एक्स्प्लोर
लातूरमध्ये ओढ्याच्या पुरात कार वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे लातूरचा पाणीप्रश्न मिटला असला तरी जनजीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. ओढ्यात कार वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. रेणापूर तालुक्यातील हनमंतवाडी येथे ओढ्यात कारमध्ये चौघे जण अडकले होते. त्यावेळी आलेल्या पुरात वाहून गेल्याने चौघांचाही मृत्यू झाला. 45 वर्षीय ज्ञानोबा अनंत गिते आणि इतर तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. सकाळी पाणी ओसरल्यावर ही घटना उघड झाली.
Before You Go
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion




















