एक्स्प्लोर

Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?

Nitish Kumar : राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. नितीशकुमारांची शांतता नेमक्या कोणत्या राजकीय वादळाचे संकेत देतेय याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.

पाटणा : संसदेचं हिवाळी अधिवेशन नुकतंच संपलंय, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सर्वांना वेध लागलेले आहेत. नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरु केली आहे. याच दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं नाव पुन्हा चर्चेत आहे. नितीशकुमार यांचा जदयू आणि भाजप सध्या बिहारमध्ये सत्तेत आहे. नितीशकुमार पुन्हा एकदा एनडीएची साथ सोडणार का अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत. नितीशकुमार साधारण महिनाभरापासून शांत आहेत. त्यांच्या या शांततेच्या भूमिकेतचं भविष्यातील राजकीय वादळाचे संकेत असू शकतात अशा चर्चा आहेत. मात्र, नितीशकुमार किंवा जदयूच्या नेत्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही. 

नितीशकुमार शांत असल्यानं चर्चांना उधाण

नितीशकुमार गेल्या काही दिवसांपासून शांत आहेत. नितीशकुमार यांची प्रगती यात्रा सुरु आहे. मात्र, केंद्र आणि राज्यातील ज्वलंत मुद्यांवर ते शांत आहेत. वक्फ बोर्ड संशोधन बिल, वन नेशन वन इलेक्शन, अमित शाह यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वक्तव्य, अरविंद केजरीवाल यांचं पत्र, याबाबत नितीशकुमार यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळं नितीशकुमारांच्या मनात नेमकं काय असा सवाल उपस्थित आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात केलेलं वक्तव्य नितीशकुमारांच्या शांततेला कारणीभूत मानलं जात आहे. ते म्हणाले  होते की, बिहारमध्ये भाजपचं आपलं सरकार हीच वाजपेयीजींना खरी श्रद्धांजली असेल.

राजद जदयूसोबत पुन्हा आघाडी करणार?

राजदचे प्रमुख नेते बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारचं सीएमओ भाजप चालवतं आहे. सीएमओचं नियंत्रण भाजपच्या हातात आहे. जदयूचे चार नेते भाजपच्या संपर्कात आहेत, पूर्ण नियंत्रण अमित शाह करत आहेत, असं तेजस्वी यादव म्हणाले. ललन सिंह, संजय झा, अशोक चौधरी आणि विजय चौधरींकडे तेजस्वी यादव यांचा रोख आहे. गृहमंत्रालय जरी नितीशकुमार यांच्याकडे असलं तरी दिल्लीतून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तेजस्वी यादव वारंवार नितीशकुमार यांच्यावर हल्ला केला जात आहे. मात्र, जदयूकडून पलटवार केला जात नसल्याचं चित्र आहे. यापूर्वी राजदकडून आरोप झाल्यास जदयूकडून उत्तर दिलं जायचं. राष्ट्रीय जनता दल देखील पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या जदयूसोबत फारशी उत्सूक नसल्याचं म्हटलं जातंय.

एनडीए आणि राजद काँग्रेससोबत यापूर्वी सरकार 

नितीशकुमार आणि राजद यांनी एकत्रितपणे 2015 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी जदयू आणि राजदनं एनडीएला पराभूत केलं होतं. मात्र, सरकारला दोन वर्ष झाल्यानंतर नितीशकुमारांनी अचानक भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र, 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जदयूच्या जागा घसरल्या, भाजपच्या अधिक जागा निवडून आल्या. राजद आणि काँग्रेस विरोधात होती. मात्र, ऑगस्ट 2022 मध्ये अचानक मुख्यमंत्री नितीशकुमार माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी गेले. पुढं जदयू-राजदचं सरकार स्थापन झालं. पुन्हा दीड वर्षातच नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत आले. 28 जानेवारी 2024 ला नितीशकुमार एनडीएत आले आणि मुख्यमंत्री बनले. 

नितीशकुमार पुन्हा एनडीए सोडून इंडिया आघाडीत जातील अशा चर्चा सुरु असल्या तरी त्यांच्यासाठी हे आता सोपं राहिलेलं नाही.  गेल्या 18-20 वर्षांपासून बिहारच्या राजकारणातील किंग असलेल्या नितीशकुमार यांची भविष्यातील वाटचाल निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्यात आली, मात्र सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होऊ नये म्हणून नितीशकुमार यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएनं चेहरा जाहीर करावा असं वाटत आहे. 

इतर बातम्या :

बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget