एक्स्प्लोर

हिवाळी अधिवेशन : विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच विरोधकांचा ठिय्या

दुष्काळ निवारणाचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही, मराठा आरक्षणाबाबत अजूनही संदिग्धता आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. 'वा रे फडणवीस तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल' अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. अधिवेशन सुरु होण्याआधीच विरोधकांनी पायऱ्यांवर ठिय्या दिला. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत विरोधकांच्या घोषणांनी झालं. अधिवेशन हिवाळी असलं तरी मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षण, दुष्काळ आणि कर्जमाफी या मुद्द्यांनी अधिवेशन चांगलंच तापणार आहे. त्याची झलकही आज पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. दुष्काळ निवारणाचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही, मराठा आरक्षणाबाबत अजूनही संदिग्धता आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. 'वा रे फडणवीस तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल' अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. मराठा समाजाला ओबीसीच्या उपप्रवर्गात आरक्षण द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. स्वतंत्र कोट्यात आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही, असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे मराठा आमदारही विधीमंडळ परिसरात आक्रमक झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं बॅनर घालून आमदारांनी घोषणाबाजी केली. हिवाळी अधिवेशन : विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच विरोधकांचा ठिय्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पहिल्याच दिवशी सभागृहात पटलावर मांडला जावा, अशी मागणी विरोधीपक्षांनी केली होती. मात्र सरकार अहवाल सादर न करता थेट विधेयकाचा मसूदा तयार करुन विधेयक सभागृहात आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मसुदा तयार करण्यासाठी साधारण दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने तो 29 नोव्हेंबर रोजी सभागृहात पटलावर ठेवला जाण्याची शक्यता आहे. मुस्लिम आरक्षणावरुन एमआयएम आक्रमक आमच्या सेलिब्रेशनचीही तारीख सांगा, अशा मागणीचे पोस्टर एमआयएम आमदार वारिस पठाण यांनी विधानभवन परिसरात झळकावलं.  मराठा समाजासोबत मुस्लिमांच्या आरक्षणासाठीही पावलं उचला, अशी मागणी त्यांनी केली. 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार राहा, असं विधान मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाला उद्देशून केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर एमआयएमनेही पोस्टर झळकावत आपली मागणी लावून धरली आहे. हिवाळी अधिवेशन : विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच विरोधकांचा ठिय्या ओला-उबरवरुन विद्या चव्हाणांनी रावतेंना रोखलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना विधानभवनात प्रवेश करतानाच रोखलं. विद्या चव्हाण यांनी रावतेंना ओला-उबर संपाबाबात जाब विचारला. या संपामुळे सामान्यांचे नव्हे तर आमदारांचेही हाल होत असल्याचं चव्हाणांनी रावतेंना सांगितलं. हिवाळी अधिवेशन : विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच विरोधकांचा ठिय्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं, यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी अखंड महाराष्ट्राला जोडण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्राला एकत्र जोडून ठेवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे या महामार्गाला त्यांचं नाव देण्यात यावं, असं शिवसेना आमदार सुनिल प्रभू म्हणाले. पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकरवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. विधानपरिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनावर सरकारने दाखवलेल्या उदासिनतेबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. "कॉ. माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर तब्बल 30 तास सरकारने त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क केला नाही. शिवाय 30 तासांनंतर सरकारने संपर्क करुन आणखी दोन तास थांबा, असं उत्तर कुटुंबीयांना दिलं. त्यावर सरकारने दिलगिरी व्यक्त करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं," अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण घटनेबाबत खेद व्यक्त केला. "कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या अत्यंसंस्कराबाबत नेमकं काय झालं, याची माहिती घेत आहोत. या सर्व घटनेची दिलगिरी व्यक्त करुन, नेमकं काय झालं हे संध्याकाळपर्यंत कळेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode : राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी, गुन्हा नोंद होऊ शकतो; नसरापूर प्रकरणावर असीम सरोदे काय म्हणाले? 
राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी, गुन्हा नोंद होऊ शकतो; नसरापूर प्रकरणावर असीम सरोदे काय म्हणाले? 
SRPF : मोठी बातमी,अखेर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ अंतर्गत घेण्यात आलेली भरती स्थगित,एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ अंतर्गत घेण्यात आलेली भरती स्थगित,एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget