एक्स्प्लोर

30 वर्षाच्या मित्रांनी विश्वास ठेवला नाही पण विरोधकांनी विश्वास ठेवला : उद्धव ठाकरे

सर्व सामान्य माणसाला माझे सरकार आहे असे वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार असल्याचे देखील ते म्हणाले. मोठ्या भावाला(नरेंद्र मोदी)ही दिल्लीमध्ये जाऊन भेटणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

मुंबई : आज अखेर महाराष्ट्र सत्तास्थापनेच्या  पेचाला पूर्णविराम मिळाला आहे. महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एकमेकांवर विश्वास ठेवून देशात एक वेगळा विचार आपण ठेवत आहोत. ज्यांच्यासोबत 30 वर्ष मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण जे 30 वर्ष विरोधक होते त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले. आपण सगळी मैदानातली माणसं आहोत, त्यामुळे आपल्या खेळायचं कसं हे सांगायची गरज नाही, असे ठाकरे यावेळी म्हणाले. विजयानंतर बाळासाहेबांची आठवण येत आहे, असेही ते म्हणाले. गरज सरो आणि वैद्य मरो अशी भाजपची वर्तणूक होती, असेही ते म्हणाले. शिवसेना आणि भाजपमध्ये काही ठरलंच नाही असं देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य आज मनाला लागले. मी खोट्याची साथ देणार नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल.  भाजपला सेनेबद्दल द्वेष आहे. गरजेवेळी सेनेचा वापर केला, असेही ते म्हणाले. जीवनात कमावले काय आणि गमावले काय हे आज समजले, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. आपले सरकार हे एक कुटुंब आहे . सर्व सामान्य माणसाला माझे सरकार आहे असे वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार असल्याचे देखील ते म्हणाले. मोठ्या भावाला(नरेंद्र मोदी)ही दिल्लीमध्ये जाऊन भेटणार असल्याचे ठाकरे म्हणाले. ज्या वेळेला मी संघर्षात असतो तेव्हा मला नेहमी विचारले जाते की संघर्षात तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का? मला संघर्षात नाही पण संघर्षात विजय मिळविल्यानंतर मला बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेब म्हणायचे विचार करून शब्द दे आणि एकदा शब्द दिला की प्राण गेला तरी बेहत्तर, दिलेला शब्द नाही पाडायचा. मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची, सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मला पुसायचे आहेत. हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये राहिलेले असतील, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. माझं सरकार म्हणजे आपल्या सर्वांचे सरकार हे कुणाशीही सुडाने वागणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar : खरातसोबत अनेकांचे फोटो, फक्त महिला म्हणून आपल्यावर आरोप; राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया
खरातसोबत अनेकांचे फोटो, फक्त महिला म्हणून आपल्यावर आरोप; राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया
पेट्रोलच्या पाठोपाठ औद्योगिक डिझेलच्याही दरात मोठी वाढ, वाहतूक खर्चावर परिणाम, नेमकी किती झाली वाढ?
पेट्रोलच्या पाठोपाठ औद्योगिक डिझेलच्याही दरात मोठी वाढ, वाहतूक खर्चावर परिणाम, नेमकी किती झाली वाढ?
Rupali Chakankar : भोंदूबाबाच्या नादी लागल्याने दोन्ही पदं गमावली; रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार
भोंदूबाबाच्या नादी लागल्याने दोन्ही पदं गमावली; रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार
भोंदूबाबासोबत एकनाथ शिंदेसह चंद्रकांत पाटलांचे फोटो, मुख्यमंत्री महोदय या भगत गणांचे काय? संजय राऊतांचा थेट हल्लाबोल
भोंदूबाबासोबत एकनाथ शिंदेसह चंद्रकांत पाटलांचे फोटो, मुख्यमंत्री महोदय या भगत गणांचे काय? संजय राऊतांचा थेट हल्लाबोल

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Kim Jong Un: काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Embed widget