![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या ठाकरे सरकारकडून हालचाली
औरंगाबादचं नाव बदलण्यासाठी ठाकरे सरकारडून हालचाली सुरु झाल्या आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामांतरचा मुद्दा चर्चेत आहे.
![औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या ठाकरे सरकारकडून हालचाली Efforts started by state government aurangabad name change to sambhajinagar औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या ठाकरे सरकारकडून हालचाली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/24035516/uddhav.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. त्यासाठी महापालिकेत आत्तापर्यंत झालेले ठराव, न्यायालयात प्रलंबित प्रकरणे या संदर्भातला सविस्तर अहवाल राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भामध्ये माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे.
औरंगाबाद महापालिकेने 11 जून 1995 मध्ये हा ठराव मंजूर करुन शासनाकडे पाठवला होता. शासनाने नोव्हेंबर 1995 मध्ये संभाजीनगरचे अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मुस्ताक अहमद यांनी उच्च न्यायालयात याचिकेला आव्हान दिलं होतं. त्यानंतर 2001 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारने राज्य शासनाची अधिसूचना मागे घेतली. शिवसेनेचे महापौर सुदाम सोनवणे यांच्या काळात 1999 मध्ये आणि महापौर अनिता घोडेले यांच्याकडे 2011 मध्ये संभाजीनगरचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)