Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
Team India squad For T20 World Cup: या वर्षी कर्णधार सूर्याची फलंदाजी अत्यंत निराशाजनक राहिली आहे, त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. आयसीसी टी-20 फलंदाजी क्रमवारीत एकेकाळी पहिल्या क्रमांकावर होता.

Team India squad For T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप 2026 साठी साठी भारतीय संघाची घोषणा आज (20 डिसेंबर) करण्यात आली. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर खराब फॉर्ममुळे संघर्ष करणारा शुभमन गिल संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अक्सर पटेलची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 3-1 अशी टी-20 मालिका जिंकली असली तरी, 'मेन इन ब्लू' संघाच्या काही समस्या कमी झालेल्या नाहीत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म. या वर्षी कर्णधार सूर्याची फलंदाजीची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे, त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. 35 वर्षीय खेळाडू आयसीसी टी-20 फलंदाजी क्रमवारीत एकेकाळी पहिल्या क्रमांकावर होता, परंतु आता तो धावांसाठी संघर्ष करत आहे.
Jitesh sharma will think what did i do so wrong to be missing out?
— Irfan Pathan (@IrfanPathan) December 20, 2025
Surya Kumar Yadav need to be in form getting into the World Cup. Hoping for him to be scoring run vs NZ to feel good abt his game.
न्यूझीलंडविरुद्ध तो धावा करेल, अशी अपेक्षा
इरफान पठाणने संघ निवडीवर भाष्य करताना सूर्याचे अप्रत्यक्ष कान उपटले आहेत. तो ट्विट म्हणतो की, जितेश शर्मा नक्कीच विचार करत असेल की आपण असं काय चुकीचं केलं, की आपली निवडच झाली नाही. सूर्यकुमार यादवसाठीही हा काळ खूप महत्त्वाचा आहे. वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी त्याचा फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे. न्यूझीलंडविरुद्ध तो धावा करेल, अशी अपेक्षा आहे, जेणेकरून त्याला स्वतःच्या खेळावर पुन्हा विश्वास बसेल. 2025 मध्ये, सूर्यकुमार यादवची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सरासरी 13.62 होती, जी त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात वाईट काळ मानला जातो. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, मी अधिक मजबूत होऊन परतेन. माझा यावेळी वाईट काळ खूप लांबला आहे. सूर्याने फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे कौतुक केले.
आमचे लक्ष विशिष्ट प्रकारचे क्रिकेट खेळण्यावर होते
सूर्यकुमार यादव म्हणाला, "मालिकेच्या सुरुवातीपासूनच आमचे लक्ष विशिष्ट प्रकारचे क्रिकेट खेळण्यावर होते आणि आम्ही त्यावर टिकून राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही वेगळे काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला प्रत्येक विभागात स्वतःला मुक्तपणे व्यक्त करायचे होते आणि त्याचे निकाल सर्वांना दिसत आहेत. कदाचित गेल्या काही मालिकांमध्ये आमच्यात हीच कमतरता होती. आम्हाला अशी फलंदाजी करायची होती; एकदा फलंदाज सेट झाला की, थांबणे शक्य नव्हते. आम्हाला या सातत्यपूर्ण आक्रमक हेतूची आवश्यकता होती आणि तेच दिसून आले."
तुम्हाला परिस्थितीला प्रतिसाद द्यावा लागेल
सूर्यकुमार म्हणतो, "बॉलिंगमध्येही आमची वेगळी योजना होती. पॉवरप्लेमध्ये बुमराहला एक षटक टाकायला लावणे, ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर मधल्या षटकांवर नियंत्रण ठेवणे आणि नंतर त्याला डेथ ओव्हर्ससाठी तयार करणे ही रणनीती होती." वॉशिंग्टन सुंदरने उत्कृष्ट कामगिरी केली आणि संधीचा योग्य वापर केला. सामन्यादरम्यान आमच्यावर कधीकधी दबाव होता आणि आव्हाने होती. पण क्रिकेट म्हणजे तुम्ही परिस्थितीला कसे प्रतिसाद देता यावर अवलंबून असते आणि खेळाडूंनीही उत्तम प्रतिसाद दिला.
इतर महत्वाच्या बातम्या























