एक्स्प्लोर

राज्यातील पेपरफुटीच्या मागे वादग्रस्त महाआयटी पोर्टल?; मंत्रालयातील 'बडे बाबू' आणि राजकारण्यांचा पोर्टलवर वरदहस्त

Paper Leak Racket : राज्यातील  पेपरफुटीच्या मुळाशी राज्याचा माहिती आणि तंत्रज्ञानविभागाने स्थापन केलेले महाआयटी पोर्टल असण्याची शक्यता आहे.

 पुणे : महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या वेगवगेळ्या पेपरफुटीच्या  प्रकरणात आता पोलीस आणखी गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.  या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कंपन्यांना कंत्राट मिळवून देण्यात सहभागी असलेल्या मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग पोलीस तपासत आहे.  त्याचबरोबर काही राजकीय नेत्यांच्या पुढाकारानेच या कंपन्या महाराष्ट्रात आल्यात.  त्यामुळे महापोर्टलच्या माध्यमातून या कंपन्यांना कंत्राट मिळवून देण्यात सहभागी असलेल्यांचा सहभाग पुणे पोलीस उघड करण्याची शक्यता आहे.

 पेपरफुटीच्या मुळाशी राज्याचा माहिती आणि तंत्रज्ञानविभागाने स्थापन केलेले महाआयटी पोर्टल आहे.  या पोर्टलच्या माध्यमातूनच मागील सरकारच्या काळात खाजगी कंपन्यांना परीक्षांची कंत्राटं देण्यास सुरुवात झाली आणि या सरकारच्या काळात देखील त्याच वादग्रस्त कंपन्यांना कंत्राटं देणं सुरु राहिलं . त्यामुळं या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल तर या कंपन्यांचे तारणहार असलेल्या मंत्रालयातील बड्या बाबूंपर्यंत आणि त्यांच्याही मागे दडलेल्या राजकारण्यांपर्यंत तपास पोहण्याची गरज आहे.

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून नोकर भरतीती कसे कसे बदल होत गेले हे लक्षात घेतलं की किती सुनियोजितपणे हे घोटाळे सुरु आहेत हे लक्षात येतं. आरोग्य भरती, म्हाडा आणि टी ई टी असे एका पाठोपाठ एक उघड होत गेलेल्या नोकरभरती घोटाळ्यांची पाळंमुळं मंत्रालयात रुजली आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत आरोग्य विभागातील महेश बाटले आणि प्रशांत बडगिरे यांच्यासह शिक्षण विभागातील तुकाराम सुपे आणि सुखदेव डेरे यांच्यासारखे बडे अधिकारी गजाआड झालेत. शिवाय  यात सहभागी असलेल्या खाजगी कंपन्यांचे संचालक आणि दलालांची संख्याही मोठी आहे. पण या सगळ्यांना माहापोर्टलच्या माध्यमातून मोकळं रान देणाऱ्या मंत्रालयातील वरिष्ठ  अधिकऱ्यांपर्यंत पुणे पोलिसांचा तपास पोहचण्याची गरज आहे. कारण मंत्रालयातील याच बड्या बाबूंच्या पुढाकाराने २०१७ साली राज्यात माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून परीक्षा घेण्यासाठी महापोर्टलची स्थापना झाली आणि खाजगी कंपन्यांना रान मोकळं झालं.

निवृत्त सनदी अधिकारी  महेश झगडे यांच्या मते मंत्रालयातील ज्या अधिकाऱ्यांनी, सचिवांनी ही कामे दिली त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर नोकर भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली . यात पहिला बदल झाला तो 1973 साली  झाली आहे. 

  • 25 एप्रिल 1973 ला महाराष्ट्र सरकारने नोकरभरतीसाठी नविन कायदा करुन महाराष्ट्र पब्लिक सर्वस कमिशन बोर्डची स्थापना केली.  ज्यानुसार शासकीय नोकरभरतीचा मोठा भाग महाराष्ट्र लोकसवा आयोग अर्थात एमपीएससीतून वगळण्यात आला.
  • 1983 मधे राज्य सरकारने कायद्यात बदल केला आणि सर्व विभागांना नोकरभरतीसाठी निवड समिती गठीत करण्यास सांगितल.
  • 1988 ला राज्य सरकारने पुन्हा कायद्यात बदल करून विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर नोकरभरतीसाठी समित्या गठीत करायचे ठरवले. 
  • 11 जून 1999 ला राज्य सरकारने पुन्हा धोरण बदललं आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. सतत होणाऱ्या नोकर भरतीतील गैरप्रकारांमुळे हा निर्णय घेण्यात आला आणि या पुढे परीक्षा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.  
  • 2017 पर्यंत ही यंत्रणा लागू होती.  पण 2017 साली तत्कालीन राज्य सरकरने महापोर्टल स्थापन करून खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट द्यायला सुरुवात केली.  या खाजगी कंपन्यांकडून होणारे गैरप्रकार पाहून विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला.  तत्कालीन विरोधक असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा दिला.  एवढच नाही तर सुप्रिया सुळे,  रोहित पवार,  जयंत पाटील,  बच्चू कडू हे विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले. 
  • परंतु 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देखील परीक्षा घेण्याचे काम खाजगी कंपन्याना कंत्राटी पद्धतीवर देणे महाविकास आघाडीकडून सुरू ठेवण्यात आले.
  • ज्या कंपन्याना कामे देण्यात आली त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत.  वेगवेगळ्या राज्यातील भरती घोट्याळ्यांमधे त्यांची नावे जोडली गेली आहेत.  
  • महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश,  मध्य प्रदेश,  बिहार,  राजस्थान,  गुजरात अशा अनेक राज्यांमधे सातत्याने नोकरभरतीत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे  
  • मात्र केरळ याला अपवाद ठरलय.  कारण केरळमधील नोकरभरती तिथल्या केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून केली जाते. 
  • त्यामुळे या घोटाळ्याचे लाभार्थी सध्या अटकेत असलेले अधिकारीच आहेत असं नाही तर त्यांच्यापाठीमागे असलेले मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अधिक जबाबदार आहे . 

एमपीएससी स्टुडंट राईट प्रतिनिधी महेश बडे यांच्या मते,  मंत्री आणि अधिकाऱ्यांनी मिळून या कंपन्या आणल्या. चांगल्या कंपन्यांना मुद्दाम  डावललं गेलं. दोन्ही सरकारमधील संबंधित मंत्री याला जबाबदार आहेत आणि यात जर सुधारणा करायची असेल तर एम पीएससीतर्फे परीक्षा घेण्याची गरज आहे. नोकरशाहीला  राज्य आणि देशाचा कणा माणला जातं. पण गेली अनेक वर्ष गैरप्रकार करुन हा कणाच कमकुवत करण्यात आलाय. भरतीसाठी गैरप्रकार करुन पैसे मोजलेला उमेदवार अधिकारी बनल्यावर भरतीसाठी मोजलेली रक्कम वसूल करण्याच्या मागे लागतो. सगळीकडे माजलेल्या भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी यामुळे पारदर्शक पद्धतीने नोकरभरती न होण्यामधे दडली आहेत.

महेश झगडे यांच्या मते पैसे देऊन अधीकारी बनलेली व्यक्ती भ्रष्टाचार आणखी जोमाने करणार हे उघड आहे.  हे चित्र बदलायचे असेल तर महाराष्ट्र लोकसवा आयोगाला सक्षम करून या आयोगामार्फत सर्व परीक्षा घेण्याची गरज आहे. राज्यातील चार लाख पोस्ट सध्या रिक्त आहेत.  त्यासाठी राज्यातील लाखो तरुण जीवतोड मेहनत करत आहेत. त्यांच भवितव्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल तर अगदी मंत्रालयांपर्यंत पसरलेली नोकरभरतीची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आहे. परीक्षा घेणारी पारदर्शक यंत्रणा उभारूनच हे होऊ शकतं.

 आतापर्यंत सरकारी अधिकारी आणि दलालांपर्यंत मर्यादित असलेला पुणे पोलिसांचा तपास पुढच्या काही दिवसांमध्ये खाजगी कंपन्यांना नोकरभरतीत प्रवेश मिळवून देणाऱ्या तत्कालीन मंत्री आणि त्यांच्या पीएपर्यंत येत्या काही दिवसांमध्ये पोहचणार आहे . अर्थात यात राजकारणही भरपूर होणार आहे . पण खाजगी कंपन्यांना वाव देण्यात आधीचं आणि आताच अशी दोन्ही सरकारं सारखीच जबाबदार आहेत. त्यामुळं राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे पाहण्याची गरज आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा प्रामाणिकपणावरील विश्वास उडू द्यायचा नसेल तर हे व्हायला हवं.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv News: भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
भोंगा वाजताच दोन तास टीव्ही, मोबाईल बंद होणार, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात अभ्यासाचा नवा पॅटर्न
Maharashtra Live blog updates: धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 या वेळेत टीव्ही, मोबाईल बंद राहणार
Maharashtra Live blog updates: धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 या वेळेत टीव्ही, मोबाईल बंद राहणार
Ashok Kharat Nashik Crime: मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
Ashok Kharat : अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Nashik Crime: मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
Baramati Byelection 2026 Candidates: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवारांनी शड्डू ठोकला, कोण-कोण रिंगणात?
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवारांनी शड्डू ठोकला, कोण-कोण रिंगणात?
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश
नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अन्...
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
Ashok Kharat : अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
Embed widget