणि शर्ती शिथील करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

त्यानुसार बीसीसीआयच्या घटनेत झालेली पहिली दुरुस्ती ही पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची आहे. या दुरुस्तीनुसार आता कुणीही पदाधिकारी राज्य संघटनेत सहा आणि बीसीसीआयमध्ये सहा अशी सलग बारा वर्षे कार्यभार सांभाळू शकणार आहे. याच घटनादुरुस्तीचा लाभ गांगुली आणि जय शाह यांना झाला आहे. त्या दोघांचा आपापल्या राज्य संघटनेत सहा आणि मग बीसीसीआयमध्ये तीन असा सलग नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. बीसीसीआयच्या घटनादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मंजुरीमुळं त्या दोघांना आणखी तीन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

बीसीसीआयच्या घटनादुरुस्तीत सर्वोच्च न्यायालयाची मोहर उमटलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या निवडणुका लढवण्यासाठी राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना मोकळं झालेलं मैदान. सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशीनुसार राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्री, शासकीय नोकरदार आणि लोकप्रतिनिधी यांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती. पण बीसीसीआयच्या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयानं अपात्रतेच्या परिक्षेत्रातली पब्लिक ऑफिस ही संज्ञा हटवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळं यापुढच्या काळात फक्त राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्री, आणि शासकीय नोकरदार यांनाच बीसीसीआय आणि राज्य संघटनांच्या निवडणुका लढवण्यास मनाई राहिल.  

सर्वोच्च न्यायालयाच्या या मंजुरीचा थेट परिणाम मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएच्या आगामी निवडणुकीवर होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, भाजप आमदार आशिष शेलार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असे राजकीय नेते एमसीएच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्यापैकी नारायण राणेंचा अपवाद वगळता बाकीच्या नेत्यांना एमसीएची निवडणूक लढवण्याची खुली संधी आहे.

एमसीएच्या आगामी निवडणुकीसाठी महाडदळकर गटानं माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केलं आहे. महाडदळकर गटाचा हा निर्णय शरद पवार आणि आशिष शेलार यांनी मिळून घेतल्याचं समजतं. पण सर्वोच्च न्यायालयानं लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्याची संधी दिल्यामुळं आशिष शेलार यांचंही नाव अध्यक्षपदासाठी घेण्यात येत आहे. आशिष शेलार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव पुढे करून आपण त्यासाठी इच्छुक नसल्याचं दाखवलं आहे. पण बीसीसीआयच्या घटनादुरुस्तीमुळं एमसीएतल्या इतर राजकीय नेत्यांच्या मनातली सुप्त इच्छा जागी झाली असेल, त्याचं काय होणार?

एमसीएची 28 सप्टेंबरला नियोजित आगामी निवडणूक दोन तीन आठवड्यांनी पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं अध्यक्षपदाच्या उमेदवारीविषयी निर्णय घेण्यासाठी पवार आणि शेलारांना आणखी अवधी मिळणार आहे. त्या दोघांचा कल हा संदीप पाटील यांच्याच बाजूनं कायम राहिला, तर एमसीएला तब्बल तीसेक वर्षांनी एक माजी कसोटीवीर अध्यक्ष म्हणून लाभू शकतो.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DC vs KKR IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं लीग स्टेजचा समारोप, अखेरच्या सामन्यात अजिंक्य रहाणे धुरंदर ढेपाळले, केकेआरची सलामी अन् शेवट देखील पराभवानं
दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं लीग स्टेजचा समारोप, अखेरच्या सामन्यात अजिंक्य रहाणे धुरंदर ढेपाळले, केकेआरची सलामी अन् शेवट देखील पराभवानं
KKR vs DC Live Score Updates : दिल्लीच्या 'कॅपिटल्स' पुढे कोलकाता 'नाईट' ढेर; 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची गाडी 163 वरच रोखली
दिल्लीच्या 'कॅपिटल्स' पुढे कोलकाता 'नाईट' ढेर; 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची गाडी 163 वरच रोखली
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
MI vs RR IPL 2026 : फक्त 'त्या' 15 चेंडूंमुळे PBKS अन् KKRचा गेम ओव्हर! राजस्थाननं असं खेचून आणलं प्लेऑफचं तिकीट, कोण ठरलं किंगमेकर?, पाहा Video
फक्त 'त्या' 15 चेंडूंमुळे PBKS अन् KKRचा गेम ओव्हर! राजस्थाननं असं खेचून आणलं प्लेऑफचं तिकीट, कोण ठरलं किंगमेकर?, पाहा Video

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget