एक्स्प्लोर

PM Narendra Modi In Dehu: संतपरंपरेमुळे आज भारत एकजूट : नरेंद्र मोदी

भारतीय संतपरंपरेमुळे आज आपल्या जगण्याला दिशा मिळाली. आतापर्यंतच्या प्रत्येत कालखंडात अनेक संतांनी जन्म घेतला आणि समाजाचं जीवन समृद्ध करण्याचं काम केलं.

PM Narendra Modi In Dehu: भारतीय संतपरंपरेमुळे आज आपल्या जगण्याला दिशा मिळाली. आतापर्यंतच्या प्रत्येत कालखंडात अनेक संतांनी जन्म घेतला आणि समाजाचं जीवन समृद्ध करण्याचं काम केलं. संतांमुळे समाज एकवटला आणि कार्यशील झाला, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते देहूतील शिळामंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर वारकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते.

संतांची कृपा असली की ईश्वाराची कृपा होते. देहूच्या या पवित्र भूमिवर मला येण्याचं भाग्य मिळालं. संत तुकाराम महाराजांचं जन्म आणि कर्मस्थळ देहू आहे. काही दिवसांपुर्वी पालखी मार्गासाठी दोन महामार्गाचं चौपद्रीकरणाच्या भूमिपुजनाचं भाग्य लाभलं होतं. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची निर्मिती पाच टप्प्या होईल आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची निर्मिती तीन टप्प्यात होईल. या सगळ्या टप्प्या 350 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते तयार होतील आणि यावर 11 हजार करोड रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामुळे वाहतुकीला गती मिळेल, असंही मोदी म्हणाले.

ज्या शिळेवर संत तुकारामांनी 13 दिवस तपस्या केली. जी शिळा बोध आणि ज्ञानाची साक्षीदार आहे. ती फक्त शिळा नाही तर ती भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा आहे. देहूचं शिळामंदिर हे भक्तीच्या शक्तीचं केंद्र नसून  भारताच्या सांस्कृतिक भविष्याचं प्रतिक आहे, असं म्हणत त्यांनी वारकऱ्यांचं अभिनंदन केलं आणि आभार मानले. यावेळी  देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आम्हाला गर्व आहे की आपण जगाच्या प्राचीन गोष्टींपैकी एक आहोत. या सगळ्याचं श्रेय भारताच्या ऋषीमुनींना आण संतपरंपरेला जातं. भारत संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात भारतात देशाला आणि समाजाला दिशा देणारे अनेक महान लोक जन्माला आले. याच महान संतांमुळे भारत आज गतीशील आहे, असंही ते म्हणाले.

संत तुकारामांना संत बहिणाबाईंनी संतांच्या मंदिराचा कळस म्हणून संबोधलं आहे. ते अनेक अडचणींना सामोरे गेले. ज्यावेळी अनेकांनी माघार घेतली त्यावेळी संत तुकाराम पुढे आले त्यांनी संघर्ष केला. संत तुकारामांची सेवा, दया आणि कामाची प्रचीती त्यांच्या अभंगातून येते. या अभंगांनी आपल्या पीढीला प्रेरणा दिली आहे. अनेकांना जगण्याची दिशा दिली आहे. जो भंग होत नाही वेळेनुसार प्रासंगिक राहतो त्याला अभंग असं संबोधित केलं आहे.  आजही देश जेव्हा सांस्कृतिक मुल्यांवर पुढे जात आहे.  यात संत तुकारामांचे अभंग आपल्याला उर्जा देत आहे,अशा शब्दांत त्यांनी अभंगाचं महत्व सांगितलं.

संत नामदेव, एकनाथ, गोरोबा काका, संत चोखामेळा यांच्या अभंगामुळे कायम प्रेरणा मिळते. मानवांमध्ये भेदभाव न करण्याच्या त्यांचा संदेश फक्त भक्तीसाठी नाही तर राष्ट्र भक्ती आणि समाज भक्तीसाठी आहे.  याच संदेशावरुन आपले वारकरी प्रत्येक वर्षी पंढरपूरची यात्रा करतात. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ बिना भेदभावाने मिळतो आहे. दलित, वंचित, आदिवासी, गरिब मजूर यांची सेवा ही देशाची पहिली जबाबदारी आहे. समाजाला गती देण्यासाठी संत मंडळींनी कायम पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील तुकाराम महाराजांनी महत्वाची भूमिका निभावली. सावकरांनी शिक्षा झाली तेव्हा ते देखील तुकारामांचे अभंग गात होते. प्रत्येक कालखंडात संतांची महिमा कायम राहिली आहे. भारताची प्रत्येक यात्रा एक भारत श्रेष्ठ भारताचा संदेश दिला आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
Embed widget