एक्स्प्लोर
Advertisement
नोटबंदी, त्र्यंबकेश्वर मंदिर, माहिम दर्गा... नाशिकमध्ये राज ठाकरे काय म्हणाले?... पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे एका क्लिकवर
Raj Thackeray : नोटबंदी, त्र्यंबकेश्वर मंदिर, माहिम दर्गासह अनेक प्रश्नाचे त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले.
Raj Thackeray In Nashik : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आजपासून दोन दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून, या काळात ते पक्षाचा आढावा घेणार आहे. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. नोटबंदी, त्र्यंबकेश्वर मंदिर, माहिम दर्गासह अनेक प्रश्नाचे त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहू यात त्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मद्दे...
- नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर ही वेळ आली नसती.
- 2 हजार रु. च्या नोटा आणल्या तेव्हा त्या एटीएममध्ये (ATM) भरल्या पण जात नव्हत्या, म्हणजे साधी तपासणीही केली नव्हती. म्हणजे कोणताही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का?
- त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत की जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो.
- माहिमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यावर उरूसावेळी तिथे जी चादर चढवली जाते, ती माहिम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चढवतो.
- इतर धर्माचा कुणी माणूस आपल्या धर्मात किंवा धर्मकार्यात आला तर लगेच धर्मभ्रष्ट व्हायला हिंदू हा इतका कमकुवत धर्म आहे का? मीही अनेक दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये गेलोय.
- आपल्याच धर्मात फक्त काही जातीनांच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. असले वाद घालणारी लोकं कोणत्या मनोवृत्तीची आहे.
- त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी त्या वादावर बोलावं बाहेरच्यांनी यात काही पडायची गरज नाही. यात कुणाला दंगली घडवायच्या आहेत का?
- ज्या गोष्टी चुकीच्या त्या चुकीच्याच. म्हणून मी त्रास देणाऱ्या मशिदींवरच्या भोंग्यांवर बोललो. माहीम समुद्रातील मजारीवर बोललो. गडकिल्ल्यांवर पण काही ठिकाणी अनधिकृत दर्गे उभे राहतात तेही हटवलेच पाहिजेत. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बुजून दंगली घडवायला काहीतरी खोदून काढायचं हे योग्य नाही.
- आतापर्यंतचा महाराष्ट्रात जिथे मराठी मुसलमान राहतात तिथे कधी दंगली होत नाहीत, कारण ते पिढानपिढ्या ते महाराष्ट्रात राहतात, मराठीत बोलतात. अशा ठिकाणांमध्ये जे सामंजस्य आहे ते विनाकारण बिघडवू नका.
- बहुसंख्य हिंदू असलेल्या देशामध्ये जर 'हिंदू खतरे में है' असं म्हटलं तर कसं होईल? निवडणुका जवळ आल्या की हा धार्मिक उन्माद वाढत जाईल.
- कोकणात हजारो एकर जमिनी कोकणवासियांना फसवून विकत घेतल्या जात आहेत. दलाल, अधिकारी यांच्या संगनमताने जमिनी गिळल्या जात आहेत.
- जैतापूरचा प्रकल्पाचं काय झालं? काहीच नाही. ती कंपनी बुडाली. तिथे जमीन विकत घेतलेली आहेच मग तिथे का नाही नेत तो प्रकल्प?
- कोकणी भूमिपुत्राकडून दलालांनी, धनदांगडग्यांनी जमिनी जिथे विकत घेतल्या आहेत तिथे प्रकल्प नेतात आणि मग सरकारकडून हजार पटीने भाव काढून घेतात. मग प्रकल्प झाला काय आणि नाही झाला काय यांना काहीच फरक पडत नाही.
- मी कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रिया दिली तर भाजप म्हणतं, "आमच्याबाबतीत कुणीही बोलू नये." म्हणजे हे कशाच्याही बाबतीत बोलणार पण यांच्याबाबतीत कुणी बोलायचं नाही. हा कोणता उद्दामपणा?
- देशात ईडी-काड्यांचे व्यवहार फार सुरु आहेत. एक लक्षात ठेवा कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. उद्या दुसरं सरकार येईल तेव्हा ते दामदुपटीने बदला घेतील म्हणून सत्ताधाऱ्यांनी चुकीचे पायंडे पाडू नयेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement