एक्स्प्लोर

विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...

T20 World Cup 2024 : विश्वचषकाआधी हार्दिक पांड्याला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केलं जात होतं. पण, या ट्रोलर्सला त्यानं चांगली चपराक दिली आहे.

Hardik Pandya Statement After T20 World Cup 2024 Final : 17 वर्षानंतर भारताने टी20 विश्वचषकावर (T20 World Cup 2024) नावं कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) सामन्यात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अखेरच्या चार षटकात भारतीय (Team India) गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेकडून सामना हिसकावून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यातील शेवटचं षटकं टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने टाकलं. विश्वचषकाआधीचा काळ पंड्यासाठी फार संघर्षमय होता. विश्वचषकाआधी हार्दिक पांड्याला अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केलं जात होतं. पण, या ट्रोलर्सला त्यानं चांगली चपराक दिली आहे.

तो आला, तो लढला, तो जिंकला

विश्वचषकाआधी हार्दिक पांड्याच्या आयुष्यात अनेक संकटं आली. आयपीएल 2024 मध्ये चाहते हार्दिक पांड्याला ट्रोल करत त्याच्यासमोर त्याला अपशब्द सुनावत त्याचा सातत्याने अपमान करत होते. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक घडमोडी घडत होत्या. यातच त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या. आयपीएलनंतर हार्दिकची विश्वचषकासाठी निवड केल्यावर त्यावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पण, या सर्व ट्रोलर्सना हार्दिकनं सणसणीत उत्तर दिलं आहे. 

विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं

त्यावेळी असं वाटलं की, ''माझे गेलेले सहा महिने परत आले. बरंच काही घडलं. काय नाही झालं, मी स्वत:ला खूप कंट्रोल केलं. जेव्हा मला रडायला येत होतं, तेव्हा मी रडलो नाही, कारण मला लोकांना दाखवायचं नव्हतं. माझ्या संकटात जे आनंदी होते, त्यांना मला आणखी आनंद द्यायचा नव्हता आणि मी कधी देणारही नाही. आज आज सहा महिने गेल्यानंतर पण, देवाची कृपा, मला इतकी चांगली संधी पण कशी मिळाली पाहा. शेवटचं षटक जिथे अशी परिस्थिती होती, तिथे मला संधी मिळाली आणि मी करुन दाखवलं. आता यावर आणखी काय बोलू.''

नेमकं काय म्हणाला हार्दिक पांड्या?

हार्दिक पांड्या ट्रोलर्सला उत्तर देताना म्हणाला, "मी प्रतिष्ठेवर विश्वास ठेवतो, जे लोक मला एक टक्काही ओळखत नाहीत, ते इतकं काही बोलले. लोक खूप काही म्हणाले, पण काही फरक पडत नाही. मी नेहमी मानतो की शब्दांनी उत्तर देऊ नये, परिस्थिती उत्तर देते. वाईट काळ कायम टिकत नाही. तुम्ही जिंकलात किंवा हरलात तरी प्रतिष्ठा राखणं महत्त्वाचं आहे. चाहत्यांना आणि प्रत्येकाने हे शिकले पाहिजे. आपण चांगलं आचरण राखलं पाहिजे. मला खात्री आहे की, आज ते लोक आनंदी असतील."

दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. हार्दिक पांड्याच्या खांद्यावर शेवटच्या षटकाची जबाबदारी होती. पांड्याने दक्षिण आफ्रिकेला 16 धावा करू दिल्या नाहीत. या षटकाबद्दल तो म्हणाला की, "खरं सांगायचं तर, मी मजा करत होतो. खूप कमी लोकांना जीवनात असा बदल घडवणाऱ्या संधी मिळतात. याचा विपरीत परिणाम होऊ शकला असता, पण मी अर्धा भरलेला ग्लास पाहत होतो, अर्धा रिकामा नाही. मी दडपण घेतलं नव्हतं, कारण मला माझ्या कौशल्यावर विश्वास होता."

पुढचा T20 विश्वचषक भारतात होणार आहे आणि यावेळी हार्दिक पांड्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असेल, याबाबत पांड्या म्हणाला की, "2026 साठी अजू खूप वेळ आहे. रोहित आणि विराटसाठी मी खूप आनंदी आहे. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज जे या विजयाचे पात्र होते, त्यांच्यासोबत या फॉरमॅटमध्ये खेळताना मजा आली. त्यांची उणीव नक्कीच जाणवेल, पण त्यांना यापेक्षा चांगला निरोप देऊ शकलो नसतो."

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा

व्हिडीओ

Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Embed widget