एक्स्प्लोर
Advertisement
डोंबिवलीनंतर कल्याणमध्ये प्लास्टिकच्या अंड्यांची विक्री?
कल्याण : काही दिवसांपूर्वी कोलकाता आणि चेन्नईमधून प्लास्टिकच्या अंडी विक्रीचे प्रकरण समोर आलं होतं. पण आता हे प्रकार मुंबई उपनगरातूनही समोर येत आहेत. डोंबिवलीनंतर कल्याणमध्येही प्लास्टिकच्या अंड्यांची विक्री होत असल्याचा आरोप होतो आहे.
कल्याणच्या दहिसर गावात राहणारे मदन नायकवडी यांनी एका दुकानातून तीन अंडी विकत घेतली होती. घरी येऊन ती फोडल्यानंतर एका अंड्यात प्लास्टिक सदृश्य पदार्थाचा थर दिसून आल्याचं नायकवडी यांचं म्हणणं आहे. तसंच या अंड्यापासून केलेल्या ऑमलेटची चव आणि वासही वेगळा येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नायकवडी यांनी केली.
तर मंगळवारी अमेय गोखले या ग्राहकानं 2 अंडी खरेदी केली. मात्र, ऑम्लेट करताना त्याला नेहमीसारखा वास आला नाही. त्याचबरोबर अंड्याच्या टरफलातून प्लास्टिकचा दोराही निघाल्याचं त्याचं म्हणणं आहे.
प्लास्टिकची अंडी ओळखायची कशी?
- प्लास्टिक अंड्यांच्या आतला पिवळा भाग हा जिलेटीन, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, सोडिअम एल्गिनाईटसारख्या रसायनांनी बनलेला असतो. याच रसायनांनी अंड्यांचा बाहेरील भाग बनवला जात असल्याचीही शक्यता आहे.
- प्लास्टिकची अंडी उकळल्यानंतर अंड्यांचा बाहेरचा भाग तोडल्यास कडक होतो. नेहमीच्या अंड्यांपेक्षा बनावट अंड्यांच्या आतील पिवळा भागाचा रंग अधिक गडद असतो.
- बनावट अंड्याच्या आतील पिवळा पदार्थ तव्यावर टाकल्यास तो तसाच राहतो. साधारण अंड्यांच्या पिवळ्या पदार्थासारखा तव्यावर पसरत नाही.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement