एक्स्प्लोर

IND vs NZ : श्रेयस अय्यरचं पदार्पणातच शतक, कर्णधारांची काळजी मात्र वाढली, नेमकं कारण काय?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये श्रेयस अय्यरनं धमाकेदार शतक झळकावलं आहे. त्याच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देश आनंदी असताना संघ व्यवस्थापनासह कर्णधारांची चिंता वाढली आहे.

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात कानपूरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने एक चांगली धावसंख्या उभारली आहे. भारतीय संघाकडून 345 धावांचा डोंगर उभारण्यात आला असून यामध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयसचं (Shreyas Iyer) शतक एक सर्वात विशेष आणि मोठी गोष्ट आहे. पण याच शतकामुळे संघातील एका खेळाडूचं टेन्शन मात्र वाढलं आहे. हा खेळाडू म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). यामागील कारण म्हणजे मागील काही सामन्यांत खास कामगिरी करु न शकलेल्या रहाणेसाठी ही कसोटी म्हणजे जवळपास करो या मरो अशीच होती. ज्यात तो केवळ 35 धावा करु शकला, तर दुसरीकडे संघात त्याच्या स्थानावर अगदी परफेक्ट बसणाऱ्या श्रेयसने पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावलं आहे. ज्यामुळे आता पुढील सामन्यामध्ये नेमकी प्लेयिंग 11 कशी असणार? हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून पहिली कसोटी सध्या सुरु आहे. ज्यामध्ये विराटला विश्रांती दिल्यामुळे अजिंक्य रहाणे कर्णधारपद सांभाळत आहे. पण दुसऱ्या सामन्यात विराट पुन्हा कर्णधारपदावर येणार असल्याने संघ पूर्णपणे बदलणार आहे. विराटला संघात स्थान मिळताच कोणत्या फलंदाजाला विश्रांती द्यायची हा प्रश्न संघासमोर असणार आहे. दरम्यान विराट खेळणाऱ्या स्थानावर पुजारा, रहाणे आणि आता नव्याने संघात आलेल्या श्रेयस यांचा समावेश आहे. ज्यामध्ये अय्यरने शतक झळकावत आपलं स्थान पक्क केलं आहे. तर पुजारा 26 आणि रहाणे 35 धावा केल्यामुळे त्यांचं स्थान डळमळीत झालं आहे. त्यात रहाणे संघाचा उपकर्णधार असल्याने त्याची जबाबदारी मोठी आहे. ज्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याचच स्थान अधिक धोक्यात आहे. ट्वीटरवर देखील अनेक क्रिकेटप्रेमी रहाणेला बाहेर करुन अय्यरला संघात स्थान द्यावं अशी मागणी करत आहेत. त्यामुळे आता रहाणेला स्थान मिळणार का? आणि विराट कसा संघ निवडणार? या प्रश्नांमुळे दोन्ही कर्णधार चिंतेत पडले आहेत. 

Shreyas Iyer batted well. And virat will be back in next test. So I don't think rahane will get a place in sa tour

— Yashuu (@Yashuu_Cricket) November 26, 2021

">

Found replacement of @ajinkyarahane88 now with @klrahul11 @ImRo45 and @imVkohli hopefully there will be no place for @ajinkyarahane88 plz send him out of earth

— Kshitij (@Xitij_bhatnagar) November 26, 2021

">

भारताचा पहिला डाव

सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमनने उत्तम करुन दिली. अगरवाल (13) आणि पुजारा (26) यांनी त्याला काहीशी साथ दिली. तर पण शुभमनने अर्धशतक (52) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार रहाणेही 35 धावा करुन बाद झाला, ज्यानंतर सलामीचा कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Ayer) अनुभवी रवींद्र जाडेजासह भारताचा डाव सावरत एक शतकी भागिदारी रचली. पहिल्या दिवसखेर अय्यर नाबाद 75 आणि जाडेजा नाबाद 50 धावांवर खेळत होते. ज्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच जाडेजा बाद झाला. पण अय्यरने त्याचं शतक पूर्ण केलं. पण 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मजदतीने 105 धावा करुन अय्यरही बाद झाला. दुसऱ्या दिवशी टीम साऊदीच्या भेद गोलंदाजीमुळे एक-एक भारतीय तंबूत परतत होते. पण त्याचवेळी अनुभवी रवींचंद्रन आश्विनने 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. ज्याला उमेश यादवने 34 चेंडूत 10 धावांची संयमी साथ देत भारताला 345 पर्यंत पोहचवलं. पण आश्विन बाद होताच इशांत शर्माही लगेचच तंबूत परतला आणि भारताला पहिला डाव 345 धावांवर आटोपला.

संबधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 25 6pm : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 22 डिसेंबर 2022 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 17 June 2024Sambhaji Nagar LIVE Accident : रील काढताना अपघात, Accelerator दाबला अन् कार थेट दरीतMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 17 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
Embed widget