एक्स्प्लोर

बीसीसीआयची घटनादुरुस्ती, राजकीय नेत्यांना क्रिकेट संघटनांचं मैदान पुन्हा मोकळं

BCCI : बीसीसीआयच्या घटनेमधल्या विविध सुधारणांसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मंजुरी ही भारतीय क्रिकेटवर दूरगामी परिणाम करणारी आहे.

BCCI's constitution amendments : बीसीसीआयच्या घटनेमधल्या विविध सुधारणांसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मंजुरी ही भारतीय क्रिकेटवर दूरगामी परिणाम करणारी आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना मिळालेली तीन वर्षांची आणखी एक टर्म भारतीय क्रिकेटमधल्या प्रशासकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरली आहे. त्याचवेळी बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या निवडणुका लढवण्यासाठी लोकप्रतिनिधींना मिळालेली मंजुरी राजकीय नेत्यांना क्रिकेट प्रशासनांचं मैदान पुन्हा मोकळं करणारी ठरणार का?  

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर सौरव गांगुली आणि सचिवपदावर जय शाह आणखी तीन वर्षे राहू शकतात, हे स्पष्ट झालं आणि भारतीय क्रिकेटच्या वर्तुळात आनंदाची लाट उसळली. भारतातल्या क्रिकेट संघटकांच्या चेहऱ्यांवर उमटलेला तो आनंद गांगुली आणि जय शाहांना मिळालेल्या तीन वर्षांच्या वाढीव टर्मसाठी नव्हता, तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानं सर्वांचाच राज्य संघटना आणि बीसीसीआयमध्ये मिळून सलग बारा वर्षे राहण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

लोढा समितीच्या शिफारशीनं सर्वोच्च न्यायालयानंच घातलेली तीन वर्षांच्या अनिवार्य विरामकाळाची अट क्रिकेट संघटकांसाठी जाचक ठरत होती. कारण या अटीमुळं बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनेतल्या प्रशासकांना सलग सहा वर्षांनी तीन वर्षांचा ब्रेक घ्यावाच लागत होता. अखेर सव्वा सहा वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला निवडणुकीसाठीच्या विविध अटी आणि शर्ती शिथील करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

त्यानुसार बीसीसीआयच्या घटनेत झालेली पहिली दुरुस्ती ही पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची आहे. या दुरुस्तीनुसार आता कुणीही पदाधिकारी राज्य संघटनेत सहा आणि बीसीसीआयमध्ये सहा अशी सलग बारा वर्षे कार्यभार सांभाळू शकणार आहे. याच घटनादुरुस्तीचा लाभ गांगुली आणि जय शाह यांना झाला आहे. त्या दोघांचा आपापल्या राज्य संघटनेत सहा आणि मग बीसीसीआयमध्ये तीन असा सलग नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. बीसीसीआयच्या घटनादुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मंजुरीमुळं त्या दोघांना आणखी तीन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

बीसीसीआयच्या घटनादुरुस्तीत सर्वोच्च न्यायालयाची मोहर उमटलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या निवडणुका लढवण्यासाठी राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना मोकळं झालेलं मैदान. सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारलेल्या लोढा समितीच्या शिफारशीनुसार राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्री, शासकीय नोकरदार आणि लोकप्रतिनिधी यांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती. पण बीसीसीआयच्या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयानं अपात्रतेच्या परिक्षेत्रातली पब्लिक ऑफिस ही संज्ञा हटवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळं यापुढच्या काळात फक्त राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्री, आणि शासकीय नोकरदार यांनाच बीसीसीआय आणि राज्य संघटनांच्या निवडणुका लढवण्यास मनाई राहिल.  

सर्वोच्च न्यायालयाच्या या मंजुरीचा थेट परिणाम मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएच्या आगामी निवडणुकीवर होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, भाजप आमदार आशिष शेलार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असे राजकीय नेते एमसीएच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्यापैकी नारायण राणेंचा अपवाद वगळता बाकीच्या नेत्यांना एमसीएची निवडणूक लढवण्याची खुली संधी आहे.

एमसीएच्या आगामी निवडणुकीसाठी महाडदळकर गटानं माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केलं आहे. महाडदळकर गटाचा हा निर्णय शरद पवार आणि आशिष शेलार यांनी मिळून घेतल्याचं समजतं. पण सर्वोच्च न्यायालयानं लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्याची संधी दिल्यामुळं आशिष शेलार यांचंही नाव अध्यक्षपदासाठी घेण्यात येत आहे. आशिष शेलार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव पुढे करून आपण त्यासाठी इच्छुक नसल्याचं दाखवलं आहे. पण बीसीसीआयच्या घटनादुरुस्तीमुळं एमसीएतल्या इतर राजकीय नेत्यांच्या मनातली सुप्त इच्छा जागी झाली असेल, त्याचं काय होणार?

एमसीएची 28 सप्टेंबरला नियोजित आगामी निवडणूक दोन तीन आठवड्यांनी पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं अध्यक्षपदाच्या उमेदवारीविषयी निर्णय घेण्यासाठी पवार आणि शेलारांना आणखी अवधी मिळणार आहे. त्या दोघांचा कल हा संदीप पाटील यांच्याच बाजूनं कायम राहिला, तर एमसीएला तब्बल तीसेक वर्षांनी एक माजी कसोटीवीर अध्यक्ष म्हणून लाभू शकतो.  

महत्त्वाच्या बातम्या

AUS W vs ENG W: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं विक्रम रचला, सातव्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं, इंग्लंडचं स्वप्न भंगलं
Vaibhav Sooryavanshi:वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला     
वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी 20 मध्ये संधी मिळणार का? माजी क्रिकेटपटूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला
IND vs ENG : मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
मॅच तिथंच संपली होती, भारताच्या पराभवाचं कारण काय? आकाश चोप्राचं रोखठोक विश्लेषण, दोन खेळाडूंचं  नाव घेतलं...
Prithvi Shaw-Akriti Agarwal Row : मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?
मार्चमध्ये अंगठी घातली, जुलैमध्ये सगळंच संपवलं; पृथ्वी शॉने होणाऱ्या बायकोला फसवलं? आकृती अग्रवालच्या इन्स्टा पोस्टमुळे खळबळ, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget