एक्स्प्लोर

MPSC चा नवीन अभ्यासक्रम खासगी क्लासेसचा गल्ला भरण्यासाठी? विद्यार्थ्यांनी उपस्थित केल्या 'या' शंका

MPSC Exam : एमपीएससीने नेमलेल्या एक सदस्यीय समितीच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली आहे. तसेच मुख्य परीक्षेतील बदलावर विद्यार्थ्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. 

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केला आहे. परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल होणं तसं चांगलंच आहे. आधीची बहुपर्यायी पद्धत बदलून आता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी यूपीएससी प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागू होणार आहे. यासंबंधी एमपीएससीने अभ्यासक्रमही जाहीर केला आहे. एमपीएससीने यूपीएससीचा अभ्यासक्रम काही अंशी बदल करुन तसाच उचलला आहे. 

एमपीएससीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा ही एकूण 1750 गुणांची असेल तर मुलाखत ही 275 गुणांची असेल. अंतिम निकाल हा एकत्रितरित्या 2025 गुणांवर लावण्यात येणार आहे. या नव्या पद्धतीची शिफारस ही एमपीएसचीच्या एक सदस्यीय समितीने केली होती. या समितीच्या कार्यपद्धतीवरच आता विद्यार्थी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. आयोगाने ही नवीन परीक्षा पद्धत खासगी क्लासेसचा गल्ला भरण्यासाठी जाहीर केली आहे का असा प्रश्न पुण्यात अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. 

खासगी क्लासेसना फायदा? 

स्पर्धा परीक्षेच्या मुख्य परीक्षेचा पॅटर्न यूपीएससीप्रमाणे बदलण्यासाठी एमपीएससीने एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत दळवी हे होते. समितीचा सदस्य हा कोणत्याही संस्था किंवा क्लासेसशी संबंधित नसावा, तसे असल्यास पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येऊ शकते. चंद्रकांत दळवी यांनी पुण्यातील दोन सुप्रसिद्ध खासगी क्लासेसच्या कार्यक्रमांना अनेकदा उपस्थिती लावल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे या समितीने शिफारस केलेला पॅटर्न हा खासगी क्लासेसचा गल्ला भरण्यासाठी फायदेशीर आहे का? किंवा खासगी क्लासेसचे यामध्ये हितसंबंध जपले गेले आहेत का? असा सवाल काही विद्यार्थांनी नाव न सांगण्याच्या अटींवर उपस्थित केला आहे. 

समितीच्या अहवालावर एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या सूचना मागवणं अपेक्षित होतं. तसेच विद्यार्थ्यांना या संबंधी पूर्वसूचना देण्यात आल्या नाहीत अशी तक्रार विद्यार्थी वर्गातून व्यक्त केली जात आहे. 17 ऑक्टोंबर 2022 रोजी एमपीएससीने पहिल्यांदा इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम प्रसिद्ध केला. नंतर तो अभ्यासक्रम मराठीमध्ये भाषांतरित करण्यासाठी दोन महिने लावले. 2023 पासून हा नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी गेले सहा ते सात वर्षांपासून विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्याकडून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. 

एमपीएसचीच्या मुख्य परीक्षेच्या नव्या पॅटर्नवर विद्यार्थ्यांनी खालील प्रश्न उपस्थित केलेले आहेत, 

1. कोणतीही परीक्षा पद्धत ठरवत असताना त्याद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांचा विचार व्हावा. UPSC मधून दरवर्षी IAS, IPS ही धोरणात्मक निर्णय घेणारी पदे भरली जातात तर MPSC राज्यसेवा  मधून साधारण 75 टक्के भरती वर्ग दोन पदांसाठी घेतली जातेय.

2. तसेच उपजिल्हाधिकारी पोलिस उप-अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ही पदं वगळता इतर कोणालाही IAS, IPS होण्याची संधी नाही. त्यातही उपजिल्हाधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक पदांची भरती एमपीएससीकडून दरवर्षी होत नाही. 

3. सद्यस्थितीत अभ्यासक्रम ठरवताना तो UPSC चा काॉपीपेस्ट केला आहे. तसेच काही शंका असल्यास इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम अंतिम समजला जाईल असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. मराठी माध्यमात उपलब्ध साहित्य, मराठी आणि इंग्रजी लिहण्याच्या वेगातील फरक या सगळ्या गोष्टी पहाता इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना नैसर्गिक फायदा होणार असल्याचं चित्र आहे. 

4. वैकल्पिक विषयामध्ये टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल विषयामध्ये मार्कचा फरक पडू शकतो. देशातील इतर राज्यसेवांचा विचार करता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश सोडल्यास इतर राज्यात वैकल्पिक विषय दिसून येत नाही. 

5. अभ्यासक्रम ठरवताना महाराष्ट्राच्या संदर्भात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, संस्कृती या विषयांचा विशेषत: विचार करण्यात आला नाही. तेलंगाणा, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात राज्यसंदर्भात मुख्य परीक्षेला वेगळे पेपर आहेत. 

6. सध्याच्या पॅटर्ननुसार क्लासेसची तशी गरज नाही. सध्या बरेच विद्यार्थी गावी, घरी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करत आहेत. परंतु नवीन पॅटर्ननुसार क्लास लावणे अपरिहार्य होणार आहे. नवीन पॅटर्ननुसार क्लासेसची फी सध्या दोन ते तीन लाखाच्या घरात आहे. यामुळे ग्रामीण, गरीब विद्यार्थी आपोआप यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

7. मुलाखतीमध्ये जास्त मार्क्सचा फरक पडू नये म्हणून जवळपास इतर राज्यामध्ये 50 -100 मार्क्सची मुलाखत घेण्यात येते. आंध्रप्रदेशसारख्या राज्यांनी ग्रामीण मुले मागे पडू नये म्हणून मुलाखतच रद्द केली आहे. तर कर्नाटकसारख्या राज्याने मुलाखतीचे गुण 200 वरुन 25 आणले आहे. असे असताना MPSC ची 275 मार्क्सची मुलाखत घेणं कितपत योग्य ठरेल. 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
धक्कादायक! गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच, व्हिडिओ व्हायरल, CEO कडून निलंबन
धक्कादायक! गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच, व्हिडिओ व्हायरल, CEO कडून निलंबन
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget