एक्स्प्लोर

ABP Majha Impact : एबीपी माझाच्या दणक्यानंतर कोल्हापुरात 24 तासांमध्ये रस्त्यांचे काम सुरु, पण पॅचवर्क करताना महापालिकेची "चिंधीगिरी" सुरुच! गुणवत्तेला तिलांजली 

कोल्हापूर मनपातील जल अभियंत्याच्या आईचा 15 दिवसांपूर्वी खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार एबीपी माझाने 28 ऑक्टोबर रोजी उघडकीस आल्यानंतर रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले आहे.

ABP Majha Impact : खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूर शहरातील रस्त्यावर महानगरपालिकेच्या जल अभियंत्याच्या आईचा 15 दिवसांपूर्वी खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार एबीपी माझाने 28 ऑक्टोबर रोजी उघडकीस आणला. त्यापूर्वी सुद्धा एबीपी माझाने शहरातील बकाल रस्त्यांचा विषय लावून धरताना महापालिकेला चांगलेच फैलावर घेतले होते.

एबीपी माझाने दिलेल्या दणक्यानंतर कोल्हापूर शहरातील शुक्रवारी तातडीने अभियंत्याच्या आईचा मृत्यू झालेल्या मार्गावर तसेच नंगीवली चौकापासून संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरही खडीकरण करण्यात आले. दरम्यान, एबीपी माझाने दिलेल्या दणक्यानंतर रस्त्यांचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याने नागरिकांनी एबीपी माझाचे आभार मानले. एबीपी माझाने संभाजीनगर ते नंगीवली चौक मृत्यूचा सापळा झाल्याचे वृत्त 18 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले होते. मात्र, काम सुरु करताना पुन्हा एकदा महापालिकेची चिंधीगिरी समोर आली आहे. 

पूर्वी केलेल्या पॅचवर्कची "माती" आणि नव्याने परत चिंधीगिरी 

महापालिकेकडून नंगीवली चौकाकडून येणाऱ्या सुनिता बेकरीपासून रेसकोर्स चौकापर्यंत पार कचरा झालेल्या मार्गाचे काल खडीकरण करण्यात आले. नंगीवली चौकापासून संभाजीनगरच्या दिशेने येताना जी दगडी खडी उखडली होती त्यावर पुन्हा पॅचवर्क करण्यात आले आहे. हा अपवाद सोडल्यास या रस्त्यावर अजूनही शेकडो खड्डे आहे त्याच स्थितीत आहेत. त्यामुळे पॅचवर्क दाखवण्यासाठी केलं जात आहे का? असा मुद्दा उपस्थित होतो.

रेसकोर्स नाक्याजवळ ज्या ठिकाणी खडीकरण थांबवण्यात आले आहे. तेथून अवघ्या काही फुटांवर खड्डे आहे तसेच आहेत. त्यामुळे हे पॅचवर्क झाल्यानंतर पुन्हा ते खड्डे कधी गुडघाभर होऊन जातील याचा नेम नाही. रेसकोर्सकडून नंगीवलीच्या दिशेने जातानाही शेकडो खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे काम करताना दिसले नाहीत? की त्यासाठी आणखी कोणी रक्त सांडण्याची वाट पाहणार आहेत? शहरातील अन्य मार्गावरही कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. 

महापालिकेची संवेदना हरवली आहे का?

कोल्हापूर शहरामध्ये हजारो भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. त्यांना या खड्ड्यातून मार्ग काढतच मार्ग जावे लागते. शहरवासियांसह जिल्ह्यामध्ये येणारा प्रत्येक या बकाल रस्त्यांनी पार वैतागून गेला आहे. त्यामुळे पॅचवर्क सुरु केलं आहे, तर त्यामध्ये गुणवत्ता असावी असे का वाटत नाही? गेल्या पाच वर्षामध्ये 21 कोटी रुपयांचे पॅचवर्क आणि 25 कोटी नवीन रस्त्यांवर खर्च करण्यात आले आहेत. असे असतानाही रस्ते दर्जेदार का होत नाहीत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दररोज अपघात घडत असताना पालिका प्रशासनाची संवेदना हरवली आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 

धुळीने डोळे बाद होण्याची वेळ आली 

परतीचा पाऊस पूर्ण थांबल्याने खड्डे मुजवण्यासाठी जो मुरुम वापरला आहे त्याच्यावरून वाहने गेल्यानंतर धुळीचे लोट तयार होत आहेत. शहरातील बऱ्याच मार्गांवर मरणाला रात्र आडवी म्हणून पॅचवर्कसाठी मुरुम आणि खडी पसरण्यात आली आहे. धुळीचे लोट निर्माण होत असल्याने डोळ्याचे आणि श्वसनाचाही त्रास होऊ लागला आहे. शहरातील खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघातही घडत आहेत. त्यामुळे चांगले रस्ते कोल्हापूरकरांच्या नशिबीच नाहीत का? असाच काहीसा प्रश्न पडत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: 'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget