एक्स्प्लोर

नवीन बदलाला दोन्ही बाजू असतात, विरोध होणारच : तुकाराम मुंढे

नाशिकचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी बातचीत केली.

पुणे : एखादा बदल करत असताना दोन्ही बाजू असतात. जसा विरोध होतो, तसेच पाठिंबा देणारेही असतात. पीएमपीएमएलमध्ये नवीन बदल करताना विरोध होणं अपेक्षित होतं. पण बदल थांबवणं शक्य नव्हतं. पुढची काही पावलं टाकायची होती, ती पुढे टाकली जातील, अशी अपेक्षा पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदावरुन बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली. पीएमपीएमएलच्या संचालकीय व्यवस्थापक आणि अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज निर्णय घेतले. ज्यामुळे कर्मचारी नाराज होते. तर राजकारण्यांशीही त्यांचे खटके उडाले. अखेर त्यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नाशिकचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी त्यांना विविध मुद्द्यांवर बोलतं केलं. ''या बदलीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो, मोठी जबाबदारी मिळाली आहे. इथल्या अनुभवाचा वापर करत नाशिकमध्येही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करु,'' असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. ''पीएमपीएमएलचा तोटा 50 टक्क्यांनी कमी झाला'' ''पीएमपीएमएलचा तोटा 31 मे 2017 रोजी 342 ते 343 कोटींचा होता. यावर्षी एप्रिल ते जानेवारीपर्यंत 43 कोटी आहे. एकूण आकडा 100 कोटींच्या आत राहिल. पीएमपीएमएलचा तोटा जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. गाड्यांचा मेंटेनन्स राहतो. अनावश्यक खर्चही कमी केला आहे,'' असा दावा तुकाराम मुंढे यांनी केला. ''प्रवासी केंद्रीत सेवा दिली'' ''जी सेवा प्रवाशांसाठी आहे, ती त्यांच्याचसाठी देण्याचा प्रयत्न केला. केवळ चांगली सेवा मिळावी एवढीच प्रवाशांची अपेक्षा असते. पीएमपीएमएलच्या कार्यपद्धतीत माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला. इंटेलिजेन्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवली. प्रवाशांना आज बसचे टाईम, गाडीचे मार्ग सगळं मोबाईलवर पाहता येतं. कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येतं. या सिस्टमचा मेंटेनन्ससाठीही फायदा झाला. पीएमपीएमएलच्या कायद्यानुसार आवश्यक ते सर्व नियम बदलले. नवीन कार्यप्रणाली लागू केली, त्यासाठी बोर्डाची परवानगी मिळवली,'' अशी माहितीही तुकाराम मुंढे यांनी दिली. धमकीची पत्र देणाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा सल्ला पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी असताना तुकाराम मुंढे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारी पत्रही पाठवण्यात आली. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र या सर्व प्रकारांमुळे अत्यंत वाईट वाटलं, असं तुकाराम मुंढे म्हणाले. ''धमकीची पत्र आली. त्याचा कुटुंबावरही परिणाम झाला. मात्र मनोबल कमी न होऊ देता काम केलं, कुटुंबाशी चर्चा केली. धमकी देणाऱ्यांना एकच सल्ला आहे, काम करत असताना पदाधिकारी, अधिकारी यांना अडथळा निर्माण करु नये. तुमचं काही वैयक्तिक हित असेल तर ते सांगावं, असा सल्लाही त्यांनी दिला. ''खाजगी गाड्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही'' कंत्राटदार आणि तुकाराम मुंढे यांचेही अनेकदा खटके उडाले. मात्र आपली सेवा चांगली असेल तर खाजगीकरणावर अवलंबून राहण्याची गरज नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले. ''इथे आलो तेव्हा आलो पीएमपीएमएलच्या केवळ 600 गाड्या रस्त्यावर होत्या. आज जवळपास 1100 गाड्या रस्त्यावर धावतात. यामुळे खाजगी गाड्यांवरील भार कमी झाला आणि सेवांमध्ये सुधारणा झाली,'' असंही त्यांनी सांगितलं. ''... तर संवाद वाढवायला हरकत नाही'' तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्याशी संवाद करण्यात अडथळा येतो, अशी अनेकांची तक्रार असते. एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी तुकाराम मुंढे यांना यावरही बोलतं केलं. ''आपल्या संवादामुळे प्रॉब्लम कमी होत असतील, तर संवाद वाढवायला हरकत नाही,'' असं ते म्हणाले. दरम्यान, एखाद्या ठिकाणी तरी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे का, या प्रश्नावरही मिश्कील शैलीत तुकाराम मुंढे यांनी उत्तर दिलं. ''आतापर्यंत तरी कुठे पूर्ण झाला नाही, मात्र नाशिकमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे,'' असं उत्तर त्यांनी दिलं. ''पीएमपीएमएलच्या कामाचा नाशिकमध्ये फायदा होईल'' ''नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अडचण आहे, असं म्हणतात. मात्र अशी अडचण तिथे असेल तर पीएमपीएमएलच्या कामाचा नक्कीच फायदा होईल,'' असं तुकाराम मुंढे म्हणाले. ''नाशिकच्या समस्या, तिथल्या गरजा याबाबतचा अभ्यास अजून केलेला नाही, मात्र या अनुभवाचा फायदा होईल,'' असं ते म्हणाले. व्हिडीओ : संपूर्ण मुलाखत

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget