एक्स्प्लोर

parambir singh : परमबीर सिंह यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव - भाजप

Parambir Singh : परमबीर सिंह यांना भाजपने पळवून लावल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधून वारंवार करण्यात येत आहेत. या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Parambir Singh : परमबीर सिंह यांना भाजपने पळवून लावल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधून वारंवार करण्यात येत आहेत. या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. परमबीर सिंह यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव आहे, असा आरोप भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब असतील, पळुन गेले असतील तर गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. परमबीर सिंग राज्यातून पळून गेला कसा? याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मंत्री मलिक यांना दिलं आहे. परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंग पळून गेला मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना? रेशनकार्ड, आधार कार्ड हे इथलेच होते ना? महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करीत आहे, असं ते म्हणाले.

ते पळून गेले असतील तर ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय. परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. ते जर सापडले तर सरकारचे पित्तळ उघडे पडेल, त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, हा एक डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला.

परमबीर सिंह पळून गेलेले नाहीत, त्यांना पळवून लावलंय : संजय राऊत

केंद्राच्याच मदतीनं देशाबाहेर पळून जाता येतं, संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच परमबीर सिंह सध्या कुठे आहेत? अशा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. अनिल देशमुखांची अटक ही कायद्याला आणि नितिमत्तेला धरुन नाही. अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप करणारे लोक आहेत, ते आरोप करुन पळून गेलेले नाहीत. त्यांना पळून लावलेलं आहे. कोणीही देशाबाहेर पळून जातो, तो केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. मुंबई पोलीस खात्याचा आयुक्त असलेले, महासंचालक दर्जाचा अधिकारी जेव्हा हा देश सोडून जातो. तेव्हा त्याला संपूर्ण पाठबळ हे केंद्रीय सत्तेचं असल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाही. त्यांनी आरोप केले आणि ते पळून गेले. त्या आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात आणि महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना अटक केली जाते, असं राऊत म्हणाले. 

परमबीर सिंग कसे गेले?, नवाब मलिकांचा भाजपला प्रश्न

अनिल देशमुख यांना फसवलं आहे. परमबीर सिंह यांच्या मार्फत त्यांना फसवलं गेलं. परमबीर सिंहच्या माझ्यमातून राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात हजर राहिले. पण आरोप करणारे परमबीर सिंह कुठे गेले? राजकीय सुडापोटी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. राज्यातील नेत्यांना घाबरवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. लूकआऊट नोटीस काढल्यानंतर देश सोडून कसं जाऊ शकतात. कोणत्या मार्गे ते देश सोडून गेले? केंद्रानं उत्तर द्यावं. भाजप सत्तेत असलेल्या राज्यातून परमबीर सिंह यांनी देशाबाहेर पळ काढला का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Badlapur Local Train: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेन थांबण्याची जागा बदलली, नेमकं काय झालं?
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेन थांबण्याची जागा बदलली, नेमकं काय झालं?
Mumbai Crime news: मुंबईत धक्कादायक घटना, मुलुंडमध्ये फेरीवाल्याचा चाकू हल्ल्यात मृत्यू, पत्नीशी अनैतिक संबंधाचा रागातून टोकाचं पाऊल
मुंबईत धक्कादायक घटना, मुलुंडमध्ये फेरीवाल्याचा चाकू हल्ल्यात मृत्यू, पत्नीशी अनैतिक संबंधाचा रागातून टोकाचं पाऊल
Teena Choudhry VIDEO : माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
Abhijit Panse: 'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल
'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Pune Crime Navale bridge: नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
Embed widget