एक्स्प्लोर

Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!

मुख्यमंत्रीपदावर ठाकरे गटाने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असं सातत्याने सांगितलं आहे.

Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा रणसंग्रामाला सामोरे जात आहे. विधानसभा निवडणूक येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच जागावाटपांच्या सुद्धा चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून जशी धुसफूस सुरू आहे, त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून काथ्याकूट सुरू आहे. मुख्यमंत्रीपदावरूनही दोन्हीकडे अजूनही एकमत झालेलं नाही.

शिवसेना ठाकरे गटाचा मुख्यमंत्रिपदावर दावा!

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून विशेष करून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये चढाओढ सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावर ठाकरे गटाने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील आणि सत्ता आल्यास तेच पुन्हा एकदा राज्याची कमान सांभाळतील असं सातत्याने सांगितलं जात आहे. काल (12 ऑक्टोबर) पार पडलेल्या दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा याची झलक दिसून आली. पहिल्यांदा संजय राऊत यांनी भाषण केल्यानंतर थेट मुख्यमंत्रीपदावरती दावा केला, तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंत घेतलेली शपथ उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यान दाखवण्यात आली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली.

गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस वार्तांकन करणारे पत्रकार आदेश रावल यांनी लोकमत हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी केल्या होत्या. तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याचा दावा आदेश रावल यांनी केला आहे.

राहुल गांधी महाराष्ट्रात कोणत्याही बदलाच्या तयारीत नाहीत 

राहुल गांधी सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये कोणताही निर्णय किंवा बदल करू इच्छित नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील असंच राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना सूचित केल्याचे त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून ही बाब जाहीरपणे सांगण्यात यावी आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी ठाकरे गटाकडून होत आहे. मात्र काँग्रेसला याला विरोध असल्याचा आदेश रावल यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस नेते दिल्लीत पोहोचले

दरम्यान, राज्यामध्ये आज महायुद्ध महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत गद्दारांचा पंचनामा सादर करण्यात आला. यामध्ये महायुतीकडून घेण्यात आलेल्या निर्णयांवर हल्लाबोल करण्यात आला. या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे राज्यातील नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी जागावाटपाच्या अनुषंगाने असल्याचे बोलले जात आहे. जागावाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये सर्वाधिक चढाओढ आहे. ठाकरे गटाकडून 140 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे, तर काँग्रेस सुद्धा 130 जागांवर अडून आहे, तर शरद पवार गटाचा 80 जागांवर दावा आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत पोहोचल्याची चर्चा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
मायलेकी एकाचवेळी 10 वी पास; मुलीसोबत आईचंही होतंय कौतुक; परीक्षेत दोघीही उत्तीर्ण, कुणाला किती गुण?
मायलेकी एकाचवेळी 10 वी पास; मुलीसोबत आईचंही होतंय कौतुक; परीक्षेत दोघीही उत्तीर्ण, कुणाला किती गुण?
Maharashtra Live Blog Updates: उत्तरप्रदेशात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? आगामी २-४ दिवसात होणार फेरबदल 
Maharashtra Live Blog Updates: उत्तरप्रदेशात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? आगामी २-४ दिवसात होणार फेरबदल 

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2026 | शनिवार
Mamata Banerjee: सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, विधानसभा बरखास्त झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, राज्यपालांनी विधानसभा विसर्जित झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट
यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
यूपीत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना अभिवादन बंधनकारक; खूर्चीवरून उठून स्वागत आणि फोन उचलावाच लागणार, आमदार कार्यालयात आल्यास खूर्ची सोडावी लागणार
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
धक्कादायक! अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; पीडितेच्या आईला पोलिस दाद देईना, गुन्हाही दाखल होईना
डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची बंदी; चार दिवसांपूर्वीच म्हणाली होती, 'मी बृजभूषण सिंहच्या शोषणाची बळी'
डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची बंदी; चार दिवसांपूर्वीच म्हणाली होती, 'मी बृजभूषण सिंहच्या शोषणाची बळी'
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या
Embed widget