एक्स्प्लोर

परमबीर सिंह यांना ॲट्रॉसिटी तर रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी अटकेपासून 6 ऑगस्टपर्यंत दिलासा

परमबीर सिंह यांना ॲट्रॉसिटी तर रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी अटकेपासून दिलेला दिलासा 6 ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

मुंबई : परमबीर सिंह इतरांवर आरोप करून कारवाईपासून स्वतः लांब राहत आहेत. संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्या चौकशीस नकार दिला असला तरी नव्या अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी कितीही ठरवले तरी ते चौकशी टाळू शकत नाहीत आणि कायद्यापेक्षा कुणीही मोठ नाही, असा दावा राज्य सरकारनं बुधवारी हायकोर्टात केला.

कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप, एकापाठोपाठ दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांनी हायकोर्टात विविध याचिका दाखल केल्या आहेत. अशाच एका प्रकरणात निलंबन रद्द करण्यासाठी परमबीर यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप पोलीस निरिक्षक अनुप डांगे यांनीही केला आहे. याची दखल घेत राज्य सरकारने परमबीर यांची एसीबीमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ही चौकशी टाळण्यासाठी परमबीर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ दरायस खंबाटा यांनी कोर्टाला सांगितले की, परमबीर यांनी आपली तक्रार केंद्रीय प्रशासकीय लवादासमोर (कॅट) मांडायला हवी होती, पण त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. त्यांच्या या याचिकेत तथ्य नाही त्यामुळे ती फेटाळून लावावी.

परमबीर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला की, "त्या पत्रानंतर केवळ राज्य सरकारने सूड उगवण्यासाठीच प्राथमिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर डिजीपी संजय पांडे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनीही बाजू मांडताना परमबीर यांच्या याचिकेला विरोध केला आणि त्यांची याचिका प्रशासकीय सेवेशी निगडित असल्याने उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावावी अशी मागणी केली. दरम्यान राज्य सरकारच्यावतीने अॅड. जयेश याग्निक यांनी या दोन्ही प्रकरणाच्या चौकशीचा सीलबंद अहवाल खंडपीठासमोर सादर केला. न्यायालयाने याची दखल घेत याप्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे. 

दरम्यान ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्हा रद्द करण्यासाठीही परमबीर सिंह यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याप्रकरणात परमबीर यांना 6 ऑगस्टपर्यंत अटक करणार नाही, अशी हमी राज्य सरकारं दिली आहे.

रश्मी शुक्ला यांनाही दिलेला दिलासा कायम 

तत्कालीन राज्य सरकारच्या परवानगीनेच पोलीस दलातील बदल्यांच्या भ्रष्टाचाराबाबत फोन टॅपिंग करण्याचे आदेश दिल्याचा दावा राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बुधवारी न्यायालयात केला. शुक्ला यांनी या पोलीस महासंचालकांनी (डीजीपी) दिलेल्या निर्देशांचंच पालन केल्याचा दावाही शुक्ला यांच्यावतीनं करण्यात आला. त्यासाठी शुक्ला यांनी भारतीय टेलिग्राफ नियमांतर्गत कायदेशीररित्या राज्य सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून रितसर परवानगी घेतल्याचा दावाही त्यांच्यावतीनं महेश जेठमलानी यांनी हायकोर्टात केला. त्याची दखल घेत न्यायालयानं 5 ऑगस्टपर्यंत याप्रकरणाची सुनावणी तहकूब केली. आणि तोपर्यंत शुक्ला यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे याआधी दिलेले निर्देश कायम ठेवले आहेत. 

याचिका फेटाळल्यानंतरही राज्य सरकार अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयला सहकार्य करत नाही

दुसरीकडे अनिल देशमुख आणि राज्य सरकारनं सीबीआयच्या एफआयआर विरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावल्यानंतरही राज्य सरकार सहकार्य करत नसल्याची माहिती केंद्र सरकारनं कोर्टाला दिली. सीबीआयनं 22 जुलै रोजी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना एक पत्र लिहून रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारकडे दिलेल्या गोपनिय अहवालासंबंधित कागदपत्रांची प्रत मागितली. मात्र, ही कागदपत्र ही अन्य एका प्रकरणातील तपासाचा भाग आहेत असं उत्तर सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी सीबीआयला दिली. त्याची दखल घेत सीबीआयने याबाबत अर्ज दाखल करावा त्यावर सुनावणी घेऊ, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
Team India Squad Against New Zealand: रिंकू सिंग, इशान किशान IN, शुभमन गिल, जितेश शर्मा OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

व्हिडीओ

T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
Team India Squad Against New Zealand: रिंकू सिंग, इशान किशान IN, शुभमन गिल, जितेश शर्मा OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
Embed widget