एक्स्प्लोर

हल्लेखोरांचा सत्कार, माजी सैनिकाला मात्र लाथा बुक्क्यांचा मार; खासदार नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असं नवनीत रवी राणा यांनी म्हटलं.

अमरावती : आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. कोरोनावर आणि विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं पण शिवसैनिकांकडून माजी सैनिक मदन शर्मांवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी बोलणं टाळलं आणि हाच मुद्दा पकडून अमरावतीच्या खासदार चांगल्याच संतापल्या. एक कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे शिवसैनिकांनी एका माजी सैनिकांवर जीवघेणा हल्ला केला. यामुळे सगळीकडे टीकेचा सूर पाहायला मिळाला. त्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असं नवनीत रवी राणा यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेला दिशा दाखवतील व काही दिलासा देतील या अपेक्षेने जनता डोळे लावून बसली होती. पण जनतेचा भ्रमनिरास झाला. हा संवाद नव्हता तर केवळ शब्दांचा खेळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एक माजी सैनिक मदन शर्मा यांचेवर काही गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी भ्याड हल्ला केला. त्यांना रक्तबंबाळ करून बेदम मारहाण केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्याचे निर्लज्जपणे समर्थन केले. हा केवळ एका माजी सैनिकवरील हल्ला नव्हता तर देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या, घरदारापासून दूर राहुन देशसेवा करणाऱ्या व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून देशवासीयांची सेवा करणाऱ्या संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा हा अपमान होता व माजी सैनिकांचे मनोबल खच्ची करण्याचा हा प्रयत्न होता, असं त्या म्हणाल्या.

आजच्या संबोधनात मुख्यमंत्री याविषयी काहीतरी बोलतील किंवा दिलगिरी तरी व्यक्त करतील अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्र्यांनी या विषयावर एक शब्दही काढला नाही यावरून त्यांना माजी सैनिकांबद्दल किती आदर आहे हे स्पष्ट होते. उलट खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्याचे समर्थन केले म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे सुद्धा या हल्ल्याला समर्थन होते हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. खासदार नवनीत रवी राणा या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक झाल्या असून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

माजी सैनिक या देशाची शान आहे. राष्ट्राचा स्वाभिमान आहे एक खासदार म्हणून आपण त्यांच्याप्रती कायम आदर बाळगून ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे सांगून या हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांना 2 तासात जामीन कसा मिळाला? त्यांना सोडणे म्हणजे सैनिकांची थट्टा होय असं समजून या प्रकरणात माजी सैनिकांना न्याय मिळावा म्हणून आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणाची माहिती देणार असून कठोर कार्यवाहीसाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितलेले.

सोबतच लोकसभेत सुद्धा हा प्रश्न मांडून सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. देशातील जनतेने ठामपणे माजी सैनिकांचे पाठीशी उभे राहावे व महाराष्ट्रात अराजकता माजली आहे त्यासाठी तमाम महाराष्ट्र वासीयांनी सुद्धा या अन्यायाविरुद्ध एक व्हावे असे आवाहन खासदार नवनीत रवी राणा यांनी केले आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget