एक्स्प्लोर

2 रुपयांसाठी रिक्षाचालकाची अरेरावी, वादात तरुणाचा मृत्यू

मुंबईः रिक्षाचालक आणि प्रवाशांमधला वाद मुंबईकरांसाठी नवा नाही. पण अशाच एका वादामुळं आईनं पोटचा गोळा कायमचा गमावला आहे. कारण अवघ्या 2 रुपयांवरुन झालेला वाद तरुणाच्या जीवावर बेतला.     चेतन आर्चिणेकर हा तरुण गोव्याहून घरी नुकताचत विक्रोळीतील घरी परतला. पण रिक्षावाल्याशी सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरुन वाद सुरु झाला आणि जिवावर बेतला. या वादात चेतनचा मृत्यू झाला.   असा झाला वाद   चेतन नुकताच नोकरीला लागला होता. पहिलाच दौरा आटोपून गोव्याहून तो विक्रोळीतल्या घराच्या दारात परतला. पण दारातूनच कायमचा निघून गेला. विमानतळावरून चेतन एका रिक्षाने रात्री दीड वाजता घरी परतला. रिक्षाचं बिल 172 रुपये झालं. सुट्ट्या पैशावरून रिक्षावाला अडला. चेतनने वडिलांकडून 200 रुपये घेतले आणि रिक्षावाल्याला दिले.     चेतनने पैसे देताना या पुढे सुट्टे पैसे ठेव अशी सूचना रिक्षावल्याला केली. तिथेच रिक्षावाल्याने हुज्जत घातली आणि वाद वाढला. रिक्षावाला चेतनला काही तरी बोलून पळू जाऊ लागला. रिक्षावाल्याचा पाठलाग करण्याचा चेतनने प्रयत्न केला. मात्र रिक्षाच चेतनच्या अंगावर उलटला. यात चेतन गंभीर जखमी झाला. दवाखान्यात नेईपर्यंत चेतनचा मृत्यू झाला.   रिक्षाचालकांची मुजोरी कधी थांबणार?   हाताशी आलेलं पोर असं हकनाक गेल्याने आई-बाप चांगलेच कोलमडले आहेत. पोलिसांनी रिक्षाचालक कमलेश प्रसादला अटक केली आहे. पण अटक केल्याने चेतनचा जीव तर परत येणार नाही. रिक्षावाल्याने काही तरी बोलून पळ काढण्याऐवजी तिथेच थांबून संवाद साधणं गरजेचं होतं.     सगळेच रिक्षावाले मुजोर असतात असं नाही पण मुजोरीच्या घटना या त्यांच्याबाबतच जास्त घडतात. म्हणूनच प्रवासी आता ओला-उबेरसारख्या सेवेकडे वळत आहेत. ज्यांच्याविरोधात सध्या रिक्षावाल्यांची एकजूट झाली आहे. चेतनसोबत जे घडलं तो नियतीचा एक अपघात होता. पण रिक्षावाल्याने थोडा समजुतदारपणा दाखवला असता तर आज चेतननं फक्त 2 रुपयांसाठी जीव सोडला नसता.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget