एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: अजित पवारांनी ताकदवान छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का वगळलं?

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ हे मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे प्रचंड नाराज झाले होते. जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले.

मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या प्रचंड नाराज आहेत. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केवळ हजेरी लावून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) माघारी परतले होते. यावेळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. तसेच आता आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढील दिशा ठरवू, असा सूचक इशाराही छगन भुजबळ यांनी दिला होता. 

ऐशींच्या दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भुषविलेल्या आणि राज्यातील प्रमुख ओबीसी चेहरा असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचे धारिष्ट्य अजित पवार यांना का दाखवले, याची चर्चा या सगळ्यानंतर रंगली आहे. यासाठी काही दोन-तीन गोष्टी कारणीभूत मानल्या जात आहेत. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनावेळी घेतलेली प्रखर ओबीसीवादी भूमिका अजित पवार यांच्यासाठी अडचणीची ठरली होती. भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची भीती होती. तरीही छगन भुजबळ यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका जोमाने रेटली होती.

छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते असले तरी ते काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाला छेद देणारी भूमिका घेताना दिसून आले होते. हे करताना भुजबळांनी अजित पवार यांनाही जुमानले नव्हते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावेळी छगन भुजबळ यांनी स्वत:ची स्वतंत्र भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून मनोज जरांगे यांच्याविरोधात कोणीही चकार शब्द काढत नसताना छगन भुजबळ हे मात्र जरांगेंवर टीकेचे बाण सोडत होते. त्यामु ळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याचे चित्र होते. भुजबळ कुठेतरी आपल्या निर्णयांपेक्षा वेगळी भूमिका घेत आहेत आणि पक्षासाठी अडचण ठरत आहेत, असे अजित पवारांना वाटत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आधी छगन भुजबळ यांना दूर करणे राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारे नव्हते. मात्र, आता सत्ता आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दूर ठेवण्याचा आत्मविश्वास अजित पवार यांना आला असावा, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील 'ते' वक्तव्य भुजबळांना भोवलं?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजदीप सरदेसाई यांचे ‘2024: द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकात छगन भुजबळ यांच्यासंबंधीच्या एका प्रकरणाचा उल्लेख होता. यामध्ये छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट आणि अजित पवार यांची भाजपसोबत सत्तेत जाण्यामागील भूमिका विषद केली होती. त्यामध्ये भुजबळ यांनी म्हटले होते की, भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्म होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. काही काळ तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला पुन्हा ईडीची नोटीस आली होती. अजूनही तुरुंगाचे दिवस आठवल्यावर झोप उडते. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. अशा वळी भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती, असे छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. या सगळ्याचा उल्लेख संबंधित पुस्तकात होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक प्रकाशित झाल्याने अजित पवार यांची कोंडी झाली होती, तसेच त्यांच्या चारित्र्यावर पुन्हा शंका उपस्थित झाल्या होत्या.

आणखी वाचा

Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget