एक्स्प्लोर

पालघर जिल्ह्यात समुद्र किनारी पाहुण्या पक्ष्यांची हजेरी, पक्षी मित्रांसाठी पर्वणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यांना स्थलांतराचे निर्बंध असले तरी हे निर्बंध पशुपक्षांना लागू होत नाहीत.पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागांत विविध स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात. यंदाही काही पक्ष्यांचं आगमन झालंय.

पालघर: कोरोना संक्रमण काळात मानवाला इतरत्र फिरण्यास बंधनं असली तरीही पक्ष्यांना मात्र बंधनं नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यांना स्थलांतराचे  निर्बंध असले तरी हे निर्बंध पशुपक्ष्यांना लागू होत नाही आणि याची प्रचिती पालघर मध्ये दिसून आली आहे. पालघरमधील पश्चिम किनारपट्टी भागातील वाढवण किनारपट्टी भागात नवरंग म्हणजेच इंडियन पिट्टा हा स्थानिक स्थलांतरीत पक्षी  दिसून आला आहे. या पक्षाचा वावर भारतासह श्रीलंका आणि पश्चिम आशियाई देशात दिसून येतो.
यातील काही पक्षी हे विणीच्या हंगामात त्यांच्या घरट्यांसह दिसून आले आहेत. तांबड्या छातीची हरोळी, कलहंस, नीलिमा, नवरंग, काळ्या डोक्याचा खंड्या, हळदीकुंकू बदक, नकेर, चातक, लाल कंठाची तिरचिमणी, चिंबोरी खाऊ, रेड नेक फॅलेरोप, पलास गल, उलटचोच तुतारी, सफेद मोठा कलहंस, रंगीत तुतारी, ग्रे-प्लॉव्हर , रिंग -प्लॉव्हर  कास्पियन प्लॉव्हर  या सारखे इतर समुद्रपक्षी आणि पाणथळ भागात दिसणारे पक्षी वाढवण आणि पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागांत आणि पाणथळ भागांत दिसतं असतात.
समुद्र मार्गे ओमानहून उडान घेऊन थंडीच्या महिन्यात वाढवण किनारी चिंबोरी खाऊ, तसेच उत्तर अमेरिकेहुन रेड नेक फॅलेरोप, तर मंगोलियाहून उडाण घेऊन कलहंस हा पक्षी वाढवण मधील पाणथळ भागात दिसून आला आहे. उत्तर अमेरीकेहून  रेड नेक फॅलेरोप हा पक्षी चिंचणी भागातील पाणथळ भागांत दिसून आला आहे तर पक्षांप्रमाणे इतर 40 हून अधिक स्थलांतरित पक्षीपालघर जिल्ह्यात दिसून आले आहेत.
पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागांत विविध स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात याचे कारण म्हणजे की आपला संपूर्ण किनारा हा खडकाळ असून येथे माशांना बिजोत्पादनाला अनुकूल असा भाग असल्याने या भागात मासे प्रजननासाठी येत असतात. त्याच प्रमाणे हा खडकाळ भाग असल्याने या भागात लहान खेकडे, शिंपल्या, खूबे हे आढळून येतात तर काही भागात चिखल असल्याने छोटे मासे व इतर लहान समुद्र जीव असल्याने या पक्ष्यांना मुबलक असा अन्नसाठा उपलब्ध असतो. त्याच प्रमाणे पालघर जिल्ह्यातील वसई पासून ते झाई बोर्डी या किनाऱ्यांवर झाडा झुडुपांचे काहीसे  प्रमाण असल्याने हे पक्षी आपल्या भागातील किनाऱ्यांवर दिसत असतात.
पालघर जिल्ह्यातील दातीवरे, नांदगाव , दांडी , उनभात, चिंचणी, वरोर, वाढवन, बोर्डी झाई या किनारपट्टी भागात नॉन डिस्टर्बिंग भाग म्हणजेच कमी रहदारीचा भाग असल्या कारणामुळे हे पक्षी येथे ऑगस्टपासून दिसायला सुरुवात होत असते. यापैकी दातीवरे आणि वाढवण किनाऱ्यावर असे पक्षी हमखास दिसत असतात. सुमारे 40 हुन अधिक पक्षांचा या किनाऱ्यांवर वावर आढळून येत आहे.
पक्षी निरीक्षक प्रवीण बाबरे सांगतात, अशा स्थलांतरित पक्ष्यांच्या ठिकाणांचे जतन करणे गरजेचे आहे. सध्या पालघर जिल्हयात औद्योगिकी कारणानं खूप वेग आला आहे. त्यामुळे एमआयडीसी क्षेत्रात  नवनवीन कारखाने उभारले जात आहेत. वाढते औद्योगिकीकरण ही काळाची गरज असली तरी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नदी-नाले समुद्रकिनारे यांचे जतन करणे गरजेचे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जल आणि वायू प्रदूषण पालघर जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे बोईसर आणि पालघर तालुक्यातील एमआयडीसीमध्ये वायुप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या या सर्व घटनांना वेळीच थांबवणे गरजेचे आहे. असे झाले नाही तर येणाऱ्या पुढील काही वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये समुद्रकिनारी व पाणथळ भागांमध्ये प्रदूषणाचा प्रभाव वाढत जाईल आणि त्यामुळे या किनारी असे स्थलांतरित पक्षी येणे कमी होत जाईल.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget