सोलापूरकर आणि कोरटकर यांना का वाचवताय? ते सरकारचे जावई आहे का? जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
सरकार राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar) आणि प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) का वाचवतंय? ते या सरकारचे जावई आहेत का? असा सवाल करत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीका केली.

Jitendra Awhad : हे सरकार राहुल सोलापूरकर ( Rahul Solapurkar) आणि प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) का वाचवतंय? ते या सरकारचे जावई आहेत का? असा सवाल कर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. नेहरु काय म्हणाले, सावरकर काय म्हणाले हे सोडा, कोरटकर आणि सोलापूरकर वर काय कारवाई करणार? हे सांगा असेही आव्हाड म्हणाले. या दोघांवर बोलायचं नाही म्हणून तुम्ही आबू आझमी (Abu Azmi) समोर आणल्याचे आव्हाड म्हणाले.
प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर अशी कुठली अवलाद आहे, त्याला वाचवण्यासाठी सरकार झुकत आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकरवर काहीच कारवाई करणार नाही का? असा सवाल करत आव्हाडांनी सरकारला चांगलेच धारेवल धरले.
नेमकं काय म्हणाले प्रशांत कोरटकर?
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. यामध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करुन थेट धमकी दिली होती. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला होता. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर?
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. तसेच औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करुन सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो, असं एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
























