Mamata Banerjee: उद्धव ठाकरे वाघासारखे लढले, विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
Maharashtra Politics: ममता बॅनर्जी या अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यासाठी मुंबईत आल्या आहेत. यावेळी त्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटीला गेल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्याकडून उद्धव ठाकरेंची प्रशंसा.
![Mamata Banerjee: उद्धव ठाकरे वाघासारखे लढले, विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द Uddhav Thackeray fought like Tiger I will come to Maharashtra for his Vidhan Sabha Election campaign says mamata banerjee Mamata Banerjee: उद्धव ठाकरे वाघासारखे लढले, विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/d060a1aeba641955d4a16ae8d717ca291720785853992954_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते. तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली. मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येईन, असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केले. ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते. आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केलेय, म्हणून मी मुंबईत आले आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला. त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले. मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
मी काँग्रेसच्या नेत्यांना भेटत नाही कारण... ममता बॅनर्जींनी सांगितलं कारण
यावेळी ममता बॅनर्जी यांना काँग्रेस आणि तुमच्यात सर्वकाही आलबेल नाही का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, पूर्वी काँग्रेसचे मुरली देवरा हे माझ्या ओळखीचे होते. मुंबईत आल्यावर मी त्यांना भेटायचे. पण आता मी मुंबईत कोणत्याही काँग्रेस नेत्याला ओळखत नाही. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना मी ओळखते. त्यामुळे मुंबईत मी काँग्रेस नेत्यांना भेटत नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)