एक्स्प्लोर

मराठवाड्यातील 37 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस

बीड: मागच्या चार-पाच वर्षात या वर्षी पहिल्यांदाच मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. सुरुवातीलाच दमदार पावसामुळे पेरलेलं उगवलंसुद्धा मात्र त्यानंतर गायब झालेला पाऊस अद्याप तरी परतला नाही. आता पंधरा दिवस होत आलेत तरी मराठवाड्यात एकही दमदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील तब्बल 37 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दांडी मारल्याने दुबार पेरणीच संकट शेतकऱ्यावर ओढावलं आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनानंतर वारकरी घराकडे परत फिरल्यावर पाऊससुद्धा परततो अशी भावना भोळ्या भाबड्या शेतकऱ्यात असते. आता थकले भागलेले वारकरी घरी पोहचले खरे मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यामध्ये सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर शेतकऱ्यांनी मूग, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांची पेरणी केली. हे पिक उगून देखील आलं मात्र, आता पावसाचा खंड पडल्यामुळे हलक्या जमिनीतली पिकं करपू लागली आहेत. पांढरवाडी गावच्या अर्जुन टाकले यांनी अडीच एकरावर तूर आणि कापसाची लागवड केली होती. मात्र आता पावसाने पंधरा दिवसापासून दांडी मारल्याने त्यांनी या पिकात नांगर घातला आहे. कारण आता दुबार पेरणीशिवाय पर्यायच राहिला नाही. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील नव्वद टक्के शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून पावसाचा एक टिपूसही पडलेला नाही. आकाशात रोज काळे ढग जमा होतात मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने ते पुढे जात आहेत. त्यामुळे जमिनीत राहिलेली थोडी फार ओल सुकून चालली आहे तर कुठे जमिनीला भेगा पडल्या आहेत. येत्या चार-पाच दिवसात वरूणराजा बरसला नाही तर पिके पूर्णतः जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जोरदार पावसाअभावी मराठवाड्यातल्या छोट्या मोठ्या धरणामध्ये अजून पुरेसा पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी मुबलक पाण्यावर पिकला पाणी देण्यासाठी ठिबक आणि स्पिंक्लरचा वापर करत आहेत. मराठवाड्यातल्या 37 तालुक्यामध्ये अजूनही सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. त्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या गेवराई माजलगाव आणि वडवणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आस लागली आहे. हजारो रुपये खर्च करून पेरणी तर केली मात्र उगलं ते पिकवायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. मराठवाड्यातील 71 तालुक्यांपैकी 37 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.   औरंगाबाद जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी सोयगाव   ----- 118 मिली.........................66% पैठण     -------82  मिली..........................57% औरंगाबाद -------151  मिली..........................94% गंगापूर   -------109  मिली..........................73% खुलताबाद -------151  मिली..........................66% जालना  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी जालना    ----- 147 मिली.........................52% बदनापूर   -------115  मिली..........................59% परतूर     -------137 मिली..........................85% अंबड     -------155  मिली..........................82% घनसांगवी  -------151  मिली..........................82% परभणी  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी परभणी  ----- 151 मिली.........................82% पालम   ------- 96  मिली..........................70% पूर्णा     -------137  मिली..........................75% गंगाखेड  ------- 117 मिली..........................85% पाथरी  -------  96 मिली..........................57% जिंतूर  -------  116 मिली..........................65% मानवत -------  129 मिली..........................81% हिंगोली  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी   कळमनुरी  ----- 113 मिली.........................51% वसमत  ------- 149  मिली..........................81% नांदेड  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी अर्धापूर  -----  193 मिली.........................85% भोकर   ------- 186 मिली..........................85% उमरी   ------- 115 मिली..........................52% लोहा  -------  157 मिली..........................79% किनवट ------- 218 मिली..........................93% माहूर   ------- 172 मिली..........................73% हदगाव  ------- 195 मिली..........................90% हिमायतनगर -----110 मिली.........................51% देगलूर  ------- 115 मिली..........................57% बिलोली  ------- 158 मिली..........................75% धर्माबाद  ------- 153 मिली..........................75% नायगाव  ------- 203 मिली..........................63% मुखेड    ------- 145 मिली..........................75% बीड   जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी गेवराई   ----- 119 मिली.........................71% वडवणी  ------- 139 मिली..........................89% माजलगाव -------138  मिली..........................85% परळी   ------- 151 मिली..........................90% लातूर  जिल्हा तालुका        या वर्षी पडलेला पाऊस      अपेक्षित पावसाची टक्केवारी जळकोट    ----- 208 मिली.........................85% दुष्काळानंतर गेल्या वर्षी परतीच्या पावसाने अनेक पिकांना जीवदान मिळाल होतं. तर मोठ्या प्रमाणात जलाशयात पाणीसाठा जमा झाला होता. मात्र या वर्षी दुबार पेरणीचे ढग पुन्हा आकाशात जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
Embed widget