एक्स्प्लोर
Advertisement
नागपुरात तथाकथित अवैध सावकाराकडून शेतकरी महिलेचा विनयभंग करत मारहाण
नागपुरातील वाकेश्वर येथे तथाकथित अवैध सावकाराने शेतकऱ्याच्या पत्नीला शेतात मारहाण केल्याचा आणि तिची साडी सोडण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रार करुनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंबाने केला आहे.
नागपूर : जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर येथे तथाकथित अवैध सावकार आणि एका शेतकऱ्याच्या भांडणात शेतकऱ्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा आणि तिची साडी सोडण्याचा निंदनीय प्रकार घडला. 2017 साली सावकार आणि शेतकरी यांच्यातील कर्ज प्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. शेतकरी दाम्पत्याने या घटनेची तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी या घटनेत कोणताही गुन्हा दाखल न केल्यामुळे भाजपने या प्रकरणात गृह विभागाने लक्ष देण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर गावातील (शेषराव) या शेतकऱ्यानं उमरेड मधील सावकार (अभयचंद्र पाटील) या सावकराकडून 2 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यासाठी त्यांनी आपली दोन एकर शेती त्यांच्याकडे गहाण ठेवली. मात्र, सावकारानं शेतकऱ्याची जमीन गहाण न ठेवता धोक्यानं आपल्या नावानं रजिस्ट्री करून घेतली. दोन वर्षानंतर जेव्हा शेतकरी कर्जाची रक्कम घेऊन गेला. त्यावेळी या सावकारानं जमीन आपल्या मालकीची असल्याचं सांगितलं. त्यामुळं शेतकऱ्याला धक्का बसला. दरम्यान या वर्षी लवकर पाऊस दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यानं पत्नीसह शेतात पेरणी केली. मात्र, या सावकारानं 20 जून रोजी ट्रक्टरनं शेतकरी दाम्पत्याने केलेली पेरणी नष्ट केली. तसंच सावकाराने दोघांना शेतात येण्यास मज्जाव केला. सावकाराच्या पत्नीने (प्राजक्ता) शेतकऱ्यांच्या पत्नीला मारहाण केली असा आरोप शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे. सावकार आणि तिच्या पत्नीने माझ्या अंगावरील साडी सोडली, असा आरोपही शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे.
बियाणांमध्ये दोष आढळल्यास महाबिजवरही कारवाई करू, कृषिमंत्री दादा भुसे आक्रमक
तक्रार देऊनही गुन्हा दाखल नाही
घटनेच्या तीन दिवसानंतर शेतकरी दाम्पत्याने घटनेची तक्रार भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मात्र, तरी ही पोलिसांनी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. प्रकरणाचा तपास सुरू असून शेतकरी दाम्पत्या पोलीस स्टेशनला उशिरा आल्याने तपास पूर्ण करुन लवकरच कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, भाजपने या प्रकरणात उडी घेत हे प्रकरण निंदनीय असून या प्रकारात पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करायला हवा होता. तीन तासांच्या आत पोलिसांनी गुन्हा दाखल करावा नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे. तसेच त्यासंदर्भात मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना दिले. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BJP Andolan | शेतकरी कर्जवाटपासाठी भाजपचं आजपासून राज्यव्यापी आंदोलन
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
क्राईम
पुणे
Advertisement