एक्स्प्लोर
Ranbhaji : पालघरमधील मुख्य रस्ते आणि बाजार रानभाज्यांना फुलले
कोणत्याही प्रकारची शेती किंवा बियाणे न पेरता पावसाळ्यात पाऊस पडल्यावर निसर्गतःच उगवल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या.
Palghar Ranbhaji
1/9

पालघरमधील मुख्य रस्ते आणि बाजार सध्या रानभाज्यांनी फुलले आहेत .
2/9

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने विविध प्रकारच्या भाज्या सध्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
3/9

आदिवासी समाजातील नागरिक जंगलातून रानभाज्या गोळा करुन रस्त्यावर ठिकठिकाणी विक्री करतात.
4/9

यामध्ये कवळी, कोवळे बांबू, करटुले, कडूकंद, शेवळे, माठ, फांग, चाईचा मोहर, बोखरीचा मोहर, टेहरा, वाथरटे, रानकंद मोखा, वाघाटा, दिघवडी, भूईफोड, उळशाचा मोहर आदींचा समावेश आहे.
5/9

लोत, कंटोली, शिराळा, काकडी, तेरा, शेवळी, शिण, पेंढरु अशा शंभरपेक्षाही जास्त भाज्या पालघरमधील जंगलांमध्ये उपलब्ध आहेत.
6/9

कोणत्याही प्रकारची शेती किंवा बियाणे न पेरता पावसाळ्यात पाऊस पडल्यावर निसर्गतःच उगवल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या.
7/9

बाजारात या रानभाज्यांची किंमत इतर पालेभाज्यांपेक्षा जास्त असली तरी शरीरासाठी या भाज्या पौष्टिक असल्याने मोठी मागणी या रानभाज्यांना आहे.
8/9

भिवंडी वाडा मार्गावर तसेच विक्रमगड जव्हार मार्गावर मोठ्या प्रमाणात आदिवासी महिलांकडून या रानभाज्या विक्री केली जात आहे.
9/9

या भाज्यांचं दुसरं महत्त्व म्हणजे दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना या रानभाज्यांमुळे पावसाळ्यात 2 ते 3 महिने रोजगार मिळतो .
Published at : 10 Jul 2023 10:20 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























