एक्स्प्लोर

Pulwama terror attack : ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे!

कितीही आघात झाले, अतिरेकी हल्ले झाले, हल्लेखोर शेजारच्या देशात उघड फिरत राहिले तरी भारत शांत राहिला, पण आता ही ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे.

मुंबई : उरी हल्ल्यानंतरच्या भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचे लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केलं. भारतीय सैन्य काय करु शकतं, याची छोटीशी चुणूक पाकिस्तानला आणि त्यांनी पोसलेल्या अतिरेकी संघटनांनी त्यावेळी अनुभवली. पण पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता तीच वेळ पुन्हा आली आहे. अतिरेक्यांना...त्यांच्या हॅडलर्सना घरात घुसून मारण्याची वेळ पुन्हा आली आहे. 'ये इंडियावाले कुछ नही करेंगे,' हा बेबी सिनेमातील डायलॉग. पण ही ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे. सहिष्णु, सहनशील, संयमी देश अशी आपल्या भारताची जगभरात ओळख आहे. पण या सहनशीलतेलाच भित्रेपणा समजलं जात असेल तर.. ही ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे. कितीही आघात झाले, अतिरेकी हल्ले झाले, हल्लेखोर शेजारच्या देशात उघड फिरत राहिले तरी भारत शांत राहिला, पण आता ही ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे. जगाच्या इतिहासात स्वत:हून दुसऱ्या देशावर आक्रमण न करणारा कदाचित एकमेव देश म्हणजे आपला भारत. कोणी धर्मप्रसारासाठी, कोणी पैशासाठी, कोणी कसला बदला घेण्यासाठी आक्रमण करतं. सात समुद्र ओलांडून दुसऱ्या देशांत घुसून युद्ध करणारे अनेक देश जगात आहेत. कधी कट्टर जिहादी अतिरेकाच्या नावाखाली तर कधी नक्षलवादाच्या नावाखाली, आपल्याच भूमीत रक्तबंबाळ होत राहिलेला कदाचित एकमेव देश म्हणजे आपला भारत. गेल्या तीन दशकात जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात किमान 14 हजार नागरिक आणि अंदाजे साडेपाच हजार जवान गमावले आहेत, तर जवळपास 26 हजारांवर अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे. देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांवर छुपे हल्ले करणाऱ्यांना, त्यांच्याच घरात घुसून मारण्याची वेळ आता आली आहे. आपल्या निष्पाप नागरिकांचे भ्याड हल्ल्यात बळी घेणाऱ्यांना, त्यांच्याच घरात घुसून मारण्याची वेळ आता आली आहे. या अतिरेक्यांच्या हाती बंदूक देणाऱ्यांना, त्यांच्याच घरात घुसून मारण्याची वेळ आता आली आहे. युवा पिढीच्या डोक्यात भारत द्वेष घुसवणाऱ्या त्यांच्या मास्टरमाईंडना, त्यांच्याच घरात घुसून मारण्याची वेळ आता आली आहे. ओळख बदलण्याची वेळ आता आली आहे. पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.