एक्स्प्लोर
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाली सुरू असून विकासाच्या बाता आणि गप्पा प्रत्येक नेत्याच्या तोंडातून ऐकायला मिळत आहेत.
School student cross bridge by JCB
1/6

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाली सुरू असून विकासाच्या बाता आणि गप्पा प्रत्येक नेत्याच्या तोंडातून ऐकायला मिळत आहेत.
2/6

मात्र, विकास व विकास हेच लक्ष्य असल्याचे सांगणाऱ्या नेत्यांना काही गावांतील नागरिकांना, विद्यार्थ्यांना होणारा त्रास कधी दिसणार असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
3/6

शाळेला जातो आम्ही, पण जीवघेणा प्रवास करून असंच विद्यार्थी म्हणत आहेत, कारण चक्क जेसीबीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी नदी ओलांडून घर गाठलं आहे.
4/6

नाशिकच्या चांदवड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. चांदवड शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने चार दिवसांत गोई नदीला तिसऱ्यांदा पूर आला.
5/6

तिसगाव -हिवरखेडे रस्त्यावरील गोई नदीवर असलेल्या फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
6/6

शाळेत जाण्यासाठी किंवा शाळेतून घरी येण्यासाठी विद्यार्थ्यांना आज जेसीबीच्या सहाय्याने नदीच्या पुलावरील प्रवाह ओलांडण्यास मदत करण्यात आली.
Published at : 22 Oct 2024 05:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















