एक्स्प्लोर

New Delhi : पूर आला तरी ताजमहालमध्ये पाणी शिरु शकत नाही; काय आहे त्यामागचं कारण?

Tajmahal Yamuna Water Level: यमुनेचं पाणी ताजमहालच्या भिंतीपर्यंत पोहोचलं असल्याची माहिती मिळत आहे. पण पाण्याची पातळी वाढली तरी ते ताजमहालमध्ये शिरू शकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे का?

New Delhi: नवी दिल्लीसह (New Delhi) देशातील अनेक राज्यांमध्ये यमुनेच्या पाण्याच्या पातळीत (Yamuna River Water Level Rise) लक्षणीय वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे आग्र्यातही (Agra) यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यमुनेचं पाणी ताजमहालच्या (Taj Mahal) भिंतीपर्यंत आल्याची बातमी आहे, जे गेल्या काही वर्षांत प्रथमच घडलं आहे. यमुनेचं वाढतं पाणी पाहून ते लवकरच ताजमहालच्या (Taj Mahal) आत जाईल आणि ऐतिहासिक वास्तूची हानी होईल, असं लोकांना वाटत आहे.

पण काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढली तरी ताजमहालच्या (Taj Mahal) वास्तुवर त्याचा काही परिणाम होणार नाही आणि पूर आला तरी वास्तूच्या आत पाणी जाणार नाही. पूरपरिस्थितीतही ताजमहालच्या (Taj Mahal) आत पाणी का जाणार नाही? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

जवळपास अर्ध्या शतकानंतर यमुनेचं पाणी ताजमहालच्या भिंतीजवळ आल्याची घटना घडली आहे. 1978 मध्ये यमुनेचं पाणी ताजमहालच्या भिंतीपर्यंत पोहोचल्याचा प्रकार घडला होता, त्यानंतर यावर्षी त्याची पुनरावृत्ती झाली. प्रसारित झालेल्या फोटोमधून आपण पाहू शकतो की ताजमहालच्या मागे बांधलेली बाग पाण्यात बुडाली आहे आणि पाणी ताज महलच्या अगदी जवळ आलं आहे. पण जास्त पाणी साचलं तरी ताजमहालबद्दल काळजी करण्यासारखं काही नाही.

पुरातही आत शिरणार नाही पाणी

खरं तर, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर देखरेख करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात (एएसआय) या ऐतिहासिक वास्तूला पाण्यापासून कोणताही धोका नसल्याचं म्हटलं गेलं आहे. एएसआयचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राज कुमार पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, "पुराचं पाणी ताज महलमध्ये जाण्याची शक्यता नाही. या वास्तुला कोणत्याही प्रकारचा धोका नसावा, अशा पद्धतीने या वास्तुची रचना करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोठा पूर आला तरी ताजमहालमध्ये पाणी शिरु शकत नाही.

पाणी कमी झाल्यास मात्र वाढते चिंता

ताजमहालमधील मुख्य समाधी (मकबरा) उंच मचाणावर बांधलेली आहे. तिच्या भोवती 42 विहिरी आहेत आणि विहिरींच्या वर साल लाकडाची रचना आहे. ताजमहाल एक प्रकारे लाकडाचा पाया रचून बांधला गेला आहे आणि त्या पाणी या लाकडांच्या संपर्कात आल्यास ती अजून मजबूत होतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा यमुनेतील पाणी कमी होतं, तेव्हा ताजमहालसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण त्यामुळे ताजमहालचा पाया कमकुवत होतो, लाकूड कमकुवत होतं. काही लाकडं अशी असतात की त्यांना पाण्यामधूनच ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे ते मजबूत राहतात.

यावरुन असा अंदाज लावला जाऊ शकतो की ताजमहालची रचना एका खास पद्धतीने केली गेली आहे, ज्यामुळे वास्तुला कोणताही धोका नाही. सध्या यमुना नदी आग्र्यात (Agra) 498 फूट पातळीवर वाहत असून, त्यात पुराची कमाल पातळी 495 फूट, तर मध्यम पातळी 499 फूट आहे. मात्र येत्या काही दिवसांत पुराचं पाणी 500 फूट ओलांडू शकतं, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा:

Sangli Rain: सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस! चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी; नद्यांच्या पाण्यात प्रचंड वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget