एक्स्प्लोर

World Migration Report: कोरोना काळात 28 कोटी आंतरराष्ट्रीय स्थलांतर, भारतीय आघाडीवर

वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्टनुसार, कोरोना काळात 28 कोटी नागरिकांचे स्थलांतर झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतर झालं आहे.

World Migration Report: कोरोनामुळे आयुष्य जगण्याच्या मार्गात अनेक अमूलाग्र बदल केले आहेत. स्थलांतरणात देखील मोठे बदल झाले आहे. वर्ल्ड मायग्रेशनरिपोर्टनुसार, कोरोना काळात 28 कोटी स्थलांतर झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. भारतातून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतर झालंय. कोरोना नसता तर जगभरात 20 लाखांहून अधिक स्थलांतर वाढलं असतं असं देखील जागतिक स्थलांतराच्या अहवालात नमुद केलंय. 

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर निघालेले मजुरांचे जथ्थे स्थलांतरीतांचं भीषण वास्तव दाखवत होते. अनेकांना फाळणीत झालेल्या स्थलांतराची देखील आठवण झाली. अनेक मजूर दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमधून आपल्या मूळगावी परतत होते. गावाकडून शहरांकडेआलेल्या मजुरांनी पुन्हा घरचा रस्ता धरला होता. ह्यामुळे भारतातील स्थलांतर आणि त्यांचे प्रश्न समोर आल्याने जागतिक स्थरावर असलेली ह्याची व्याप्ती देखील भारताला कळली आहे. 1 डिसेंबर रोजी जागतिक स्थलांतर अहवाल प्रकाशित झाला आहे. यात स्थलांतरितांची संख्या 2020 मध्ये वाढून 28.1 कोटीपर्यंत जाऊन पोहोचली आहे, हीच संख्या 2019 च्या आकडेवारीनुसार 27.2 कोटी होती. 

2020 सालामधील संपूर्ण जगातील स्थलांतराच्या आकडेवारीसंदर्भात नजर टाकली तर असं दिसून येतं की कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर ही आकडेवारी 20 लाखांनी अधिक असती. कोरोनामुळे लोकांना स्थलांतर करण्यास निर्बंध आले आणि त्यामुळेच स्थलांतर कमी झालं. ही आकडेवारी फक्त महामारीच्या पहिल्या वर्षातली आहे. त्यामुळे हा आकडा अधिक असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

स्थालांतर हे माणसाच्या इतिहासाचा मोठा घटक आहे. प्रामुख्याने मागील शतकातील स्थलांतर हे युध्दजन्य परिस्थितीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे आणि आर्थिक प्रगतीसाठी होत होती असं निदर्शनास येतं. मात्र, मागील काही वर्षात यात हवामान बदलाची देखील भरपडली आहे. यासंदर्भात देखील हा अभ्यास भाष्य करतो. सोबतच हवामान बदलामुळे नागरिक कुठे स्थलांतर करीत आहेत, त्याचा प्रभाव आणि इतर पैलूंसंदर्भात देखील यात माहिती दिली गेली आहे. स्थलांतर हे आर्थिक, भौगोलिक, लोकसंख्येवर आधारित असं आकार घेत असतं. त्यामुळे ‘स्थलांतरणाचे कॉरिडॉर’ विकसित झाले आहेत. ज्यामध्ये ‘अ’ देशातून ‘ब’ देशामध्ये स्थलांतर होण्याचे प्रमाण अधिक आहे. 

प्रामुख्याने भारताबद्दल बोलायचं झालं तर 2020 सालात भारतामधून सर्वाधिक नागरिकांचे स्थलांतर झाले. संयुक्त अरब अमिरात या देशात ३० लाखांच्या जवळपास भारतात जन्मलेल्या नागरिकांनी स्थलांतर केले आहे. जे जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे स्थलांतरणाचं ‘कॉरिडॉर’ म्हणून समोर येत आहे. अमेरीकेत भारतीयांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले असून साऊदी अरबमध्ये देखील 25 लाखांच्या जवळपास भारतीय आहेत. दुसरीकडे, भारतीयांची स्थलांतराची संख्या मोठी असताना भारतात देखील बांगलादेशमधून मोठं स्थलांतर झाल्याचं जागतिक स्थलांतर अहवालातून स्पष्ट होतं. स्थलांतर केलेल्या यादीत भारत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर मेक्सिको आणि रशियाचा ह्या देशांचा क्रमांक लागतो. मेक्सिको आणि अमेरीकेत आधीपासूनच स्थलांतराचा कॉरिडॉर विकसित आहे. जो जागतिक सर्वाधिक मोठा असा कॉरिडॉर आहे. मेक्सिकोतून 2020 च्या आकडेवारीनुसार अमेरीकेत 1 कोटी 10 लाख स्थलांतर झालंय. 

स्थलांतराची संख्या मोठी आहे तर तिकडे निर्वासितांची देखील संख्या मोठी दिसते. 2021 उजाडत असताना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जगभरात सध्या २६ कोटींहून अधिक निर्वासित आहेत. सर्वाधिक संख्या ही युद्धजन्य परिस्थिती अडकलेल्या सीरियातून झाली आहे. तब्बल ८० लाख निर्वासित ह्या देशातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर अफगाणिस्तान, दक्षिण सुदान आणि म्यानमार ह्यादेशांचा क्रमांक लागतो. अफगाणिस्तानात देखील युद्धजन्य परिस्थिती जबाबदार आहे तर म्यानमारमध्ये रोहिंग्याचा विषय अजूनहीज्वलंत दिसतो. 

नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतर वाढले असं जागतिक स्थलांतर अहवालाचं विश्लेषण केल्यास निदर्शनास येतं. दुसरीकडे, जागतिकस्तरावरील देशांतर्गत विस्थापनाबद्दल बोलायचं झालं तर नैसर्गिक आपत्ती, मानवी संघर्षआणि हिंसाचारामुळे 2019 सालाच्या तुलनेत 2020 सालात ही संख्या मोठी आहे. 2019 मध्ये ही संख्या 31 कोटींच्या घरात होती तर 2020 मध्ये वाढून ही संख्या 40 कोटींच्या घरात पोहोचली आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्पकडून 100 टक्के टॅरिफ कायद्याला मंजुरी; भारतासकट रशियन तेल खरेदी करणाऱ्या टाॅप 5 देशांना बोटांच्या तालावर नाचवण्याची तयारी, रशियाच्या संरक्षण क्षेत्रावरही निर्बंध
ट्रम्पकडून 100 टक्के टॅरिफ कायद्याला मंजुरी; भारतासकट रशियन तेल खरेदी करणाऱ्या टाॅप 5 देशांना बोटांच्या तालावर नाचवण्याची तयारी, रशियाच्या संरक्षण क्षेत्रावरही निर्बंध
Hyrox Champion: शर्यतीत धावताना शौचाला झाली, कपडे घाण होऊनही धावत राहिली, टीका अन् धमक्या..., खेळाडूने मागितली माफी
शर्यतीत धावताना शौचाला झाली, कपडे घाण होऊनही धावत राहिली, टीका अन् धमक्या..., खेळाडूने मागितली माफी
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Embed widget