एक्स्प्लोर

IND vs AUS : पहिल्यांदाच इंदूर कसोटीत भारत पराभूत, 3 पॉईंट्समध्ये समजून घ्या का पराभूत झाली टीम इंडिया

India vs Australia : भारताला इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच कसोटी सामना गमवावा लागला.

IND vs AUS, Indore Test : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला (Team India) पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर हा टीम इंडियाचा पहिला कसोटी पराभव होता. यासोबतच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली देखील भारताला पहिल्यांदाच कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. इंदूरमध्ये भारताच्या पराभवाचं सर्वात मोठे कारण खराब फलंदाजी हे होतं. यासोबतच खेळपट्टीच्या स्थितीचाही भारताच्या पराभवात महत्त्वाचा वाटा होता. या पराभवामुळे मालिकेत आता स्थिती 2-1 अशी असून भारताला या विजयासह WTC फायनल गाठता आली असती, पण आता भारताचं हे मिशन पुढील सामन्यावर अवलंबून आहे. दरम्यान या इतक्या महत्त्वाच्या सामन्यात भारत पराभूत झाला असून भारताच्या पराभवातील तीन महत्त्वाची कारण जाणून घेऊ... 

खराब फलंदाजी

इंदूर कसोटीत भारताची फलंदाजीची फळी अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे विखुरली. संघातील दिग्गज खेळाडूही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर गुडघे टेकताना दिसले. सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या डावात 12-12 धावा केल्यानंतर रोहित बाद झाला. पहिल्या डावात 21 धावा आणि दुसऱ्या डावात 5 धावा केल्यानंतर शुभमन बाद झाला. त्याचप्रमाणे विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. इतर फलंदाजही खास कामगिरी करु शकले नाहीत आणि ज्यामुळे एक मोठं लक्ष्य भारत कांगारुंना देऊ शकला नाही.

ऑस्ट्रेलियाचं धोकादायक गोलंदाजी आक्रमण

कांगारू संघाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने भारतीय फलंदाजांना घाम फोडला. त्याने पहिल्या डावात 35 धावांत 3 बळी घेतले. यानंतर त्याने दुसऱ्या डावात आणखी धोकादायक गोलंदाजी केली. लायनने 23.3 षटकांत 64 धावांत 8 बळी घेतले. तो भारतीय संघासाठी सर्वात धोकादायक ठरला.

भारताच्या पराभवात खेळपट्टीचा महत्त्वाचा वाटा 

इंदूरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टी (Indore Cricket Stadium) भारतासाठी एक फार तोट्याची ठरली. इथे पहिल्या दिवसापासून गोलंदाजांना भरपूर टर्न मिळत होता. यामुळे टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर खराब झाली. रोहित, विराट, शुभमन आणि अय्यरसह एकही खेळाडू टिकू शकला नाही. पुजाराने दुस-या डावात खूप मेहनत घेऊन अर्धशतक झळकावले असले तरी त्याला साथ न मिळल्याने भारत मोठं लक्ष्य ऑस्ट्रेलियाला देऊ शकला नाही.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs MI IPL 2026 : चेन्नईने मुंबईचा बाजार उठवला! रथी-महारथी असलेली मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून पॅकअप, Points Tableमध्ये उलथापालथ
चेन्नईने मुंबईचा बाजार उठवला! रथी-महारथी असलेली मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून पॅकअप, Points Tableमध्ये उलथापालथ
CSK vs MI Score IPL 2026 : चेपॉकवर चेन्नईचा 'सुपर' विजय! मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने धुव्वा; गायकवाडची तुफानी फटकेबाजी
CSK vs MI Update : चेपॉकवर चेन्नईचा 'सुपर' विजय! मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने धुव्वा; गायकवाडची तुफानी फटकेबाजी
संघात जागा नाही… आयुष्यालाच संपलं! 19 वर्षीय महिला क्रिकेटपटूचा टोकाचा निर्णय, सगळेच हादरले, नेमकं काय घडलं?
संघात जागा नाही… आयुष्यालाच संपलं! 19 वर्षीय महिला क्रिकेटपटूचा टोकाचा निर्णय, सगळेच हादरले, नेमकं काय घडलं?
Team India squad Womens T20 World Cup 2026 : कर्णधार हरमन, तर मानधनाकडे पण मोठी जबाबदारी…; महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! पहिलाच सामना पाकिस्तानशी, जाणून घ्या संपूर्ण Squad
कर्णधार हरमन, तर मानधनाकडे पण मोठी जबाबदारी…; महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! पहिलाच सामना पाकिस्तानशी, जाणून घ्या संपूर्ण Squad

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime: काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
Embed widget