एक्स्प्लोर

लातूर विभागात फक्त पाच टक्के पेरणी

खरीप हातचा गेल्यानंतर आशा होती रब्बीवर.. मात्र अजूनही या भागात पाऊस नसल्याने रब्बीच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. मराठवाड्यातील या पाच जिल्ह्यात अवघ्या पाच टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पाणीसाठा असेल तरच पेरणी करा असा सल्ला कृषी विभाग शेतकऱ्यांना दिला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना तर यावर्षी संधीच नाही.

लातुर : खरीपातील पिकाची काढणी होऊन दीड महिना लोटला तरी यावर्षी मराठवाड्यात रब्बीची लगबग पहायला मिळत नाही, पावसाने ओढ दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. कधी नव्हे ते यावर्षी मराठवाड्यातील अनेक गावात शेतकऱ्यांनी अजूनही चाढ्यावर मूठच धरलेली नाही. लातूर जिल्ह्यातील फक्त पाच टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.

लातूर ,उस्मानाबाद ,परभणी ,हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात पावसाने सुरुवातीला साथ दिली, मात्र त्यानंतर पावसाने पाठच फिरवली. यामुळे या भागातील खरीप पिके प्रभावित झाली. हातातोंडाशी आलेलं पीक कसं तरी जगलं मात्र उत्पादन खर्च ही वसूल झाला नाही.

खरीप हातचा गेल्यानंतर आशा होती रब्बीवर.. मात्र अजूनही या भागात पाऊस नसल्याने रब्बीच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. मराठवाड्यातील या पाच जिल्ह्यात अवघ्या पाच टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये लातूर 11.10 टक्के, उस्मानाबाद 0.70 टक्के, परभणी 1.48 टक्के, हिंगोली 8.54 टक्के, नांदेड 10.94 टक्के पेरणी झाली आहे. पाणीसाठा असेल तरच पेरणी करा असा सल्ला कृषी विभाग शेतकऱ्यांना दिला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना तर यावर्षी संधीच नाही.

खरीप उत्पादनात घट झाली तरी काही ठिकाणी तुरळक पिके शेतकऱ्यांच्या पदरी पडली होती. मात्र, रब्बी हंगामासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेली ओलही जमिनीत नसल्याने उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर तालुक्यात पेरा शून्य टक्यांवर आहे. तर उर्वरीत 6 तालुक्यामध्येही केवळ 10 टक्के पेरणी झाली आहे.

सप्टेंबरच्या अखेरीसच दरवर्षी रब्बी हंगामाला सुरूवात होते. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे देखील विकत घेण्याचं धाडस केलेलं नाही. ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणीसाठा आहे त्याच शेतकऱ्यांनी रब्बीत पेरण्या उरकल्या आहेत. जनावराच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची चिंता ऐन हिवाळ्यातच सुरू झालीय.

जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र एक लाख 93 हजार हेक्टर असले तरी दरवर्षी तीन लाखापर्यंत पेरा होत असतो. त्यामुळे यंदा सरासरीच्या दुपटीने नव्हे तर सरासरी इतकाही पेरा होणार नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सर्व जलस्त्रोत तळाला गेले असून शेतकऱ्यांना भविष्यातील पाणीटंचाई सतावतेय. चाकूर तालुक्यातील गांजूर गावात शेतकऱ्यांनी यावर्षी रब्बीची पेरणीच केलेली नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?
Sushma Andhare: अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यातील बिल्डर चोरडिया बंधूंचा प्रताप, बंगल्यासमोरील गरिबांच्या हातगाड्या नकोशा, कोरेगाव पार्कमध्ये एका रात्रीत 'अख्खं गार्डन' उगवलं
पुण्यातील बिल्डर चोरडिया बंधूंचा प्रताप, बंगल्यासमोरील गरिबांच्या हातगाड्या नकोशा, कोरेगाव पार्कमध्ये एका रात्रीत 'अख्खं गार्डन' उगवलं
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Embed widget