5G Network : 5G नेटवर्कमुळे होणार 'हे' फायदे; 10 महत्त्वाचे मुद्दे येथे पाहा
5G Internet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण पार पडलं. यासह भारताने टेलिकॉम क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे.
![5G Network : 5G नेटवर्कमुळे होणार 'हे' फायदे; 10 महत्त्वाचे मुद्दे येथे पाहा 5G Network launched 5G network will bring these benefits to India Check out 10 key points here 5G Network : 5G नेटवर्कमुळे होणार 'हे' फायदे; 10 महत्त्वाचे मुद्दे येथे पाहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/01/4f575e1489bfa483e8178335a71fbe321664615258457322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
5G Internet Launch : आज देशात बहुप्रतिक्षित अशा 5G नेटवर्कला (5G Internet Service) सुरुवात झाली आहे. यासह भारताने टेलिकॉम (Telecom Industry) क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. यामुळे भारतीयांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. भारतात सुरु असलेल्या डिजिटल इंडिया (Digital Inadi) चळवळीलाही या 5G इंटरनेट सेवेमुळे (5G Internet Benefits) फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण पार पडलं. यावेळी टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमटचा लिलाव पार पडला. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये 5G नेटवर्कसाठी चढाओढ पाहायला मिळाली होती. आज अखेर देशात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला असून याबाबतच्या महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर टाकूया.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC) कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेला सुरुवात झाली आहे. 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान IMC कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G चे फायदे आणि 5G सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली. परवडणारं तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला 5G नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे.
- पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, 2014 मध्ये भारतात 25 कोटी इंटरनेट युजर्स होते, आज ही संख्या 85 कोटी झाली आहे. ग्रामीण भागातून इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन आणि जुन्या युजर्सना इंटरनेटच्या 5G सेवेचा मोठा फायदा होईल.
- 5G चा म्हणजे Fifth Generation असा आहे. ही एक नवीन जागतिक वायरलेस प्रणाली आहे. 5G चा इंटरनेट स्पीड 4G पेक्षा दहा पटीने जास्त असेल.
- सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, 2023 पर्यंत देशातील बहुतांश शहरांमध्ये ही सेवा सुरु होईल असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
- 5G इंटरनेट सेवा सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर पसरेल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रिजचे (Reliance Industries Limited) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्स जिओच्या 5G (Reliance Jio 5G Service) इंटरनेट सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ डिसेंबर 2023 पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण देशात 5G सेवा पोहोचवेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.
- देशात 5G सेवा सुरू झाल्यामुळे देशात डिजिटल क्रांती होणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया चळवळीला चालना मिळेल.
- प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या 5G इंटरनेट लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पनवेल महानगर पालिका विद्यार्थांशी संवाद साधला. पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांशीही नी संवाद साधला.
- तज्ज्ञांच्या मते, 5G तंत्रज्ञानाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)