एक्स्प्लोर

Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?

Nitish Kumar : राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. नितीशकुमारांची शांतता नेमक्या कोणत्या राजकीय वादळाचे संकेत देतेय याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.

पाटणा : संसदेचं हिवाळी अधिवेशन नुकतंच संपलंय, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सर्वांना वेध लागलेले आहेत. नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरु केली आहे. याच दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं नाव पुन्हा चर्चेत आहे. नितीशकुमार यांचा जदयू आणि भाजप सध्या बिहारमध्ये सत्तेत आहे. नितीशकुमार पुन्हा एकदा एनडीएची साथ सोडणार का अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत. नितीशकुमार साधारण महिनाभरापासून शांत आहेत. त्यांच्या या शांततेच्या भूमिकेतचं भविष्यातील राजकीय वादळाचे संकेत असू शकतात अशा चर्चा आहेत. मात्र, नितीशकुमार किंवा जदयूच्या नेत्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही. 

नितीशकुमार शांत असल्यानं चर्चांना उधाण

नितीशकुमार गेल्या काही दिवसांपासून शांत आहेत. नितीशकुमार यांची प्रगती यात्रा सुरु आहे. मात्र, केंद्र आणि राज्यातील ज्वलंत मुद्यांवर ते शांत आहेत. वक्फ बोर्ड संशोधन बिल, वन नेशन वन इलेक्शन, अमित शाह यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वक्तव्य, अरविंद केजरीवाल यांचं पत्र, याबाबत नितीशकुमार यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळं नितीशकुमारांच्या मनात नेमकं काय असा सवाल उपस्थित आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात केलेलं वक्तव्य नितीशकुमारांच्या शांततेला कारणीभूत मानलं जात आहे. ते म्हणाले  होते की, बिहारमध्ये भाजपचं आपलं सरकार हीच वाजपेयीजींना खरी श्रद्धांजली असेल.

राजद जदयूसोबत पुन्हा आघाडी करणार?

राजदचे प्रमुख नेते बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारचं सीएमओ भाजप चालवतं आहे. सीएमओचं नियंत्रण भाजपच्या हातात आहे. जदयूचे चार नेते भाजपच्या संपर्कात आहेत, पूर्ण नियंत्रण अमित शाह करत आहेत, असं तेजस्वी यादव म्हणाले. ललन सिंह, संजय झा, अशोक चौधरी आणि विजय चौधरींकडे तेजस्वी यादव यांचा रोख आहे. गृहमंत्रालय जरी नितीशकुमार यांच्याकडे असलं तरी दिल्लीतून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तेजस्वी यादव वारंवार नितीशकुमार यांच्यावर हल्ला केला जात आहे. मात्र, जदयूकडून पलटवार केला जात नसल्याचं चित्र आहे. यापूर्वी राजदकडून आरोप झाल्यास जदयूकडून उत्तर दिलं जायचं. राष्ट्रीय जनता दल देखील पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या जदयूसोबत फारशी उत्सूक नसल्याचं म्हटलं जातंय.

एनडीए आणि राजद काँग्रेससोबत यापूर्वी सरकार 

नितीशकुमार आणि राजद यांनी एकत्रितपणे 2015 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी जदयू आणि राजदनं एनडीएला पराभूत केलं होतं. मात्र, सरकारला दोन वर्ष झाल्यानंतर नितीशकुमारांनी अचानक भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र, 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जदयूच्या जागा घसरल्या, भाजपच्या अधिक जागा निवडून आल्या. राजद आणि काँग्रेस विरोधात होती. मात्र, ऑगस्ट 2022 मध्ये अचानक मुख्यमंत्री नितीशकुमार माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी गेले. पुढं जदयू-राजदचं सरकार स्थापन झालं. पुन्हा दीड वर्षातच नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत आले. 28 जानेवारी 2024 ला नितीशकुमार एनडीएत आले आणि मुख्यमंत्री बनले. 

नितीशकुमार पुन्हा एनडीए सोडून इंडिया आघाडीत जातील अशा चर्चा सुरु असल्या तरी त्यांच्यासाठी हे आता सोपं राहिलेलं नाही.  गेल्या 18-20 वर्षांपासून बिहारच्या राजकारणातील किंग असलेल्या नितीशकुमार यांची भविष्यातील वाटचाल निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्यात आली, मात्र सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होऊ नये म्हणून नितीशकुमार यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएनं चेहरा जाहीर करावा असं वाटत आहे. 

इतर बातम्या :

बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget