Jayant Patil on Sharad Pawar : वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची चर्चा, पण जयंत पाटलांनी "तो" किस्सा सांगत केला गौप्यस्फोट!
Jayant Patil on Sharad Pawar : अनेक राजकीय नेते राष्ट्रवादीवर व शरद पवारांवर याचे खापर फोडताना मुख्यमंत्री असताना वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवारांनी कसं पाडलं याचा दाखलाही देत असतात.
![Jayant Patil on Sharad Pawar : वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची चर्चा, पण जयंत पाटलांनी There was talk of Sharad Pawar stabbing Vasantdada patill but Jayant Patal made a secret reveal Jayant Patil on Sharad Pawar : वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची चर्चा, पण जयंत पाटलांनी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/27/47c228a96969c41177c9af39cec7a7d1166688231888988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jayant Patil on Sharad Pawar : राज्याच्या राजकारणामध्ये नेहमीच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याची नेहमीच चर्चा होते. अनेक राजकीय नेते राष्ट्रवादीवर व शरद पवारांवर याचे खापर फोडताना मुख्यमंत्री असताना वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवारांनी कसं पाडलं याचा दाखलाही देत असतात. तसेच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला या शब्दात उदाहरण देतात. त्यामुळे शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असं बोललं जातं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यामध्ये वसंतदादा पाटलांनी शरद पवार यांना प्रमोट केल्याचं गौप्यस्फोट केला.
जयंत पाटील पुढे म्हणाले, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना आपले मोठे बंधू भगतसिंह पाटील हे एका कामानिमित्त भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी शरद पवार हे महाराष्ट्रातील पुढील राजकारणात नेतृत्व असल्याचा स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यावेळी शरद पवारांना वसंतदादा पाटील यांनीच एका अर्थाने प्रमोट केलं आणि त्यांच्या डोक्यात देखील महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने शरद पवार हे एकमेव नेतृत्व असेल असं होतं, अशा शब्दात जयंत पाटलांनी आटपाडीतल्या शेतकरी अभ्यास मेळाव्यामध्ये त्यावेळचा किस्सा सांगितला.
आटपाडीत पाण्याचा समान वाटा मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची कार्यशाळा
आटपाडी, सांगोला आणि तासगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा आटपाडीमधील कृषितंत्र विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. प्रत्येकाच्या शेताशेतापर्यंत मोजुन पाणी देणारी यंत्रणा येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी, हक्काचे पाणी, दोन पाळ्यांमधील काळात, आपल्या ताब्यात मोजून घेऊन, पाहिजे ती पिके घेण्याची यंत्रणा उभी करण्याचे प्रशिक्षण सुरु करण्यासाठी हा शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. भारत पाटणकर यांची उपस्थिती होती.
काय आहे ही योजना?
सर्व प्रकारच्या कुटुंबाना शेती उपयोगी पाण्याचा समान वाटा मिळवण्यात आणि हे पाणी बंद पाईपच्या माध्यमातून सर्वांच्या शेतीपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा अंमलात आणायला सुरुवात करण्यात या भागात यश मिळाले आहे. हा जगातील पहिला उपक्रम आहे. पण याची अंमलबजावणी करण्यासाठी गावागावातील लाभधारक सहभागी झाले नाहीत, तर संपूर्ण यंत्रणा लवकर सुरू होणार नाही. दोष राहू नयेत यासाठी अधिकाऱ्यांबरोबरच तज्ज्ञांचा सहभाग घेतला आहे. कृषी संशोधन केंद्र, बारामती ही संस्थासुद्धा या प्रयोगात मदत करणार आहे. येत्या मे महिन्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पाणी देण्याची यंत्रणा उभी करुन शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेणे, पाणी मोजून ताब्यात घेणे आणि उत्पन्न वाढविणे याचे मार्गदर्शन या अभ्यास मेळाव्यामध्ये करण्यात आले.
जयंत पाटलांचा केजरीवालांना टोला
दरम्यान, केजरीवालांचा पक्ष आता गुजरात निवडणूक लढवणार आहे, आपण हिंदू देवतांना मानतो हे दाखवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत असावेत. नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आहे, कारण गांधींना जगमान्यता आहे. आता नोटेवर देव देवता आणि महापुरुषांचे फोटो लावणे अशा मागण्या पुढे येत असून त्यामुळे वाद निर्माण होतील. आता जी पद्धत आहे तीच चालू ठेवणे योग्य असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)