एक्स्प्लोर

Mumbai Fire : मुंबईतील बहुतांश रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना पाळल्या जात नाहीत : RTIमधून धक्कादायक माहिती

मुंबई शहरातील अनेक रूग्णालये आणि नर्सिंग होममध्येध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. प्रशासनाकडून मात्र अशा रूग्णालयांवर अद्याप काही कारवाई केली नाही

Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आज लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर या घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. मुंबईत आगीच्या घटना सतच घडत असतात. परंतु, आता ताडदेव भागातील घटनेमुळे मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजना नसल्याचे समोर आले आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात 1 हजार 574 नोंदणीकृत रुग्णालये आणि नर्सिंग होम आहेत. यातील अनेक रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजनांचे पालन केले जात नाही. शकील शेख यांनी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाला याबाबत अनेकदा पत्रे लिहूनही अनेक रूग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजनांची सुविधाच नसल्याचे समोर आले आहे. याबरोबरच  संबंधित विभागाने अशा रूग्णालयांवर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती, माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 

शकील शेख यांच्या माहितीनुसार, गेल्या 10 महिन्यांत राज्यातील 6 रुग्णालयांना लागलेल्या आगीत 60 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी शेख यांनी ज्येष्ठ वकील मुहम्मद झैन खान यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर 29 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी 10 डिसेंबर 2021 पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आणि शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर नर्सिंग होम, रुग्णालये आणि अग्निरोधक न चालवल्या जाणार्‍या नर्सिंग होमवर कारवाई करू शकतात असे सांगितले होते. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख अग्निशमन दल अधिकारी यांनी न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्रानुसार मुंबईतील 1 हजार 574 रुग्णालयांची पाहणी करण्यात आली असून यातील फक्त 687 रुग्णालयांकडेच अग्नी सुरक्षेबाबत नाहरकत प्रमाणपत्र आहेत. तर ज्या उर्वरित रूग्णालयांकडे नाहरकत प्रमाणपत्र नाही अशा रुग्णालयांना नोटीस पाठवल्या आहेत, असे सांगितले होते. 

न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुंबई शहरातील 887 रुग्णालयांकडे अग्नी सुरक्षा उपाय योजना करण्याचे नाहरकत प्रमाणपत्र नाहीत तर ही रूग्णालये अद्याप बंद  का करण्यात आली नाहीत? असा प्रश्न शकील शेख यांनी उपस्थित  केला आहे. 

अशा घटनांकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं :  प्रवीण दरेकर 
मुंबईत आगीच्या घटनांमधून शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. पालिकेने या घटनांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात पाहणी करणे गरजेचे आहे. याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन मुंबई शहरातील आगीच्या घटना कशा रोखता येतील यावर उपाययोजना करणे गरजेचे  आहे. शिवाय या घटनेतील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अशा अपघातांसाठी विशेष यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. आजच्या घटनेतील जखमींना ज्या रूग्णालयाने दाखल करून घेतले नाही त्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष  होत आहे. 50-50 मजली इमारतींसाठी फायर यंत्रणा नाही. आज घटना घडलेल्या इमारतीतील फायर यंत्रणा बंद होती मग महापालिकेची यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.  

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
Maharashtra Rain Updates: मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगेंची सगळ्यात मोठी मागणी मान्य; मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर
मनोज जरांगेंची सगळ्यात मोठी मागणी मान्य; मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Amit Thackeray : राजकारणाचा चिखल! ज्याच्याकडे गाड्या, पैसा, जो मित्र त्यालाच उमेदवारी, जनता कधी जागी होणार? अमित ठाकरेंचा संतप्त सवाल, कॉक्रोच जनता पार्टीबाबतही मोठं वक्तव्य
राजकारणाचा चिखल! ज्याच्याकडे गाड्या, पैसा, जो मित्र त्यालाच उमेदवारी, जनता कधी जागी होणार? अमित ठाकरेंचा संतप्त सवाल, कॉक्रोच जनता पार्टीबाबतही मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Khan Sir Coaching Class Case: खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Beed Crime News: लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
Embed widget