एक्स्प्लोर

कॉल ड्रॉप झाल्यास भरपाई मिळणार नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची कंपन्यांना सक्ती नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कॉल ड्रॉप प्रकरणी दूरसंचार कंपन्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे.   कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना प्रति कॉल एक रुपया भरपाई देण्याचे निर्देश ट्राय म्हणजेच भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणाने दिले होते. या विरोधात दूरसंचार कंपन्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.   दूरसंचार कंपन्यांची सुप्रीम कोर्टात धाव   कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना एक रुपया प्रति कॉल नुकसान भरपाई संबंधित दूरसंचार कंपनीने द्यावी, असे ट्रायचे निर्देश आहेत. ट्रायच्या या भूमिकेविरोधात दूरसंचार कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ट्रायच्या निर्देशांना योग्य ठरवत दूरसंचार कंपन्यांची याचिका फेटाळली होती. मात्र, दूरसंचार कंपन्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यामध्ये एअरटेल, वोडाफोन यांसह 21 कंपन्यांचा सहभाग आहे.   काय झाला सुप्रीम कोर्टात वाद? सुप्रीम कोर्टाने 3 मे रोजी ग्राहक आणि कंपन्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल राखीव ठेवला होता. या दरम्यान कंपनी आणि ग्राहकांच्या वकिलांकडून आपापली बाजू मांडण्यात आली. कंपन्यांकडून बोलताना वकील कपिल सिब्बल यांनी कॉल ड्रॉपसाठी सरकारी कर आणि स्पेक्ट्रमला जबाबदार ठरवलं. तर पहिल्या दोन कॉल ड्रॉपनंतर नुकसान भरपाई द्यावी, अशी बाजू ग्राहकांच्या वकिलांनी मांडली.   कंपन्यांच्या कर्जबाजारीपणामुळे ग्राहकांवर संक्रांत? दूरसंचार कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या असल्यामुळे संकटात आहेत. तरीही कंपन्या नवीन ग्राहक जोडतच आहेत, असा अंदाज ग्राहक सोसायटीने नोंदवला आहे.   सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2G प्रकरणात स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यामुळे दूरसंचार कंपन्यांचं मोठं नुकसान होऊन कर्जाचं ओझं डोईजड झालं आहे. कंपन्यांना स्पेक्ट्रमसाठी मोठी रक्कम भरावी लागत आहे, अशातच कॉल ड्रॉपचं अजून ओझं कंपन्यांवर टाकू नये, अशी याचिका कंपन्यांनी दाखल केली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 
अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 
तर चीनी फौजांकडून पराभूत कलंक देशाला लागला नसता! चीनी युद्धाच्या तीन वर्ष आधीच धोका सांगणारे कोल्हापूरचे सुपुत्र ले. जनरल एस. पी. पी. थोरात पाटील
तर चीनी फौजांकडून पराभूत कलंक देशाला लागला नसता! चीनी युद्धाच्या तीन वर्ष आधीच धोका सांगणारे कोल्हापूरचे सुपुत्र ले. जनरल एस. पी. पी. थोरात पाटील
पुण्यातील पुलावर टेम्पोचा अपघात, टेम्पोतील लोखंडी जॉब पुलाखालून जाणाऱ्या बाइकस्वारावर कोसळले अन्...
पुण्यातील पुलावर टेम्पोचा अपघात, टेम्पोतील लोखंडी जॉब पुलाखालून जाणाऱ्या बाइकस्वारावर कोसळले अन्...
Cloud burst in Jammu: जम्मूच्या किश्तवाड़मध्ये आभाळ फाटलं, 10 जणांचा मृत्यू, नेमकी परिस्थिती काय ?
जम्मूच्या किश्तवाड़मध्ये आभाळ फाटलं, 10 जणांचा मृत्यू, नेमकी परिस्थिती काय ?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 
अधिकाऱ्यांना शिवीगाळ, खंडणीसाठी ब्लॅकमेल, भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप 
तर चीनी फौजांकडून पराभूत कलंक देशाला लागला नसता! चीनी युद्धाच्या तीन वर्ष आधीच धोका सांगणारे कोल्हापूरचे सुपुत्र ले. जनरल एस. पी. पी. थोरात पाटील
तर चीनी फौजांकडून पराभूत कलंक देशाला लागला नसता! चीनी युद्धाच्या तीन वर्ष आधीच धोका सांगणारे कोल्हापूरचे सुपुत्र ले. जनरल एस. पी. पी. थोरात पाटील
पुण्यातील पुलावर टेम्पोचा अपघात, टेम्पोतील लोखंडी जॉब पुलाखालून जाणाऱ्या बाइकस्वारावर कोसळले अन्...
पुण्यातील पुलावर टेम्पोचा अपघात, टेम्पोतील लोखंडी जॉब पुलाखालून जाणाऱ्या बाइकस्वारावर कोसळले अन्...
Cloud burst in Jammu: जम्मूच्या किश्तवाड़मध्ये आभाळ फाटलं, 10 जणांचा मृत्यू, नेमकी परिस्थिती काय ?
जम्मूच्या किश्तवाड़मध्ये आभाळ फाटलं, 10 जणांचा मृत्यू, नेमकी परिस्थिती काय ?
Sunetra Pawar: पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिचवर आपण प्रयत्नच करतोय; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली खंत, सुनेत्रा पवार यांचाही नाराजीचा सूर
पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिचवर आपण अजूनही प्रयत्नच करतोय; रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली खंत
भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात गुड न्यूज, एस अँड पी नं भारताचं रेटिंग वाढवलं, अमेरिकेच्या टॅरिफनंतरही अर्थव्यवस्था मजबूत
भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात गुड न्यूज, एस अँड पी नं भारताचं रेटिंग वाढवलं, कारण समोर
Dam Water Maharshtra: उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
Embed widget