एक्स्प्लोर

ईडी, आयटी दोन नंबरचे व्यवहार करणाऱ्यांना मोकाट सोडून, राजकारण्यांच्या मागे लागलेत, जयंत पाटलांचा आरोप

ईडी, आयटी दोन नंबरचे व्यवहार करणाऱ्यांना मोकाट सोडून, राजकारण्यांच्या मागे लागला असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

वसई : ईडी, आयटी या यंत्रणांनी देशातील दोन नंबरचे व्यवहार करणारे, काळाबाजार करणाऱ्यांच्या मागे लागून केंद्र सरकारचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. मात्र, या संस्था अशा लोकांना मोकाट सोडून, राजकारण्यांची 10 ते 15 वर्षापूर्वीची प्रकरणे बाहेर काढून त्यावर बोट ठेवण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकप्रतिनीधींशी उद्धट बोलणाऱ्या पोलीस अधिकारी शेखर बागडेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज वसईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या दोघां नेत्यांनी आरोप केले आहे.  

विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा आज संपूर्ण दिवसभरासाठी वसई विरार आणि पालघर दौरा होता. या दौऱ्यात नालासोपारा आणि वसई विधानसभेतील कार्यकर्त्यांची आढावा बैठकही घेतली गेली. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी ईडी आणि आयटी यांच्यावर आरोप करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीला नामोहरम करण्यासाठी, सरकार पडत नाही म्हटल्यावर बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब भाजप करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.   

अलिकडच्या काळात प्रत्येकावर धाडसत्र टाकण्याचा प्रयत्न केलं जातोयं. ईडी, आयटी यांनी केंद्र सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी देशातील दोन नंबरचा व्यवहार करणारे, काळाबाजार करणारे, ज्याच्यांकडे अवैद्य संपती आहे. अशा लोकांच्या मागे लागले पाहिजे. मात्र, अलिकडे या संस्था राजकारण्यांच्या मागे लागल्या आहेत. अवैद्य व्यवसाय करणारी लोक मोकाट स्वैराचार करण्याला परवानगी आहे. तर राजकाणात 10 ते 15 वर्षापूर्वीची प्रकरण काढून, त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सरकार स्थिर आहे. भाजपाचे कार्यकर्ते सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षात प्रवेश करत आहेत. तिन्ही पक्ष बळकट होणार आहे. त्यामुळेच भाजप टोकाचे प्रयत्न आणि आरोप करतेय असा आरोप पाटील यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात होवू घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढण्यावर राष्ट्रवादीचा भर असेल असे संकेत पाटील यांनी दिले आहेत. जेथे शक्य आहे तेथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे संकेत पाटील यांनी दिले आहेत. आजचा परिवार संवाद दौरा आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेतले गेले. पक्ष वाढीसाठी काय करता येईल याची चाचपणी केल्याच पाटील यांनी म्हटलं आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र अव्हाड यांनी आज ट्विटद्वारे आरोप केलेल्या पोलीस अधिकाऱ्याविषयी गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षात असताना शेखर बागडे या पोलीस अधिकाऱ्याची वागणूक अत्यंत उद्धटपणाची होती. कुणीही लोकप्रतिनीधीची कॉलर पकडून त्याचा अपमान करतो. आर्थिक गुन्हे शाखेला बदली झाल्यावरही बिल्डरांकडून कार्यालयात बोलवून, हप्ते घेतल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केलाय. त्याचबरोबर त्यांची बेनामी संपती असल्याचही आरोप आव्हाड यांनी केलायं. आता परत ठाण्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यात रुजू होण्यासाठी बागडे प्रयत्न करत असल्याचा आरोप केलायं. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनीधी बद्दल जर आदर नसेल तर असा अधिकारी व्यवस्थेचा भाग होवू शकत नाही. त्याला बाजूला बसवण्याची मागणी महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षकांना केल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. बागडे माझ्याशी उद्धट बोलला. आणि माझ्याशी उद्धट बोलण्याचं संभाषण रेकॉर्ड केल्याचाही आरोप आव्हाड यांनी केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय, अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं सप्ष्टीकरण
भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय, अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं सप्ष्टीकरण
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report
Mumbai Pune Expressway Missing Link Traffic : उद्घाटनाचा घाट...का अडवली वाट? Special Report
Avinash Jadhav on Gunratna Sadawarte : एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
Embed widget