एक्स्प्लोर

लातूरच्या अहमदपूरमध्ये 40 दिवसाआड पाणी; संतप्त महिलांचं नळाला लिंबू मिरची बांधून आंदोलन

अहमदपूरला पाणीपुरवठा करताना यंत्रणा सक्षमपणे काम करत नाही. याचा थेट फटका पाणी वितरणला बसत आहे. यात सर्वात प्रथम या धरणातून अहमदपूरला पाणी देण्याची यंत्रणा उभी झालेली आहे. काही कामे अर्धवट राहिली आहेत.

लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात पाणी समस्या कायमची आहे. याठिकाणी पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासन आणि येथील लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी तक्रार करून निवेदन दिल्यानंतर ही याची कोणीही दखल घेत नाहीत. 40 दिवसानंतर शहरात पाणीपुरवठा केला जातोय. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी नळाची पूजा केली. नळास लिंबू मिरची बांधत आपला रोष व्यक्त केला आहे. यापुढे पाणीपुरवठा सुरळीत नाही झाल्यास नगरपालिकेवर जाऊन आंदोलन करू, या पावित्र्यात महिला आहेत.

महिला का संतप्त झाल्या?

अहमदपूरला लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अहमदपूरपासून 20 किलोमीटरवर हे धरण आहे. याच धरणातून कंधार, जळकोट, लोहा आणि पालम शहराला नियामित पाणीपुरवठा होतो. मात्र अहमदपूरला पाणीपुरवठा करताना यंत्रणा सक्षमपणे काम करत नाही. याचा थेट फटका पाणी वितरणला बसत आहे. यात सर्वात प्रथम या धरणातून अहमदपूरला पाणी देण्याची यंत्रणा उभी झालेली आहे. काही कामे अर्धवट राहिली आहेत. असं असतानाही अहमदपूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिका प्रशासने पाणी वाटपाचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. तर लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे लक्षच नाही.

समस्यां काय आहे?

अहमदपूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा सुटता सुटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कामाची मुदत संपली असताना जिल्हाधिकारी यांनी आठ महिन्यांची मुदतवाढ दिली खरी मात्र कंत्राटदाराने अजून कामाला सुरुवातच केली नसल्याने योजनेचे भविष्य अधांतरीत दिसत आहे. राज्यस्तरीय नगरोत्थान अभियानच्या माध्यमातून 44 कोटी रुपयांची शहर पाणीपुरवठा योजना शासनाने मार्च 2017 रोजी मंजूर केली. पुढे या योजनेला मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी मे 2019 रोजी तांत्रिक मान्यता प्रदान केली. कामाची निविदा निघून मे. आर. जी सानप कन्स्ट्रक्शन यांना 4.15 टक्के जादा दराने निविदा मंजूर झाली खरी मात्र अगदी सुरुवातीपासूनच या योजनेला तक्रारीची घरघर लागलेली आहे. सुरुवातीला नगरसेविका कमलबाई आगलावे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून जादा दराची निविदा मंजूर करू नये, अशी तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन नगरपरिषदेला स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या अटीवर या जादा दराच्या निविदेस मंजूरी दिली. सदरील काम दोन वर्ष कालावधीत पूर्ण करायचे बंधन होते. या सर्व कामाचे तांत्रिक सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही शासकीय यंत्रना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.

मध्यंतरी कंत्राटदारने कामाची गती कमी करुन बारचार्टप्रमाणे काम करत नसल्याने निवेदेतील अटी शर्तीनुसार व मजीप्राच्या सूचनेनुसार नगर परिषदने कंत्राटदारस दंड लावायला सुरुवात केली. कंत्राटदारने या कृतीच्या विरोधात न्यायलायात दाद मागितली. न्यायालयाने काही काळ यावर स्थगिती आदेश दिला. त्यानंतर ही स्थगिती उठवली गेली. अशात कामाची दोन वर्षाची मुदत संपल्यामुळे नगर परिषदने ठराव करुन सदर निविदा रद्द करून नवीन निविदा मागवली. कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्याचा निर्णय नगर परिषदेने सभेने बहुमताने मंजुर केला.

या निर्णयाच्या विरोधात कंत्राटदाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल केले. जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेचाचा ठराव तहकूब करून कामास आठ महिन्यांची मुदतवाढ दिली. सुरुवातीपासूनच राजकारणाच्या शह-कटाशहात अडकलेली पाणीपुरवठा योजना जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढ देऊन सुद्धा कंत्राटदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आहे त्याच पद्धतीत असून या आठ महिन्यांमध्ये सुद्धा सदरील काम होईल असे कुठलेच चिन्ह दिसून येत नाही. एकूणच या सर्व परिस्थितीमुळे अहमदपूरकर मात्र प्रचंड वैतागलेले दिसत असून कुठपर्यंत नागरिकांनी कळ सोसायची असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे.

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget